माशांच्या संवर्धनामध्ये विद्राव्य प्राणवायू महत्त्वाचा घटक आहे.
प्राणवायू मोजण्याकरिता ऑक्सिजन मीटर बाजारात उपलब्ध असतो. तलावातील प्राणवायूचे प्रमाण हे पाण्याचे तापमान हवेशी पाण्याचा संपर्क यावर अवलंबून असते. तापमान वाढले की पाण्याची ऑक्सिजन साठविण्याची क्षमता कमी होते. तसेच पाण्यात कुजणाऱ्या घटकांचे प्रमाण जास्त असेल तर पाण्यातील प्राणवायूच्या प्रमाणात घट होते. पाण्यामध्ये प्राणवायूची वृद्धी ही वनस्पती प्लवंगाच्या प्रकाश संश्लेषणाद्रारे होते.विद्राव्य प्राणवायूची मर्यादा ५ ते १० मिली. ग्रॅम इतकी असावी प्राणवायूचे
प्रमाण कमी झाल्यास तलावात नवीन पाणी सोडावे एरेटर्सचा वापर करावा.खत आणि खाद्याची मात्रा कमी करावी खते मत्स्यसंवर्धनासाठी सेंद्रिय आणि रासायनिक अशी दोन्ही प्रकारची खते वापरली जातात. माशांच्या वाढीसाठी तलावात वनस्पतिजन्य आणि प्राणिजन्य प्लवंगाची आवश्यकता असते मत्स्यशेतीमध्ये ताजे शेण, युरिया, सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर केला जातो. शेणखत ५०० किलो ग्रॅम प्रती हेक्टर युरिया व सुपर फॉस्फेट
१०० किलो ग्रॅम प्रती हेक्टर याप्रमाणे खतांची मात्रा द्यावी. चुन्याची मात्रा ५०० किलो ग्रॅम प्रती हेक्टर प्रमाणे मत्स्यबीज संगोपनापूर्वी द्यावी चुन्यामुळे तलावाच्या तळाशी असलेले विषारी वायू नष्ट होतात. आम्लाचा निर्देशांक वाढून तो स्थिर राहण्यास मदत होते. पाण्यात असणारे अतिरिक्त जैविक घटक चुन्यामुळे मोकळे झाल्यामुळे वनस्पती व प्राणी प्लवंगाची वाढ मुबलक प्रमाणात होते रोग होण्याची शक्यता कमी होते. किड्यांचा नायनाट
मत्स्यसंवर्धन तळ्यात पान किड्यांचा विशेषतः त्यांच्या अळ्यांचा फार उपद्रव होतो. म्हणून बीज सोडण्यापूर्वी बारीक आसाच्या जाळ्याने प्रथम पाणी काढून टाकणे जरुरीचे असते. वरील उपायाने किडींचा नायनाट झाला नाही तर बीज सोडण्याच्या आदल्या दिवशी वारा अगदी कमी असेल अशा वेळी इमल्शनचा फवारा मारावा त्यामुळे त्याचा पातळ तवंग पाण्याच्या पृष्ठभागावर जमेल या तवंगामुळे किड्यांच्या श््वसनात अडथळा येऊन ते मरून पृष्ठभागावर येतात एक लीटर डिझेल ४० मि.ली. पाणी
व दहा ग्रॅम डिटर्जंट पावडर घेऊन इमल्शन तयार करावे हे इमल्शन फवारणी पंपाने किंवा किनाऱ्याने सर्व बाजूंनी शिंपडावे इमल्शनमुळे चार ते पाच तासात किडे मरतात जर पुन्हा किडे दिसून आले तर पाच ते सात दिवसांनी पुन्हा इमल्शन वापरावे या इमल्शनमुळे बेडकांच्या पिल्लांचा पण नायनाट होतो. खाद्य शेंगदाणा, सोयाबीन यांची पेंड, गिरणीतील पीठ, भाताचा कोंडा माशांच्या खाद्याकरिता वापरले जाते हे सर्व पदार्थ रात्री भिजत ठेवून सकाळी खाद्याची मात्रा द्यावी. सुरुवातीला त्यांना त्यांच्या
वजनाच्या दहा टक्के प्रमाणे खाद्य द्यावे. माशांच्या वाढीप्रामणे खाद्याचे प्रमाण टप्प्याटप्प्याने दोन टक्क्यांवर आणावे .खाद्य दिवसातून दोन ते तीन वेळा द्यावे.
लेखक- श्रीकांत वारुंजीकर
स्रोत- शेतकरी मासिक
अंतिम सुधारित : 6/5/2020