অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

व्यायाम करताय? तर ही खबरदारी घ्या! - भाग-२

तुम्ही जर सतत व्यायाम करीत असाल तर खूप सुंदर गोष्ट आहे. पण हाच व्यायाम योग्य विश्रांती न घेता चालू ठेवला तर ही एक चिंतेची बाब आहे. नियमित व्यायाम करणे, त्याचा वेग आणि वेळ वाढवणे उचित आहे. पण व्यायामाचा अतिरेक विपरीत परिणाम करु शकतो. योग्य व्यायाम आणि योग्य विश्रांती ही अनिवार्य आहे.

व्यायाम, म्हणजेच शरीरास अधिक परिश्रम. हे परिश्रम घातक ठरू शकतात. जबरदस्तीचे शारीरिक आणि मानसिक ताण तुम्हाला आजारी करू शकतात. तुम्ही अतिरिक्त परिश्रमाने ग्रस्त होऊ शकता. हे कसे घातक असू शकते ते मोजक्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न या लेखात केला आहे.

यकृतामधील साखरेसारखा पदार्थाचा साठा कमी होतो

यकृतामधील साखरेसारखा पदार्थ आपल्या शरीरातील ऊर्जास्त्रोत आहे. त्यामुळे आपले स्नायू अधिक लवकर थकतात आणि आपल्याला अशक्त वाटते.

ताण हार्मोन्झ

ताण हार्मोन्झ हे शरीरासाठी अपायकारक आहेत. यामुळे व्यायाम करूनही वजन कमी होत नाही. ते शरीरातील चरबी धरून ठेवतात. शरीरातील सैनिक पेशी शत्रू पेशीशी लढू शकत नाही आणि आपली रोगप्रतिकार शक्ती खालवते. त्यामुळे जास्त व्यायाम, विश्रांती न घेता केला की आपण आजारी पडू शकता.

हृदयावर ताण

हृदयाची विश्रांती आणि काम करण्याची गती वाढते. त्यामुळे हृदयावर ताण येतो आणि तो आपली क्रिया नीट पार पडू शकत नाही. रक्ताचे शुद्धीकरण नीट होत नाही. या सर्व गोष्टींचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो.

कार्यक्षमता खालावते

कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो. अधिक प्रमाणात शरीराची झीज, आपली कार्यक्षमता कमी करते. सततचे व्यायाम आपल्या मांसपेशी, स्नायू आणि शरीराला कमजोर करतात. विश्रांती न घेतल्यामुळे नवीन मांसपेशी तयार होत नाहीत. फक्त त्यांचा वापर आणि घासण होत राहते. परिणामी तुम्ही शरीराने आणि मनाने कमकुवत होता.

स्नायू गमावता

रोजचा व्यायाम म्हणजे रोजच स्नायूची घासाघीस. जेव्हा तुम्ही विश्रांती घेता, तेव्हा स्नायू स्वतःला पूर्ववत करण्यात रमतात. ते शरीरातील ऊर्जा वापरून परत कामासाठी सज्ज होतात. पण जर तुम्ही विश्रांती घेणे टाळले किंवा विश्रांती नाही घेतली तर या सर्व प्रक्रियेत खंड पडतो. त्यामुळे तुम्हाला ताजेतवाने वाटत नाही. शरीर खूप थकते आणि चिडचिड होते.

अशक्त वाटणे

मांसपेशी आणि स्नायू यांची जडणघडण ही एक आवश्यक शारीरिक प्रक्रिया आहे. काम केल्याने मांसपेशी खर्च होतात आणि विश्रांती घेताच पूर्ववत होतात. पण नियमित वापर आणि खरच त्यांना कमजोर बनवतात. शिवाय विश्रांती वगळल्यामुळे त्यांना पूर्ववत होता येत नाही. या सर्वांचा परिणाम म्हणजे स्नायुंना आणि मांसपेशींना सूज. त्यामुळे तीव्र शारीरिक वेदना होत राहतात. शरीर संपत आहे अशी भावना निर्माण होते. मानसिकदृष्ट्या आपण कमकुवत बनता.

मानसिक तणाव

शरीर आणि मन हे दोघे खूप घनिष्ट मित्र आहेत. त्या दोघांचा एकमेकांवर खूप परिणाम होतो. शरीर आजारी तर मन आजारी आणि मन दु:खी तर शरीर दु:खी. याच तत्वामुळे शरीराची जास्त झीज झाली की मनाची झीज सुरु होते. आपला आत्मविश्वास कमी होतो. आपल्याला प्रसन्न वाटत नाही. कुठल्याही गोष्टीत रस उरत नाही. सारखा ताण आणि राग येत राहतो. आपले मानसिक खच्चीकरण होते.

हे सर्व टाळता येऊ शकते. योग्य व्यायाम आणि भरपूर विश्रांती, हा गुणमंत्र आहे. त्यामुळे तुमचे शरीर आणि मन दोन्हीही स्वस्थ राहतील. तुम्हाला नवीन ऊर्जा मिळेल आणि तुम्ही सुंदर दिसाल. हॅप्पी ट्रेनिंग.

लेखिका - सुजाता चंद्रकांत.
ईमेल : sujatacbn@gmail.com

स्त्रोत : महान्युज

अंतिम सुधारित : 7/8/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate