অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

वापरा भरखते आणि जोर खते

भरखतांच्या वापराने जमिनीची घडण सुधारते, जलधारणशक्ती वाढते. जोर खतामध्ये पोषणद्रव्याचे प्रमाण अधिक असते. हे लक्षात घेऊन जमिनीत अन्नद्रव्यांचे प्रमाण योग्य ठेवण्यासाठी विविध एकात्मिक खतांचा संतुलित वापर करणे आवश्‍यक आहे.

भर खते -

पोषणद्रव्यांचे प्रमाण कमी असल्याने भर खते मोठ्या प्रमाणात वापरावी लागतात. तसेच ही खते पिकांना सावकाशपणे लागू पडतात. भरखते वापरल्याने जमिनीच्या प्राकृतिक गुणधर्मात सुधारणा होते. त्यामुळे जमिनीची घडण सुधारते, जलधारणशक्ती वाढते. जमिनीचे आरोग्य सुधारते.

जोर खते -

यात पोषणद्रव्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे ही खते कमी प्रमाणात द्यावी लागतात. उदा. सर्व प्रकारच्या पेंडी, हाडांचा चुरा, मासळी खत इत्यादी.


सेंद्रिय खतातील प्रमुख अन्नद्रव्यांचे प्रमाण


हिरवळीच्या खतासाठी ताग, शेवरी, चवळी, गवार किंवा धैंचा ही पिके घ्यावीत. पेरणीनंतर एक ते दीड महिन्याने जमिनीत गाडावीत. गिरिपुष्प व सुबाभूळ याचा पाला सुद्धा हिरवळीच्या खतासाठी वापरता येतो. हिरवळीच्या खतापासून हेक्‍टरी 60-90 किलो नत्र मिळते. जिरायती अथवा कोरडवाहू क्षेत्रात पाच टन प्रति हेक्‍टर आणि बागायत क्षेत्रात 10 टन प्रति हेक्‍टर सेंद्रिय खते द्यावीत.

 

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate