राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत शालेय आरोग्य कार्यक्रम राज्यात फेबु़वारी २००८ पासून राबविण्यात येत होता. हा कार्यक्रम सर्व शिक्षा अभियानाच्या समवेत राबविण्यात येत होता. या कार्यक्रमात वय वर्ष ६ - १८ वयोगटातील शहरी व ग्रामीण भागातील शालेय विदयार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येत होती व त्यासाठी ४४० पथके कार्यरत होती.
शालेय आरोग्य कार्यक्रमाच्या यशानंतर महाराष्ट्रामध्ये ठाणे जिल्हयातील पालघर येथे केंद्रशासनाद्वारे राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाचे दिनांक ६ फेब्रुवारी २०१३ रोजी युपीए अध्यक्षा मा. सोनिया गांधी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. लहान मुलांमधील जन्मजात विकृती, कमतरतेमुळे होणारे आजार, वाढीच्या वेळी होणारे आजार यांचे वेळीच निदान करुन उपचार करणे हे राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाचे महत्वाचे उिद्दष्ट आहे.
दिनांक ०१ एप्रिल २०१३ पासून राज्यातील सर्व जिल्हयांत राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम सुरु करण्यात आला. या कार्यक्रमात ० ते १८ वयोगटातील मुलांची आरोग्य तपासणी करण्यासाठी राज्यात ११३० पथके कार्यरत आहेत. प्रत्येक पथकात २ वैदयकीय अधिकारी (१ पुरुष व १ स्त्री ), १ आरोग्य सेविका व १ औषध निर्माता यांचा समावेश आहे. तालुकास्तरावरील ग्रामीण / उपजिल्हा रुग्णालये येथे या पथकांचे मुख्यालय करण्यात आले आहे. प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यापुर्वी पथकातील सदस्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले आहे.
सध्या या पथकांद्वारे ग्रामीण व शहरी भागातील अंगणवाडीतील बालकांची व शालेय विदयार्थ्याची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. सदर पथकांना मुलांची तपासणी करण्यासाठी आवश्यक ती वैदयकीय उपकरणे व औषधे यांची किट देण्यात आलेली आहे. पथकामार्फत तपासणी केल्यानंतर विदयार्थ्यांना संदर्भसेवा ग्रामीण / उपजिल्हा रुग्णालये व जिल्हा रुग्णालये येथे दिल्या जातात.
महिला व बाल विकास विभाग व शिक्षण विभाग यांचे सहकार्याने हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
स्त्रोत : सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन
अंतिम सुधारित : 6/30/2020
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक ग्रामपंचायत...
भारत हा कृषी प्रधान देश आहे. यासाठी कृषी विकासासाठ...
‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र...
सदर योजना महाराष्ट्र राज्यात सन २००४-०५ पासून राबव...