उदयगिरी आहे. या दोन्ही टेकड्यांवर इ. स. पू. दुसऱ्या शतकातील कलिंगराज खारवेलकालीन सुविख्यात व महत्त्वपूर्ण जैन गुंफासमूह आहे.
समोरासमोरच्या या दोन टेकड्यांच्या नावांवरूनच हे गुंफासमूह ‘उदयगिरी- खंडगिरी’ या संयुक्त नावाने ओळखले जातात.
वर्धमान महावीराच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या दोन्ही टेकड्या जैनांचे ‘अतिशयक्षेत्र’ म्हणून विख्यात आहेत. प्राचीन साहित्यातही याचा अनेकदा उल्लेख आढळतो.
येथील प्रमुख गुंफा:
(१) तात्वा गुंफा १ आणि २;
(२) अनंतगर्भ;
(३) खंडगिरी;
(४) त्रिशूळ;
(५) ललाटकेंद्र;
(६) तेंतुली;
(७) धानगर;
(८) नवमुनी;
(९) बारभुजी;
(१०) इंद्रकेसरी या होत.
यांशिवाय येथे आकाशगंगा, गुप्तगंगा, शाम आणि राधा आदी पाच जलकुंडे, तसेच टेकडीच्या शिखरावर एक जैनमंदिर व भग्नावस्थेतील काही जैन स्तूप आणि गुंफा आहेत. उदयगिरी ३४ मी. व खंडगिरी ४० मी. उंच असून टेकड्यावरून अलौकिक सृष्टिशोभा दिसते.
शाह, र. रू.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020