विटा-२
महाराष्ट्र राज्याच्या सांगली जिल्ह्यांतील खानापूर तालुक्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या ३२,०१८ (१९९१). सातारा शहराच्या आग्नेयीस सु. ७५ किमी., कराडच्या पूर्वेस ४२. तर तासगावच्या उत्तरेस २९ किमी. वर हे असून तालुक्याच्या साधारण मध्यवर्ती व विटा आणि येरळा नद्यांदरम्यानच्या काहीशा खोलगट भागात ते वसलेले आहे