অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

उन्हाळी पीके जगविण्याचे मार्ग

उन्हाळी पीके जगविण्याचे मार्ग

उन्हाळ्यात विविध प्रकारची पिके घेतली जातात. उष्ण हवा, कोरडे हवामान, आणि सोसाट्याचा वर यामुळे पाण्याचे बाष्पीभवन जोरात होते. त्यामुळे जमिनीतली ओल इतर हंगामापेक्षा उन्हाळ्यात लवकर कमी होते. त्यामुळे पाणी लवकर द्यावे लागते, पाळ्याही जास्त द्याव्या लागतात. म्हणजे दुपटीपेक्षा जास्त पाणी द्यावे लागते. मात्र पाण्याची उपलब्धता कमी असते. अशा अवघड स्थितीत पिकांना पाणी देताना फारच काळजी घ्यावी लागते.

काटकसरीने पाणी वापरण्यासंबंधी काळजी घ्यावी लागते

    मध्यम ते भारी जमिनीची जलधारा शक्ती जास्त असल्याने अशा जमिनीत उन्हाळी पीके घ्यावीत.

    पाण्याची उपलब्धता पाहूनच कमी पाणी लागणाऱ्या पिकांची लागण करावी. पाण्याचा अपव्यय टाळावा. पाट स्वच्छ ठेवावेत. रान बांधणी सहजपणे पाणी बसेल अशा पद्धतीने करावी.

    उन्हाळ्यात पिकांच्या शिफारशीप्रमाणे योग्य जात, रोपांची संख्या, योग्य खतमात्रा, कीड-रोग नियंत्रण, तणांचा बंदोबस्त याकडे काश देणे आवश्यक आहे.

    पिकाला क्षेत्राच्या सर्व क्षेत्रावर सम-प्रमाणात पाणी बसवण्यासाठी योग्य रानबांधणी करावी, भुईमुग, मुग, घासासारख्या, पिकांना थोडा ढाळ असलेले ३ मीटर रुंदीचे आणि २५ ते ३० मीटर लांबीचे सारे करून पाणी द्यावे.

    बश्पिभावानाची क्रिया कमी करण्यासाठी सेंद्रिय मटेरियल उष्टावळ, पालापाचोळा, निकृष्ठ गवत, पाचट-वेगवेगळा खाण्याअयोग्य भुसा-भुसकट, प्लास्टिक कागद यांचे पिकामध्ये आच्छादन करावे. आच्चादानामुळे ३०-४०% पाण्याची गरज कमी होते.

 

स्त्रोत - कृषी प्रवचने, प्रल्हाद यादव

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate