शिक्षण, मिळकत, आयुर्मान या तीन घटकांची मोजदाद केल्यावर मानवविकासाचे मोजमाप मिळते. हा मानवविकास निर्देशांक जास्तीत जास्त 1 इतका असतो. म्हणूनच तो दशांशात सांगितला जातो. सोबतच्या तक्त्यात महाराष्ट्रातल्या निरनिराळया जिल्ह्यांचा मानवविकास निर्देशांक दिला आहे. यात गडचिरोली जिल्हा सगळयात कमी विकासाचा तर मुंबई व ठाणे जिल्हा सर्वाधिक विकासाचा आहे. मानवी विकास मोजण्याची ही एक ढोबळ पध्दत आहे. ती जिल्ह्याच्या पातळीवर काढता येते. मात्र व्यक्ती आणि कुटुंबाच्या जीवनाची गुणवत्ता मोजण्यासाठी शिक्षण-मिळकत-आयुर्मान या तीनाशिवाय खालील काही पैलू लक्षात घ्यावे लागतील.
या विविध किमान जीवनावश्यक बाबींचे मोजमाप केले तर मानवी विकासाचे खरे स्वरूप दिसते. केवळ मिळकत-शिक्षण-आयुर्मान या घटकात 'सुखी जीवन' पूर्णपणे समजत नाही.
आता इथून पुढे जगात'मानवी आनंद निर्देशांक'मोजला जाईल. सध्या जगात आनंदी असणारे पहिले दहा देश म्हणजे - डेन्मार्क, स्विट्झरलंड, ऑस्ट्रिया, आईसलँड, बहामा, फिनलंड, स्वीडन, भूतान, ब्रुनेइ, कॅनडा, आयर्लंड आणि लक्झेंबुर्ग. यातील तीन देश सोडता सर्व पाश्चिमात्य देश आहेत. इंग्लंडचा क्रमांक 41 तर अमेरिकेचा 23वा. चीन 82वा तर भारत 125 वा आहे. पण भारत इतका मोठा देश आहे की त्यातही आनंदी व दु:खी भाग असू शकतील. मुख्य मुद्दा असा आहे की, आपण सुखी व आनंदी आहोत का? सुख व आनंद हे प्रत्येक माणसाचे ध्येय असते. आपण आनंदी होण्यासाठी 'आहे त्यात सुख' मानायचे? की वर सांगितलेल्या पैलूंसाठी प्रयत्न करायचे?
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर
(MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 10/7/2020
कश्यप ऋषींनी तलावाच्या बांधकामाचे अत्यंत शास्त्रश...
गाळपाच्या हंगामादरम्यान पुरेसा ऊस उपलब्ध असण्याची ...
दूरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात आदिवासिंच...
मोठी गुंतवणूक करून एखादा कृषी प्रक्रिया उद्योग उभा...