অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रस

रस

रक्ताप्रमाणे आणखीही एक प्रवाही पदार्थ शरीरात असतो. त्याला (लिंफ) 'रस' असे म्हणतात. हा एक प्रकारचा पातळ पांढरट द्रव (प्रथिने, चरबीयुक्त) असून तो वाहून नेण्यासाठी रसवाहिन्या असतात. या नलिकांवर जागोजागी गाठी (रसग्रंथी) असतात. या गाठींतून 'गाळून' हा रस पुढे नीलेतील अशुध्द रक्तामध्ये मिसळतो. या रसाचे काम म्हणजे रोगजंतू पकडून गाठीमध्ये अडवून ठेवणे व त्यांचा 'बंदोबस्त' करणे. या गाठी जेव्हा सुजतात तेव्हा त्याला आपण 'अवधाण'आले असे म्हणतो. उदा. पायावर जखम झाली तर जांघेतल्या गाठी सुजतात. हातावर जखम असेल तर काखेतल्या गाठी सुजतात. टॉन्सिल्स यादेखील अशाच ग्रंथी आहेत. त्यांचे मुख्य काम घशातले जंतू पकडणे आहे. टॉन्सिल्स काढून टाकल्यावर हे संरक्षण आपण काढून टाकतो. म्हणूनच विनाकारण टॉन्सिल्स काढणे चांगले नाही. या रसग्रंथीमध्ये एक प्रकारच्या पांढ-या पेशी तयार होतात.

हत्तीरोगामध्ये या रसवाहक नलिका बंद होतात. त्यामुळे हत्तीरोग झालेल्या अवयवांमधून प्रथिने, चरबी, इत्यादी गोळा करून आणण्याचे काम बंद होते. त्यामुळे हे पदार्थ जागोजाग साठतात व हत्तीरोगाची सूज येते.निरनिराळया कर्करोगात या गाठी सुजतात व कडक होतात. ही शरीरात कॅन्सर पसरल्याची खूण असते.

 

 

लेखक : डॉ. श्याम अष्टेकर

(MBBS, MD community Medicine)

संदर्भ : आरोग्यविद्या

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate