आपण एखाद्या अपप्रववृत्तीच्या व्यक्तीला सहज बोलतो ‘काय रे बांडगूळ आहेस.’ खरच या वाक्यात एक मतितार्थ दडलेला आहे. तो समजावून घेतला पाहिजे. जो दुसर्याच्या जीवावर जगतो आणि फोफावतो त्याला ‘बांडगूळ’ असे म्हटले जाते. माणसाच्या बाबतीत झाडावरील परोपजीवी वनस्पतीवरूनच हे बोलले जाते.
बहुतांशी आंब्याच्या झाडाच्या फांद्यांवर, शेंड्याकाच्या बाजूला दुसरीच वनस्पती बंच पद्धतीने वाढलेली दिसते.हिचे प्रमाण जास्त असेल तर शेंड्याकाठच्या सर्वच फांद्यावर या परोपजीवी वनस्पतीने आपले साम्राज्य पसरवलेले दिसते.अशा या दुसर्याच्या जीवावर जगणाऱ्या म्हणजेच परोपजीवी वनस्पतीला ‘बांडगूळ’ या नावाने ओळखले जाते.
बांडगूळाची वैशिष्ट्य म्हणजे याला फळे येऊन त्यात बी तयार होते. हि वनस्पती पूर्णतः निरोगी असते. हिची पाने मोठी आणि सतेज असतात. बंच पद्धतीने अतिशय कमी कालावधीत वाढते. बांडगूळ या वनस्पतीच्या मुळ्या मूळ झाडाच्या खोडातील अन्नास, पाणी शोषून घेऊन स्वतः झपाट्याने वाढतात. त्यामुळे मूळ झाड कमकुवत होते. अनुउत्पादक होते आणि बांडगूळ मात्र फोफावते. असे आंब्याच्या मोठ्या झाडावर बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळते. आंब्याशिवाय इतर प्रकारच्या झाडांवर सुद्धा अशी बांडगुळे दिसतात. बांडगूळ म्हणजे मूळ झाडाचा शत्रू किंवा एक कीडच असते. याचे निर्मुलन करण्यासाठी जिथून बांडगूळ वाढायला सुरवात झाली आहे, त्या पाठीमागे फुटभर अंतरावरून ती फांदीच छाटून टाकली असता त्या बांडगूळाचे निर्मुलन होऊ शकते. मात्र एका वेळी झाडावरची सर्व बांडगुळे छातावीत.
बांडगूळावर कोणत्याही प्रकारच्या किडीरोगांचा प्रादुर्भाव होत नाही. शिवाय यांच्यात औषधी गुणधर्म आहेत का, हे तपासणे महत्वाचे आहे. विशेष म्हणजे याच्यावर संशोधन होणे अतिशय गरजेचे आहे.
अमरवेल हि पर्णविरहित, पिवळसर, हंगामी मुळशीवाय वेलीच्या स्वरुपात धाग्याप्रमाणे ठराविक वनस्पतींच्या खोडावर फांद्यावर वाढून त्या वनस्पतीला अन्नांश शोषणारी पूर्णतः परोपजीवी वनस्पती आहे. यात प्रचंड बीजनिर्मिती क्षमता असून हे बीज पाण्याशिवाय ८ ते १० वर्ष सातत्याने उगवते. कुंपणावर, घास, फांद्यांवर साखळी स्वरुपात वाढते. न मारणारी म्हणून हि अमरवेल. मुळ्या नसल्याने हिला निर्मूळी असंही म्हणतात. बी असतं लहान, हलकं तपकिरी रंगाचं १ सें. मी. लांबीचं आखूड मूळ सदृश्य असून यजमान पिकांशी संपर्क आला कि त्याच्या होस्टोरिया या अवयावाद्वारे यजमान पिकाच्या खोडात, फांद्यात, पानात घुसून स्वतः साठी त्या झाडतला अन्नरस शोषण करतात. अशा या अमरवेलाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ५% मिठाच्या पाण्याची बियांवर प्रक्रिया करावी.
शेणखत, कंपोस्ट खत अमरवेल विरहीत असावं. कृषीऔजारं स्वच्छ धुवावीत. अमरवेलाचा प्रसार करणाऱ्या पाण्याचा, मातीचा, जनावरांचा, माणसांचा वावर कमी करावा.
याचा प्रसार होऊ नये म्हणून नांगरट करावी. भात, गहू, मका, ज्वारी, बाजरी, नाचणी, कापूस हि अमरवेलविरोधी पिकं घ्यावीत.
अमरवेल फुलं आणि बीजनिर्मिती अगोदर काढून जाळून टाकावा. ३३ मिली पेंडीमिठीलीन ६ लिटर पाण्यातून फवारावे अगर वाळूत मिसळून एकसारखं पसरावं.
अशा पद्धतीने अमरवेल या परोपजीवी वनस्पतीच नियंत्रण करावं. कारण याच्यामुळे उत्पादन घटतं, प्रत खालावते. याचं नियंत्रण वेळीच केलं नाही तर हि वेल प्रचंड वाढते. पूर्ण पिकं धोक्यात येते म्हणून वेळीच बंदोबस्त करावा.
स्त्रोत - कृषी प्रवचने, प्रल्हाद यादव
अंतिम सुधारित : 6/28/2020