অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शरीराला नेमके पाणी किती हवे?

शारीरिक कष्टाची कामे करत असलेल्या व्यक्तींना दिवसाला दोन ते अडीच लिटर पाण्याची गरज असते. उन्हाळ्यात शरीराला स्वतःहून पाणी हवे असते, मात्र, अन्य ऋतूमध्ये पाणी आठवणीने प्यावे लागते. श्रमिक, गर्भवती स्त्रिया, स्तनपान देणाऱ्या माता यांनी पाणी अधिक प्यावे. वाढत्या वयानुसार शरीरातील पाणी कमी होते.

पाण्याची गरज

खेळाडू व व्यायाम करणाऱ्यांनी प्रत्येक तासाच्या व्यायामाला अतिरिक्त पाणी प्यायला हवे.
उन्हामध्ये प्रवास करणारे वा अधिक श्रमाचे काम करणाऱ्या श्रमिकांनी पाण्यासह लिंबू-मीठ-साखरेचे पाणीही घ्यावे.

पाणी गार हवे की गरम?

आपण गार पाणी पितो, तेव्हा घशामधील तहान कमी होते. गार पाणी हे आतड्यात खूप लवकर शोषले जाते. म्हणूनच तहान भागल्याची संवेदना साध्या पाण्यापेक्षा गार पाण्याने अधिक लवकर जाणवते. फ्रीजमधील खूप थंड पाणी मात्र आरोग्यास तितकेसे हितकारक नाही. यात थोडे साधे पाणी मिळवून माठातल्या पाण्याच्या तापमानाला हे पाणी आणून मग घ्यावे. ज्यांना वरच्यावर कफ होतो, सर्दी-खोकला किंवा दम्याचा त्रास आहे, अशांनी मात्र गार पाणी न पिता साधे किंवा कोमट पाणी प्यावे. आम्लपित्त, लघवीची तक्रार असलेल्यांनी गार पाणी प्यायल्यास चालू शकते. स्थूल व्यक्ती, अपचन, पोटात गॅस होणे, अजीर्ण, आमवात, कंबरदुखी, टी. बी., कफाचे विकार, घशाचे विकार असे त्रास असणाऱ्यांनी कोमट पाणी प्यायची सवय ठेवावी. पाणी हा आपल्या शरीरातील चयापचय क्रियांमध्ये सहभागी असणारा महत्त्वाचा रासायनिक घटक आहे. परंतु, एका निरोगी माणसाने दिवसभरात किती पाणी प्यावे याबाबत अनेक गैरसमज आहेत. मात्र, आहारतज्ज्ञ दिवसभरात किमान आठ ग्लास पाणी प्यावे असे सांगत असतात
आपण पाणी पित असतोच पण चहा, कॉफी, थंड पेये, सोडा आणि निरनिराळ्या प्रकारचे रसही पीत असतो. त्यातूनही आपल्या पोटात पाण्याचा अंश जात असतो. त्यांचा हिशोब केला असता दिवसभरामध्ये १२ ते १५ ग्लास आपल्या पोटात जात असतात.

पाणी कसे हवे?



अर्थातच शुद्ध हवे. आजकाल घरोघरी फिल्टर आले आहेत. त्यामुळे स्वच्छ पाण्याची चिंता कमी झाली आहे. पाणी जंतुविरहीत करायचे असल्यास प्रथम पांढऱ्या स्वच्छ फडक्‍यातून गाळून घेणे. नंतर हे पाणी गरम करण्यास ठेवणे. पाण्याला उकळी आल्यानंतर पुढे दहा मिनिट हे पाणी उकळू द्यावे व त्यानंतर गॅस बंद करून झाकून ठेवावे. हे पाणी सर्वाधिक शुद्ध असते. त्यावर निर्धास्तपणे विसंबून राहता येते.

 

स्त्रोत - महाराष्ट्र टाइम्स

अंतिम सुधारित : 3/1/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate