Accessibility options
Accessibility options
Government of India
Table of contents
Contributor : छाया निक्रड09/03/2020
Skip the lengthy reading. Click on 'Summarize Content' for a brief summary powered by Vikas AI.
माणसाला जसे शारिरीक विकार होत असतात त्याचप्रमाणे मानसिक व्याधी सुध्दा होत असतात. तथापि शारिरीक विकार दृश्य स्वरुपात असतात. परंतु मानसिक विकार वैयक्तिक असल्यामुळे तात्काळ दिसून येत नाहीत. जागतिक पातळीवर समाजात शंभरात एकजण तरी कोणत्या ना कोणत्यातरी गंभीर आजाराने बाधीत असतो व सुमारे 10 ते 12 टक्के माणसं कमी तिव्रतेच्या मानसिक आजारांनी पछाडलेली असतात. महाराष्ट्र राज्यात लोकसंख्येचा जर विचार केला तर सुमारे 8 ते 10 लाख मानसिक आजाराने ञस्त आहेत.म्हणजेच राज्यात मानसिक आरोग्य समस्या निर्माण झाली आहे असे म्हणणे वावगे ठरु नये.
मानसिक आजाराच्या समस्यांचे गांभिर्य आणि व्याप्ती विचारात घेता केंद्र शासनाने ऑगस्ट 1982 मध्ये राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम सुरु केला. सदर कार्यक्रम अंमलबजावणी महाराष्ट्रात सुध्दा चालू आहे जेणे करुन सामान्य माणूस व ग्रामीण जनता यांना त्याचा लाभ व्हावा. सदर कार्यक्रमासाठी राज्याच्या आरोग्य संचालनालयात विशेष मानसिक आरोग्यकक्ष स्थापन करण्यात आला असून सदर कार्यक्रमाचे नोडल ऑफीसर म्हणून अतिरिक्त मुख्य संचालक हे आहेत.
मानसिक आरोग्य कायदा 1987 नुसार खाजगी मानसिक रुग्णालयांना पंजीकृत करणे बंधनकारक असून यांना “ संचालक आरोग्य सेवा ” यांचे मार्फत परवाना पञ दिले जाते. अद्याप पावेतो 120 खाजगी मानसिक शुश्रुषागृहांना पंजीकृत प्रमाणपञ देण्यात आलेले आहे. मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सदर रुग्णालयांची मासिक तपासणी होणे बंधनकारक असल्यामुळे प्रादेशिक मनोरुग्णालय पातळीवर अभ्यागत समिती स्थापन करण्यात आलेली आहे. सदर समितीमध्ये खालील सदस्य आहेत.
शासन निर्णय क्रमांक जिरुक्र.130/आ.3/ मंञालय,मुंबई 32 दि. 1/3/06 नुसार राज्यातील 22 जिल्हा रुग्णालयात 10 खाटांचा मानसिक आरोग्य कक्ष स्थापन करण्यात येऊन त्यासाठी 20 पदांची निर्मिती करण्यात आली आहे.
जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम, प्रादेशिक मनोरुग्णालयामधील सेवा – सुविधांचे उन्नतीकरण तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मानसोपचार विभागांचे बळकटीकरण करण्यासाठी केंद्र शासनाच्या दहाव्या पंचवार्षिक योजेनअंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य कार्यक्रमातंर्गत निधीतून प्राप्त झाला आहे.
सदर निधीतून
मनुष्यबळ विकासाच्या दृष्टीने वैद्यकीय अधिकारी यांचे प्रशिक्षकांचे प्रशिक्षण (Training of Trainers) पूर्ण झाले असून प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय येथील वैद्यकीय अधिका-यांचे प्रशिक्षण चालू आहे.
व्यावसायोपचार विभागाचे बळकटीकरण तसेच प्रादेशिक मनोरुग्णालयामध्ये ‘ डे केअर सेंटरची ‘स्थापना.
