<div id="MiddleColumn_internal"> <p style="text-align: justify; ">ग्रामीण/शहरी भागातील नागरिकांनी जन्म-मृत्युची घटना घडल्यानंतर संबंधित ग्रामपंचायत, नगरपालिका, कॅन्टोमेंट बोर्ड/महानगरपालिका इ. ठिकाणी जन्म-मृत्युची माहिती घटना घडल्यापासून २१ दिवसांच्या आत दिली पाहिजे.</p> <p style="text-align: justify; ">वरील मुदतीच्या आत जन्म-मृत्युची नोंद व माहिती वेळेवर देणे कायद्याने सक्तीचे आहे. वरील मुदतीत नोंद करून लगेच दाखला मागितल्यास तो मोफत मिळतो.</p> <p style="text-align: justify; ">वरील मुदतीत नोंद केली परंतु दाखला घेतला नसल्यास तो मिळविण्याकरता शासनाच्या नियमाप्रमाणे पैसे पडतात. जन्म अथवा मृत्यूचा दाखला नियमाप्रमाणे पैसे भरून पोस्टाने मागविता येतो.</p> <p style="text-align: justify; ">जन्म मृत्युची नोंद मुदतीत न केल्यास विलंब शुल्क पडते. म्हणूनच जन्ममृत्यूची नोंदणी अत्यंत महत्त्वाची आहे.</p> <p style="text-align: justify; "> </p> <p style="text-align: justify; ">स्त्रोत : जन्म मृत्यू नोंदणी माहिती व शिक्षण मार्गदर्शक पुस्तिका वॉटरशेड ऑगनायझेशन ट्रस्ट</p> </div>