भ्रष्टाचार येतो कोठून ?
आज आपल्यासमोरची सर्वात गंभीर समस्या आहे ती भ्रष्टाचार व लाचखोरी. भ्रष्टाचार येतो कोठून ? कुठल्याही भ्रष्टाचाराचे उगमस्थान असते व्यक्तीचा अनैतिक व्यवहार. आज समाजाची जी दुर्गती,स्वच्छंदता आणि बेशिस्त आहे तिचे कारण आहे सामाजिक नैतिक मूल्यांचा र्हास. नियमहीनता,असत्यवादीता सगळीकडे सर्रास पहायला मिळते. या दुर्दशेबद्दल व गंभीर समस्येबद्दल विचार करणे,त्याच्या निराकरणाचे उपाय शोधणे हे प्रत्येक बुद्धीजीवीचे कर्तव्य आहे. परंतु, दुर्दैव असे की भ्रष्टाचार विश्वव्यापक समस्या आहे असे म्हणून त्यावर उपाय करण्याचा विचार टाळण्याकडेच सर्वांचा कल दिसतो. असे वाटते की समाजाने भ्रष्टाचार हा जीवनाचा अविभाज्य अंग म्हणून स्वीकारला आहे की काय. या बेजबाबदार व्यवहाराला सामान्य मणुष्य जसा जबाबदार आहे त्यापेक्षा कितीतरी पटीने शासन कर्ते व शासन प्रणाली जबाबदार आहे. आज सामान्य जनतेचे कुठलेच काम लाच दिल्याशिवाय होत नसेल तर त्यांनी मतदानासाठी लाच घेतली म्हणून केवळ त्यांनाच आरोपीच्या पिंजर्यात उभे करता येणार नाही. त्यासाठी सार्या व्यवस्था, विशेषत: शासनप्रणाली नैतिकतेच्या पायावर उभी करावी लागेल. घराघरांतून, शाळांमधून नियम, व्यवस्था, अनुशासन, सत्यवादीता, पावित्र्य, आत्मशक्तीचा विकास करण्यावर भर दिला गेला पाहिजे. व्यक्तीच्या व्यवहारात सत्य उतरले तर मणुष्य सामाजिक नैतिकता प्रतिष्ठीत करु शकतो. वैज्ञानिक व तांत्रिक प्रगतीमुळे मानवाचे भौतिक जीवन सुविधापूर्ण झाले आहे परंतु मानव आतुन अधिक अशांत होत चालला आहे. कारण हेच की सदगुणांचा सदाचारांचा आजच्या जीवनात नितांत अभाव आहे. जेंव्हा नेतृत्वच स्वत: असत्त्याने वागते तेंव्हा सामान्य लोकही त्याचे अनुकरण करतात. शिडीच्या खालच्या पायर्यांवर असलेला मणुष्य भ्रष्ट होणार नाही याची काळजी वरच्या पायर्यांवरच्या प्रतिष्ठीतांनी घ्यायची असते. सामान्य जनता नेता आणि अभिनेता यांना आपला आदर्श मानते व त्यांचे अनुकरण करते. आज नेता भ्रष्ट,अभिनेता भ्रष्ट आणि आणि म्हणून जनताही भ्रष्ट अशी मानवतेच्या भविष्याच्या दृष्टीने फार भयावह परिस्थिती आहे. भ्रष्ट नेतृत्व, भ्रष्ट समाज स्त्रीच्या अब्रुचे रक्षण करु शकत नाही. यातुन बाहेर पडण्याचा प्रयत्न प्रत्येक व्यक्तीला स्वत:च करावा लागेल. कुठलातरी दैवी चचमत्कार आपल्याला यातुन सोडवील हा भाबडेपणा आपण सोडला पाहिजे.
.....
अंतिम सुधारित : 6/16/2020