दीर्घ मुदतीच्या आजाराने अनेक रुग्ण प्रादेशिक मनोरुग्णालयामध्ये भरती होत असतात. अशा रुग्णांना त्याचे आत्मबल वाढवून समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये स्वतःच्या हिम्मतीवर उभे राहण्याच्या दृष्टीने व्यवसाय उपचार विभाग व डे केअर सेंटर यांचे माध्यमातून विविध व्यवसाय कौशल्य शिकविले जातात आणि त्यानंतर विविध सामाजिक संस्थाच्या माध्यमातून त्यांना रोजगार उपलब्ध करुन दिला जातो
केंद्र सरकारकडून रु. 5 कोटी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाच्या माध्यमातून सदर कार्यक्रमासाठी उपलब्ध झाले असून विविध प्रकारची यंञ साधनसामुग्री उपलब्ध करुन देवून विविध प्रकारचे व्यवसायोपचार कौशल्ये शिकविली जातात. यासाठी एप्रिल 2012 मध्ये सुरु झालेल्या सदर कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी कोअर कमिटीची स्थापना करण्यात आली आहे.
सन 2008 – 09 या वर्षी वृध्दापकाळातील शारिरीक व मानसिक समस्यांसाठी शासकीय वैदयकीय वैद्यकीय महाविद्यालय अंबेजोगाई, जि. बीड येथे आरोग्य केद्राची स्थापना करण्यास मान्यता मिळाली आहे. सदर प्रकल्पासाठी 2008 – 09 साली अनावर्ती रु. 14 करोड आवर्ती मध्ये रु. 2.30 करोड निधीला मंजुरी देण्यात आली होती.
महाराष्ट्र राज्यात प्रत्येक जिल्हा मुख्यालयी एक याप्रमाणे ३४ जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा तालुका स्तरावर १३८ उपविभागीय प्रयोगशाळा कार्यान्वीत आहेत.
भारताने मृत्यू दर कमी करण्यात महत्वपुर्ण प्रगती केली आहे. मागील काही दशकामध्ये मलेरिया या रोगामुळे होणाऱया मृत्यूचे प्रमाण त्याच बरोबर माता व अर्भक मृत्युदरात घट झाली आहे.
मानसिक आरोग्य म्हणजे आयुष्यात येणाऱ्या सगळ्या बऱ्यावाईट अनुभवांना खंबीरपणे सामोरे जाने, कुटुंबातील आणि समाजातील इतर लोकांशी चांगले नाते असणे असा अर्थ आहे.
तंद्रा व मूर्च्छा ह्या निद्रेच्या विकृत अवस्था आहेत. हवे ते मिळाले नाही आणि नको ते प्राप्त झाले म्हणजे चित्ताचा क्षोभ होऊन ज्या मद, मूर्च्छा, उन्मादादी व्याधी होतात, त्यांस मानसव्याधी म्हणतात.
मानसिक आरोग्या विषयी.
युवा शक्तीला ऊर्जा आहे, जिद्द आहे. हे खरे असले तरी त्यांच्यापुढे अनेक प्रश्नही आहेत. किशोरावस्थेत शारीरिक वाढ, मानसिक अवस्था व संप्रेरकांमध्ये बदल होत असतात.
Contributor : छाया निक्रड09/03/2020
Skip the lengthy reading. Click on 'Summarize Content' for a brief summary powered by Vikas AI.
78
महाराष्ट्र राज्यात प्रत्येक जिल्हा मुख्यालयी एक याप्रमाणे ३४ जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा तालुका स्तरावर १३८ उपविभागीय प्रयोगशाळा कार्यान्वीत आहेत.
भारताने मृत्यू दर कमी करण्यात महत्वपुर्ण प्रगती केली आहे. मागील काही दशकामध्ये मलेरिया या रोगामुळे होणाऱया मृत्यूचे प्रमाण त्याच बरोबर माता व अर्भक मृत्युदरात घट झाली आहे.
मानसिक आरोग्य म्हणजे आयुष्यात येणाऱ्या सगळ्या बऱ्यावाईट अनुभवांना खंबीरपणे सामोरे जाने, कुटुंबातील आणि समाजातील इतर लोकांशी चांगले नाते असणे असा अर्थ आहे.
तंद्रा व मूर्च्छा ह्या निद्रेच्या विकृत अवस्था आहेत. हवे ते मिळाले नाही आणि नको ते प्राप्त झाले म्हणजे चित्ताचा क्षोभ होऊन ज्या मद, मूर्च्छा, उन्मादादी व्याधी होतात, त्यांस मानसव्याधी म्हणतात.
मानसिक आरोग्या विषयी.
युवा शक्तीला ऊर्जा आहे, जिद्द आहे. हे खरे असले तरी त्यांच्यापुढे अनेक प्रश्नही आहेत. किशोरावस्थेत शारीरिक वाढ, मानसिक अवस्था व संप्रेरकांमध्ये बदल होत असतात.