অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

स्वाभिमान व सबळीकरण योजना

स्वाभिमान व सबळीकरण योजना

 

दारिद्रयरेषेखालील भुमिहीन अनुसुचित जाती व नवबौध्द शेतमजुर कुटूंबांचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढावे व त्यांचे राहणीमानात सुधारणा व्हावी, त्याचे शेतमजुरीवर असलेले अवलंबित्व कमी व्हावे, या उदे्शाने शासनामार्फत कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबळीकरण योजना राबविण्यात येत आहे.  ही  योजना सन 2004 पासुन सुरु केली आहे.

या योजनेद्वारे अनुसुचित जाती व नवबौध्द भुमीहीन शेतमजुरांना 4 एकर कोरडवाहू किंवा 2 एकर ओलीताखालील जमीन शासकीय दराने खरेदी करुन शासनाकडून 50 टक्के अनुदान व 50 टक्के बिनव्याजी कर्ज उपलब्ध करुन देण्यांत येते.

महाराष्ट्र शासनाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय, मुंबई शासन निर्णयान्वये कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान ही महत्वकांक्षी योजना राज्यामध्ये सन 2004-05 पासून कार्यान्वित केली असून दारिद्रे रेषेखालील भुमीहीन शेतमजुरांना कुटुंबाचा उदरनिर्वाहाचे अन्य साधन नसल्याने अनुसुचित जाती व नवबौध्द भुमीहीन शेतमजुरांना शासकीय अटी पूर्ण करीत असल्यास निवड समितीने निवड केलेल्या लाभार्थ्यास 4 एकर कोरडवाहू किंवा 2 एकर ओलीता खालील जमीन शासकीय दराने खरेदी करुन शासनाकडून 50 टक्के अनुदान व 50 टक्के बिनव्याजी कर्ज उपलब्ध करुन देण्यांत येते.


संदर्भ  : शासन निर्णय क्रमांक विघयो-२००४/प्र.क्र.१२५/विघयो-२, दिनांक : ४ फेब्रुवारी २००५ ,

२. शासन निर्णय १२ मे २०१४

अंतिम सुधारित : 3/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate