योजनेचा उद्देश. शासन निर्णय दिनांक 29 ऑगस्ट, 1966 अन्वये ही योजना विजाभज विद्यार्थ्यांना लागू करण्यांत आली. शासन निर्णय क्र. इबीसी-1094/प्र.क्र. 109/मावक-2, दि.17-8-1995 अन्वये ही योजना सुधारीत केली आहे. त्याचप्रमाणे शासन निर्णय दिनांक 29 ऑक्टोबर, 1996 अन्वये ही योजना विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना सुध्दा लागू करण्यांत आली आहे. माध्यमिक शाळेतील हुशार व गुणवान विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याकरिता ही योजना सुरु करण्यांत आली आहे. योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव विमुक्त जाती व भटक्या जमाती/ विशेष मागास प्रवर्ग. योजनेच्या प्रमुख अटी विद्यार्थी विजाभज / विमाप्र या प्रवर्गातील असावा. विद्यार्थी इ. 5 वी ते 10 वी मध्ये शिकणारा असावा. गतवर्षी वार्षिक परिक्षेत विद्यार्थ्यांना 50 टक्के पेक्षा जास्त गुण घेवून विद्यार्थी वर्गात प्रथम व द्वित्तीय क्रमाने पास झालेला असावा. दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप इ. 5 वी ते 7 वी मध्ये शिकणा-या विद्यार्थ्यांना दरमाह रु. 20/- प्रमाणे 10 महिन्यासाठी रु. 200/- व इ. 8वी ते 10 वी मध्ये शिकणा-या विद्यार्थ्यांना दरमाह रु.40/- याप्रमाणे 10 महिन्याकरीता रुपये 400/- शिष्यवृत्ती दिली जाते. अर्ज करण्याची पध्दत संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी पात्र विद्यार्थ्यांचे प्रस्ताव संबंधित जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद कार्यालयास सादर करावेत. बृहन्मुंबई साठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण.