অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

उर्जा आणि तिचा सध्याचा वापर

भारतातील ऊर्जावापराची सद्यस्थिती

ऊर्जा म्हणजे काय

ऊर्जा म्हणजे कार्य करण्याची क्षमता

ऊर्जेची मागणी व ऊर्जेचे सद्यःकालीन उपयोग

ऊर्जेची मागणी ग्रामीण भागातही सतत वाढते आहे. सध्या ऊर्जेचा वापर स्वयंपाकासाठी,दिवाबत्तीसाठी, आणि शेतीच्या इतर कामांसाठी केला जातो. एकूण ऊर्जेच्या मागणीपैकी ७५ % ऊर्जा, स्वयंपाक आणि दिवाबत्तीसाठी वापरली जाते. ग्रामीण घरांमधे, विजेबरोबरच, परिसरात उपलब्ध असलेली झाडेझुडुपे आणि केरोसीन हयांचाही वापर ऊर्जा मिळवण्यासाठी होतो. शेतीच्या कामांपैकी, पाणी खेचणा-या पंपासाठी, ऊर्जेचा वापर प्रामुख्याने होतो. ही ऊर्जा मिळवण्यासाठी वीज किंवा डिझेल हयांचा वापर केला जातो. मनुष्यबळातून उपलब्ध होणा-या ऊर्जेचा वापर शेतीच्या इतर कामांसाठी केला जातो. एकाच गावातील, सधन आणि सामान्य परिस्थितीतील शेतकरी, ओलिताची आणि कोरडवाहू जमीन, तसेच स्त्री आणि पुरूष हयांच्या, ऊर्जेचा वापर करण्याच्या पद्धतीत मोठ्या प्रमाणावर फरक आढळून येतो.

भारतामधे, जिथं सत्तर टक्के लोक ग्रामीण भागांमधे राहतात, तिथं आपला देश विकासाच्या प्रगतीपथावर राहायचा असेल तर ग्रामीण ऊर्जा अधिकच महत्वाची आहे. आपल्या खेड्यांपैकी 21 टक्के खेडी आणि 50 टक्के ग्रामीण घरांचं अद्याप विद्युतीकरण झालेलं नाही.

त्याचप्रमाणं. ग्रामीण आणि शहरी भागांदरम्यान दरडोई ऊर्जेच्या वापरामधेही बरीच तफावत आहे. उदाहरणार्थ, 75 टक्के ग्रामीण कुटुंब स्वयंपाकासाठी जळणावर अवलंबून आहेत, 10 टक्के शेण्या वापरतात आणि अंदाजे 5 टक्के LPG वापरतात, त्याउलट, 22 टक्के शहरी कुटुंब स्वयंपाकासाठी लाकूडफाटा वापरतात, अन्य 22 टक्के केरोसिन वापरतात आणि अंदाजे 44 टक्के लोक LPG वापरतात. त्याचप्रमाणं घरातील प्रकाशासाठी, 50 टक्के ग्रामीण घरं केरोसिनवर अवलंबून असतात आणि अन्य 48 टक्के वीजेचा वापर करतात, तर 89 टक्के शहरी कुटुंबं वीजेवर अवलंबून असतात आणि अन्य 10 टक्के केरोसिन वापरतात. स्त्रिया आपल्या दिवसातील उत्पादक वेळेतील चार तासापर्यंतचा वेळ सरपण गोळा करण्यात आणि स्वयंपाकात खर्च करतात. लहान मुलंसुध्दा सरपण गोळा करण्यात गुंतलेली राहतात.

एखाद्या राष्ट्राच्या विकासाकरिता ऊर्जेची उपलब्धता ही महत्वाची पूर्वगरज आहे. आपल्या जवळपास सर्व दैनंदिन कामांमध्ये ऊर्जा केंद्रस्थानी असते – स्वयंपाक, स्वच्छ पाण्याची उपलब्धता, शेती, शिक्षण, वाहतूक, रोजगार निर्मिती आणि पर्यावरणात्मक टीकाऊपणा.

वापरल्या जाणा-या ग्रामीण उर्जेपैकी 80 टक्के ऊर्जा ही जैवभारापासून तयार केलेली असते. त्यामुळं खेड्यांमधे आधीच लुप्त होत असलेल्या वनक्षेत्रावर प्रचंड दबाव येत आहे. अकार्यक्षम चुलींच्या वापरामुळं सरपण गोळा करण्यात गुंतलेल्या महिला आणि बालकांच्या हालअपेष्टेत ब-याचदा भरच पडते. भरीला, घरात स्वयंपाक करताना या चुलींमधून निघणा-या धुरामुळं महिला आणि बालकांच्या श्वसन आरोग्यावर मोठा विपरीत परिणाम होतो

अंतिम सुधारित : 8/17/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate