पुणे - महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) नाडेफ कंपोस्ट खत, गांडूळ खत, द्रवरूप सेंद्रिय खतनिर्मितीमध्ये सातारा जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. राज्यभरात सध्या सुमारे दीड हजार टाक्या बांधण्याचे काम सुरू असून, सातारा जिल्ह्यात सर्वाधिक 856 गांडूळ खत टाक्या व 400 नाडेफ टाक्या बांधण्यात आल्या आहेत.
पुणे विभागातील सातारा आणि सांगली या दोनच जिल्ह्यांमध्ये महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत सेंद्रिय खतनिर्मितीची कामे हाती घेण्यात आली आहेत. सातारा जिल्ह्यामध्ये 400 नाडेफ कंपोस्ट टाक्यांचे काम पूर्ण झाले असून, 85 कामे प्रगतिपथावर आहेत. गांडूळ खत टाक्यांची 856 कामे पूर्ण, तर 226 कामे सुरू आहेत, तर सात शेतकऱ्यांनी संजीवके निर्मितीचे खड्डे तयार केले आहेत. सांगली जिल्ह्यात नाडेफची आठ कामे पूर्ण झाली आहेत, तर 24 गांडूळ खत टाक्यांची उभारणी करण्यात आली. विभागातील इतर जिल्ह्यांत एकही काम हाती घेण्यात आलेले नाही, अशी माहिती पुणे विभागाचे अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी दिली.
कृषी उत्पादन वाढीस हातभार लागावा, सेंद्रिय, जैविक खते तयार होण्यास मदत व्हावी, जमिनीची उत्पादकता वाढून मातीचे आरोग्य सुधारावे, यासाठी सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी केंद्र सरकारमार्फत ही योजना राबविण्यात येत आहे. यात वैयक्तिक लाभातून नाडेफ खत टाकी, गांडूळ खत टाकी द्रवरूप सेंद्रिय खत (संजीवके) टाकी बांधण्यासाठी मजुरीकरिता 25 टक्के, तर बांधकाम व इतर साहित्यासाठी 75 टक्के या प्रमाणात निधी दिला जातो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमीचे जॉब कार्डधारक शेतकरी व ग्रामसभेचा ठराव असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी ग्रामपंचायत कार्यालय, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा
""राज्यात सेंद्रिय खतनिर्मितीसाठी टाक्या बांधण्याची एक ते दीड हजार कामे सुरू आहेत. बांधकाम व इतर साहित्यासाठी (कुशल) जास्त निधी दिला जातो. तुलनेत मजुरीसाठी (अकुशल) कमी पैसे मिळत असल्याने ही कामे कमी प्रमाणात सुरू आहेत.''
- उदय पाटील, उपायुक्त, मनरेगा, महाराष्ट्र राज्य
टाकीचा प्रकार --- आकार (लांबी - रुंदी - उंची मीटरमध्ये) --- अनुदान (रुपये, प्रति लाभार्थी) --- क्षमता
नाडेफ कंपोस्ट खत टाकी --- 3.60 - 1.50 - 0.90 --- 8000 --- 2.5 ते 3 टन
गांडूळ खत टाकी --- 40 - 1.15 ः 0.60 --- 9000 --- 0.15 टन
द्रवरूप जैविक खत, संजीवके, अमृतपाणी खड्डा --- 1 - 1 - 1 --- 2000 --- 1 हजार लिटर
स्त्रोत: अग्रोवन५एप्रिल२०१४
अंतिम सुधारित : 10/7/2020
उगम ग्रामीण विकास संस्थेमार्फत हिंगोली शहरात जिल्ह...
ऊसतोडणी झाल्यानंतर पाचट जाळून न टाकता तो एक आड एक ...
पुणे येथील राजलक्ष्मी भोसले यांनी आपल्या 35 गुंठे ...
जमिनीच्या पृष्टभागावर पिकांच्या बुंध्याभोवती सेंद्...