सातारा शहरापासून ३६ कि.मी.अंतरावर हा धबधबा आहे.पावसाळ्यामध्ये या धबधब्याला भेट म्हणजे एक सुखद रोमांचकारक अनुभव आहे. विविध भागातून पर्यटक इथे भेट देतात व धबधब्याचा आनंद मनमुराद लुटतात.
समुद्र सपाटीपासून सुमारे ३५०० फुट उंच असलेल्या कास पठाराची निर्मिती सन १८४४ मध्ये झाली. कास तलाव हा सातारा शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारा मुख्य स्त्रोत आहे. कासचे सातारा शहरापासून अंतर २२ कि.मी.आहे. हे तरुण पिढीला आकर्षित करणारे स्थळ असल्याने सहलीसाठी तरुणाईची येथे गर्दी असते.
कराड शहर हे कृष्णा आणि कोयना नदीच्या संगमावर वसलेले आहे. कृष्णा आणि कोयना नदीच्या संगमावर कृष्णा नदीच्याकाठावर कै. यशवंतराव चव्हाण (भारताचे माजी उप पंतप्रधान) यांची समाधी आहे. येथे कृष्णामाई मंदिर, उंच मिनार इ. प्रसिद्ध ठिकाणे आहेत. कराड शहरालगतच प्राचीन बुद्धकालीन लेण्या असलेला आगाशिवचा डोंगर आहे.
स्रोत: http://satara.nic.in/htmldocs/other_tourist_places_mar.htm
अंतिम सुधारित : 6/7/2020
हा मुरबाड तालुक्यातील (ठाणे जिल्हा) सह्याद्रीच्या...
अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा हे प्रमुख पर्यटनस्थळ आ...
रायगड हा समुद्रतळाहून सुमारे ८२० मीटर अंदाजे २७०० ...
हरिश्चंद्रगड किल्ला – ४००० फुट उंचीचा हा किल्ला गि...