महसूल प्रशासन अधिक लोकाधिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करण्यासाठी “महाराजस्व अभियान”
सर्व सामान्य जनता, शेतकरी व शेतमजूर यांचा त्यांच्या दैनंदिन कामकाज कामकाज व विविध प्रश्नांच्या संदर्भात महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय कार्यालयाशी नियमित संबध येतो. शेतकरी व सामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न त्वरित निकाली काढण्याच्या अनुषंगाने तसेच "महसूल प्रशासन अधिक लोकाधिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करण्याच्या दृष्टीने गेल्या ४ वर्षात सुवर्ण जयंती राजस्व अभियान यशस्वीरीत्या राबविण्यात आले आहे. सदर अभियानात काही नवीन लोकाभिमुख व प्रशासकीय घटकांचा समावेश करून “महाराजस्व अभियान” राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्या अनुषंगाने शासन पुढील प्रमाणे निर्णय घेत आहे
सर्व सामान्य जनता व शेतकरी यांचे महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय कार्यालयाशी संबधित दैनंदिन प्रश्न सत्वर निकालात काढणे व महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्याच्या दृष्टीने राज्यात “महाराजस्व अभियान” हा महत्वाकांक्षी कार्यक्रम सर्व जिल्ह्यामध्ये दिनांक १ ऑगस्ट, 2015 पासून राबविण्याचा शासन निर्णय घेत आहे.
शासन निर्णय क्रमांक :- मराअ 2015/प्र. क्र. 110/म-5 हा निर्णय दिनांक २९ जुलै रोजी पारित केला
सविस्तर शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा
संदर्भ : महसूल व वन विभाग, महाराष्ट्र शासन
अंतिम सुधारित : 7/12/2020
राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगातर्फे जागरुकता अभियान...
राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत यांत्रिकीकरणावर ...
जर पुढीलप्रमाणे कोणताही अनुसूचित जातीचा कोणत्याही ...
‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र...