प्रथिने ही अमीनो असिड्सपासून तयार केली जातात आणि सजीव प्राण्यांना जीवनासाठी आवश्यक अशी अनेक प्रकारची कार्ये करण्यासाठी ती अत्यावश्यक असतात. आपल्या शरीरातील जवळपास अर्धी प्रथिने ही स्नायुंच्या स्वरुपात असतात. प्रथिनांची गुणवत्ता ही अन्नातील अत्यावश्यक अमीनो असिड्सच्या प्रमाणावर अवलंबून असतात.
अन्न |
घटकांचे प्रमाण |
सोयाबिन |
43.2 |
हरभरा, उडीद, मूग, मसूर आणि चणा |
22 |
शेंगदाणे, काजू आणि बदाम |
23 |
मासे |
20 |
मांस |
22 |
दूध (गाय) |
3.2 |
म्हैस |
4.3 |
अंडे (अंदाजे 44 ग्रॅम) |
13.3 (प्रति अंडे) |
पौगंडावस्थेतील मुलं ही भारताच्या लोकसंख्येच्या एक-पंचमांश आहेत. मूळ इंग्रजी अडोलसन्ट या शब्दाचा उगम लॅटीन अडोलसेरे म्हणजे वाढणे यापासून झाला आहे, यातून या वयाच्या लक्षणांचं महत्व लक्षात येतं.
जागतिक आरोग्य संघटनेनुसार, पौगंडावस्थेची काही वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.
जलद शारीरिक वाढ आणि विकास गाठणे.
शारीरिक, सामाजिक आणि मानसिक समजूतदारपणा परंतु सर्व एकाचवेळी नव्हे.
प्रौढ मानसिक वाढ आणि प्रौढपणाची चिन्हे विकसित होणे.
एकंदर सामाजिक-आर्थिक अवलंबित्व ते अनुशंगिक स्वावलंबनाकडे स्थित्यंतर.
पौगंडावस्थेत होणा-या वाढीसाठी पुरेसे पोषण अत्यंत महत्वाचे आहे. कमकुवत पोषण हे वयात येण्यातील विलंबाचे एक कारण म्हणून ब-याचदा सांगितले जाते, विशेषतः भारतीय पौगंडावस्थेतील मुलींसाठी ते लागू पडते. पाळी सुरु होण्याचा संकेत देणारी वाढ ही त्या मुलीनं 30 किलो वजन आणि 10 टक्के शरीरातील चरबीचं महत्वाचं प्रमाण गाठण्यावर अवलंबून आहे.
पौगंडावस्थेत ऊर्जा, प्रथिने, खनिजं आणि जीवनसत्वं मिळण्यासाठी मागणी वाढली आहे.
वयोगट |
ऊर्जा |
प्रथिने |
चरबी |
कॅल्शिअम |
लोह |
अ जीवनसत्व |
10-12 |
2190 1970 |
54
57 |
22
22 |
600
600 |
34
19 |
2400
2400 |
13-15 13-15 |
2450
2060 |
70
65 |
22
22 |
600
600 |
41
28 |
2400
2400 |
16-18 |
2640
2060 |
78
63 |
22
22 |
500
500 |
50
50 |
2400
2400 |
स्रोतः भारतियांसाठी शिफारसकृत आहाराचे प्रमाण, NIN, ICMR, Year: 1989
दैनंदिन शारीरिक कार्ये करणं, शरीराचं तापमान राखणं, चयापचयाची क्रिया आणि वाढीला आधार देणं यासाठी मनुष्यप्राण्यांना पुरेशा प्रमाणात ऊर्जेची आवश्यकता असते. राष्ट्रीय देखरेख ब्यूरोनं केलेल्या सर्वेक्षणानुसार भारतात जवळपास 50 टक्के पुरुष आणि महिलांना तीव्र ऊर्जा कमतरतेचा त्रास होतो.
चरबीः मानवी आरोग्यचरबी हा आहारातील एक महत्वाचा घटक आहे आणि आपल्या शरीरात अनेक कार्यांसाठी ती लागते. ती एक संपृक्त स्वरुपातील ऊर्जेचा स्रोत असून त्याव्दारे प्रती ग्रॅम 9 किलो कॅलरी ऊर्जा मिळते. आहारात उपलब्ध असलेली अ, ड, ई आणि कॅल्शिअम ही चरबीत विद्राव्य जीवनसत्वं शोषून घेण्यासाठी किमान चरबी आवश्यक आहे.
शिफारसकृत आहाराचे प्रमाण
खाद्य तेलांमधील लिनोलेईक (लिन) आणि लिनोलेईनिक (लेन) आम्लाचे प्रमाण (ग्रॅम / 100 ग्रॅम)
स्थूलपणा आणि पोषाहारस्थूलपणा या अवस्थेत शरीरातील वसा ऊतकामधे अतिरीक्त चरबी सर्वसाधारणतः साठत जाते त्यामुळं आवश्यक वजनापेक्षा 20 टक्के अधिक वजन वाढते. स्थूलपणाचे आरोग्यावर अनेक विपरीत परिणाम होतात आणि त्यामुळं अकाली मृत्युसुध्दा ओढवू शकतो. स्थूलपणा रक्तातील उच्च कोलेस्टेरॉल, हृदयरोग, मधुमेह, पित्ताशयातील खडे आणि ठराविक प्रकारचे कर्करोग यांना कारणीभूत ठरतो. कारणे
ऊर्जेच्या वापरातील चयापाचयिक चुका मेद साठण्यास उत्तेजन देऊ शकतात. बालपण आणि पौगंडावस्थेतील स्थूलपणा यांच्यामुळं प्रौढावस्थेत स्थूलपणा येऊ शकतो. महिलांमधे, गर्भधारणेच्या वेळेस आणि रजोनिवृ्त्तीनंतर स्थूलपणा येतो. वजन कसे कमी करावे ?
गर्भधारणेदरम्यान पोषाहारगर्भधारणेदरम्यान पोषक आहाराची गरज अधिक असते. गर्भातील बाळ तसंच गर्भवती महिलेच्या गरजा भागवण्यासाठी अतिरीक्त अन्नाची गरज असते. भारतामधे, गरीब गटांतील महिलांचा आहार हा गर्भवती नसलेल्या आणि स्तनदा नसलेल्या महिलांप्रमाणे अगदी गर्भधारणा आणि स्तनपानादरम्यानच्या आहाराप्रमाणेच असतो.
गर्भवती महिलांसाठी आहाराची गरज
गर्भधारणेदरम्यान काय करावे, काय करु नये
गर्भवती महिलांना चालणे आणि अन्य शारीरिक कामं आवश्यक आहेत आणि त्यांनी अति शारीरिक काम, विशेषतः गर्भधारणेच्या अंतिम महिन्यात टाळावे. |
स्रोतः
राष्ट्रीय पोषाहार संस्था
(भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद)
हैदराबाद – ५०० ००७ (भारत)
अंतिम सुधारित : 6/5/2020
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...
या विभागात अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे म्हणजेच योग...
म्हातारपण किंवा दीर्घ आजारपण यामुळे माणूस अंथरुणाल...
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...