निग्नोक्त मगधाच्या पूर्वेकडील देश. यात विद्यमान भागलपूर व मोंघीर जिल्ह्यांतील समावेश होतो. याची राजधानी चंपा ही चंपा व गंगा या नद्यांच्या संगमावर वसली होती. गौतम बुद्धाच्या काळापर्यंत हिची भारतातील सहा प्रमुख नगरांमध्ये गणना होत असे. येथून पूर्वेकडील सुवर्णभूमीसारख्या बृहद्भारतातील देशांशी व्यापार चाले. मगधाचा युवराज बिंबिसार याने या देशाचा शेवटचा राजा ब्रह्मदत्त यास ठार मारून अंगाला मगधाच्या साम्राज्यात समाविष्ट केले.
वारणा आणि असी यांनी वेष्टिलेल्या आणि म्हणून वाराणसी नावाने प्रख्यात झालेल्या नगराच्या सभोवतालचा प्रदेश काशी नावाने प्रसिद्ध होता. काशीच्या राजांची कोसल, मगध आणि अंग देशांच्या राजांशी वारंवार युद्धे होत.
शेवटी कोसलच्या कंस नामक राजाने गौतम बुद्धाच्या कलापूर्वी काशी नगरी जिंकून आपल्या राज्यात सामील केली.
वृज्जींनी संघराज्य केले होते. त्यात विदेह, लिच्छवी, ज्ञातृक इ. आठ-नऊ गणांचा समावेश होता. या संघराज्यांची राजधानी वैशाली (वसाड−मजफरपूर जिल्हा) ही होती. वैशालीच्या चेल्लना या राजकुमाराशी विवाह केल्यावर हे वैर संपुष्टात आले.
हा देश महाभारतकालीही प्रसिद्ध होता. कुकुत्था (सध्याच्या कुकू) नदीने याचे दोन भाग केले होते. एकाची राजधानी कुशीनगर (विद्यमान गोरखपूर जिल्ह्यातील कसिया) आणि दुसऱ्याची पावा ही होती. पावा कसियाच्या उत्तरेस सु. २० किमी. वर असलेले पदरवना हे होय. कुशीनगर येथे त्याचे गमराज्य झाले. शेवटी गौतम बुद्धाच्या कालांनंतर त्याचा मगधाच्या साम्राज्यात समावेश झाला. मनुस्मृतीत लिच्छवी आणि मल्ल यांना व्रात्य क्षत्रिय म्हटले आहे.
सध्याचे बधेलखंड. याची राजधानी शुक्तिमती ही होती. दक्षिणेत याचा विस्तार नर्मदेपर्यंत होता. कलिंगदेशाचा सुप्रसिद्ध राजा खारवेल हा चेदी कुलातील होता.
युमनेच्या काठचा प्रदेश. याची राजधानी यमुनेच्या दक्षिण तीरावरची कौशाम्बी (सध्याचे कोसम) ही असून गौतम बुद्धाच्या काली उदयन राजा राज्य करीत होता.
अवतीच्या प्रद्योत राजाने त्याला कपटाने पकडून आपल्या राजधानीत आणले आणि आपली कन्या वासवदत्ता हिच्या वीणावादनाचा शिक्षक केले; पण त्याने तिच्यासह प्रद्योताला नकळत आपल्या देशास प्रयाण केले. पुढे त्याच्या या प्रणयकथेवर अनेक संस्कृत नाटके रचली गेली.
या देशामध्ये उत्तरेस हिमालयापासून दक्षिणेस चंबळा नदीपर्यंतचा प्रदेश अंतर्भूत होता. गंगा नदीचे याचे उत्तर पंचाल आणि दक्षिण पंचाल असे विभाग झाले होते.
पहिल्याची राजधानी अहिच्छत्र (बरेली जिल्ह्यातील रामनगर) आणि दुसऱ्याची काम्पिल्य (फरुखाबाद जिल्ह्यातील कम्पील) ही होत. काम्पिल्याचा राजा ब्रह्मदत्त याचा उल्लेख संस्कृत, बौद्ध व जैन ग्रंथांत येतो. पुढे ख्रिस्तोत्तर सहाव्या शतकात तेथे गणराज्य स्थापन झाले.
यामध्ये चंबळा आणि सरस्वती या नद्यांमधील प्रदेश समाविष्ट होता. याची राजधानी विराटनगर (पूर्वीच्या जयपूर संस्थानातील वैराट) ही होती. बौद्धकालात हा प्रदेश मगध साम्राज्यात सामील झाला होता.
हे गोदावरीच्या दक्षिणेस होते.
राजधानी पोतन किंवा पोदन (सध्याचे बोधन). गोदावरीच्या उत्तरेस मूलक देश होता. त्याची राजधानी प्रतिष्ठान (पैठण) होती. गौतम बुद्धाच्या काळाच्या अश्मक राजाच्या सुजात नामक पुत्राच्या उल्लेख बौद्ध वाङ्मयात येतो. अवंतीया देशाची राजधानी उज्जयिनी होती.
तेथे बौद्धकाली प्रद्योत राजा राज्य करीत होता. त्या काळच्या प्रबळ राजांत त्याची गणना होत असे. प्रद्योताची स्वारी होईल, या भीतीने अजातशत्रूने राजगृहाची तंटबंदी सदृढ केली होती. याच्या पालक नामक मुलाच्या कारकीर्दींत राज्यक्रांती झाली. त्या घटनेवर शूद्रकाच्या मृच्छकटिक नाटकाचे संविधानक आधारित आहे.
संदर्भ : 1. Majumdar, R. C. Ed. The Age of Imperial Unity, Bombay, 1972.
2. Raychaudhari Hemchandra, Ed. Political History of Ancient India, Calcutta, 1972.
मिराशी, वा. वि.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 2/4/2020