Accessibility options
Accessibility options
Government of India
Contributor : बाळू निवृत्ती भांगरे07/10/2020
Skip the lengthy reading. Click on 'Summarize Content' for a brief summary powered by Vikas AI.
डॉ.आनंदीबाई जोशी - सन 1865 मध्ये कर्मठ ब्राम्हण कुटुंबात जन्मलेल्या आनंदी जोशी. त्यांचा विवाह वयाच्या अवघ्या 9 व्या वर्षी तो ही त्यांच्या वयाच्या तिप्पट वयाच्या व्यक्तीशी झाला. ज्या काळी स्त्री शिक्षणच नाही तर स्त्रियांनी घराबाहेर पडणेही निषिद्ध मानलं जात होतं, त्यावेळी सातासमुद्रापार जाऊन ज्यांनी वैद्यकीय शिक्षण पुर्ण केलं त्या डॉ.आनंदीबाई जोशी. महाराष्ट्रातील आणि भारतातीलही पहिल्या महिला डॉक्टर. आजही समाजात डॉक्टरांची कमतरता जाणवते. त्यातही महिला डॉक्टरांची संख्या अत्यल्प आहे. म्हणूनच डॉ.आनंदीबाई जोशी यांचे कार्य प्रेरणादायी ठरावे. 26 फेब्रुवारी हा त्यांचा स्मृतीदिन.
8 मार्च हा जगभर जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. स्त्रियांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, निर्णय प्रक्रियेत स्त्रियांना सहभाग घेता यावा, स्त्रियांवरील अत्याचार, कौटुंबिक हिंसाचार कमी व्हावा, स्त्रियांचे आरोग्यमान उंचावावे या सर्व समस्यांप्रती स्त्रियांमध्ये व एकूणच समाजामध्ये जनजागृती व्हावी हा जागतिक महिला दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश.
वरील दोन्ही दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाने दिनांक 26 फेब्रुवारी 2015 ते 12 मार्च 2015 हा पंधरवडा महिला आरोग्य अभियान म्हणून राबविण्याचे निश्चित केले आहे.
निरोगी महाराष्ट्र हा सार्वजनिक आरोग्य विभागाचा संकल्प आहे. समाजातील रुढी, परंपरा, अंधश्रध्दा, वैद्यकीय सुविधांचा अभाव व वैयक्तिक आरोग्याकडे दुर्लक्ष इत्यादी कारणांमुळे महिला आरोग्य दृष्ट्या जोखीम गटात मोडतात. मधुमेह रोगाचे प्रमाण अलिकडे वाढत असल्याचे आढळून येते. तसेच स्त्रियांमधील कर्करोग ही सुध्दा एक सार्वजनिक आरोग्याची समस्या बनली आहे. ग्रामीण महिलांमध्ये रक्तक्षय नेहमीच आढळून येते. मधुमेह, कर्करोग, रक्तक्षय अशा असंसर्गजन्य आजारांबद्दल जनजागृती व्हावी व अशा संशयीत महिलांचे रोगनिदान होऊन त्यांच्यावर त्वरीत उपचार करता यावेत यासाठीच महिला आरोग्य अभियानाचे नियोजन केले आहे.
सर्वसामान्य कर्करोग -कर्करोग हा 100 हून अधिक भिन्न आणि स्पष्ट रोगांचा एक गट आहे. कर्करोगाची सामान्य लक्षणे म्हणजे थकवा. अकारण वजन कमी होणे. सतत ताप येणे. मलविसर्जन प्रक्रियेत बदल. असामान्य रक्तस्त्राव किंवा स्त्राव घटृ होणे किंवा गुठळ्या होणे.
दिनांक 26 फेब्रुवारी ते 12 मार्च 2015 या कालावधीत अभियान अमंलबाजवणी खालील प्रमाणे करण्यात येणार आहे.
1. विविध आरोग्य कार्यक्रमांची जनजागृती करण्यासाठी रॅलीचे आयोजन, पथनाट्य, लोककला कार्यक्रम, महिला मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार आहे.
2. सर्व आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा रुग्णालयाचे ठिकाणी 30 वर्षावरील महिलांची असांसर्गीक रोगांसाठी तपासणी केली जाणार आहे.
3. ममता दिन म्हणजेच स्तनपान व शिशुपोषण याबद्दल महिलांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.
4. विविध पोषणयुक्त पाककृतींची प्रात्याक्षिके घेण्यात येणार आहेत.
जिल्ह्यातील गावपातळीपासून शहरांपर्यंत जास्तीत जास्त महिलांचा सहभाग घेण्यात येणार असून किशोरवयीन मुलींसाठीही मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील खाजगी वैद्यकीय व्यावसायिक व स्वयंसेवी संस्था यांनाही अभियान यशस्वी करणेसाठी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.
-जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी
आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सिंधुदर्ग
माहिती स्रोत: महान्यूज, बुधवार, २५ फेब्रुवारी, २०१५.
महाराष्ट्र राज्यात प्रत्येक जिल्हा मुख्यालयी एक याप्रमाणे ३४ जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा तालुका स्तरावर १३८ उपविभागीय प्रयोगशाळा कार्यान्वीत आहेत.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत शालेय आरोग्य कार्यक्रम राज्यात फेबु़वारी २००८ पासून राबविण्यात येत होता.
तंबाखू सेवन हे जगामधील बरेच आजार आणि मृत्युचे प्रतिबंध करता येण्यासारखे प्रमुख कारण आहे.
भारताने मृत्यू दर कमी करण्यात महत्वपुर्ण प्रगती केली आहे. मागील काही दशकामध्ये मलेरिया या रोगामुळे होणाऱया मृत्यूचे प्रमाण त्याच बरोबर माता व अर्भक मृत्युदरात घट झाली आहे.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार राज्यात जानेवारी २०११ पासून याची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
महाराष्ट्रात 21 नोव्हेंबर 2017 रोजीच्या मंत्रीमंडळ बैठकीत प्रधानमंत्री मातृ वंदना योजना लागू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. या मातृ वंदना योजनेविषयी...
Contributor : बाळू निवृत्ती भांगरे07/10/2020
Skip the lengthy reading. Click on 'Summarize Content' for a brief summary powered by Vikas AI.
74
महाराष्ट्र राज्यात प्रत्येक जिल्हा मुख्यालयी एक याप्रमाणे ३४ जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा तालुका स्तरावर १३८ उपविभागीय प्रयोगशाळा कार्यान्वीत आहेत.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत शालेय आरोग्य कार्यक्रम राज्यात फेबु़वारी २००८ पासून राबविण्यात येत होता.
तंबाखू सेवन हे जगामधील बरेच आजार आणि मृत्युचे प्रतिबंध करता येण्यासारखे प्रमुख कारण आहे.
भारताने मृत्यू दर कमी करण्यात महत्वपुर्ण प्रगती केली आहे. मागील काही दशकामध्ये मलेरिया या रोगामुळे होणाऱया मृत्यूचे प्रमाण त्याच बरोबर माता व अर्भक मृत्युदरात घट झाली आहे.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार राज्यात जानेवारी २०११ पासून याची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
महाराष्ट्रात 21 नोव्हेंबर 2017 रोजीच्या मंत्रीमंडळ बैठकीत प्रधानमंत्री मातृ वंदना योजना लागू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. या मातृ वंदना योजनेविषयी...