मागील दशकापासून संगणकीय तंत्रज्ञानाने विद्यार्थ्यांच्या शिक्षण प्रक्रियेत महत्वाची भूमिका बजावायला सुरूवात केली. सर्व शिक्षा अभियान कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्य सरकारने जिल्ह्यांतील अनेक शाळांमध्ये संगणकाधारित शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली. संगणकीय तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण उत्पादकता तसेच शिक्षकांची परिणामकारकता वाढवणे आणि विद्यार्थ्यांमध्ये अध्ययनक्षमता विकसीत करणे, हा संगणकाधारित शिक्षणाचा मुख्य हेतू आहे. आकर्षक चित्रे, चलतचित्रे, संगीत आणि निवेदनाच्या आधारे आपला विषय अधिक प्रभावीपणे शिकवण्यासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याची सोय संगणकाधारित शिक्षणाव्दारे उपलब्ध होते.
2011-12 या वर्षात राज्यातील 5251 शाळांमध्ये संगणकाधारित शिक्षण राबवण्यात आले आणि त्यासाठी 14000 पेक्षा जास्त शिक्षकांना प्रशिक्षित करण्यात आले. साडेसात लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना या संगणकाधारित शिक्षणाचा लाभ मिळाला.
स्त्रोत : महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद
अंतिम सुधारित : 3/4/2020
साक्षरतेच्या राष्ट्रीय प्रमाणापेक्षा स्त्री साक्षर...
अकोल्यातील मुर्तीजापूर तालुक्याच्या निंभा गावातील ...
2007 साली स्वातंत्र्यदिनी प्रधानमंत्र्यांनी केलेल्...
राष्ट्रीय संरक्षणासाठी ज्या जवानांनी लष्करी सेवा क...