पाण्याचे आपल्या जीवनात अनन्यासाधारण महत्व आहे. ते पाणी आपल्यापर्यंत पोहोचवते वीज. पाण्याबरोबरच विजेचे पण आपल्या जीवनात महत्वाचे स्थान आहे. वीज तयार करण्यासाठी नैसर्गिक साधन सामग्रीचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे.
या साधन सामग्रीच्या अतिरिक्त वापरामुळे वातावरणावर विपरीत परिणाम होतो. पर्यावरणाचे समतोल राखण्यासाठी पर्यायी उर्जा स्त्रोतांचा वापर करणे गरजेचे झाले आहे. भारतासारख्या देशात ८ महिने कडक उन असते त्यामुळे निसर्गाकडून या स्त्रोताचा वापर करून वीज निर्मिती करणे शक्य आहे. त्यामुळे वातावरणाचा समतोल साधला जाईल.
या माहितीपटात सौर उर्जेवर चालणाऱ्या पंपाची माहिती दिली आहे.
हा माहितीपट वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट या संस्थेने आपल्या प्रकल्प गावामध्ये बसविलेल्या सौर पंपावर आधारित बनवला आहे.
स्त्रोत : वॉटर, पुणे
अंतिम सुधारित : 10/7/2020
पवन ऊर्जा, सौर ऊर्जा, लघुजल विद्युत सहवीज निर्मिती...
आजच्या जीवनामध्ये उर्जेचे अनन्य साधारण महत्त्व आहे...
मानवाच्या विकास उन्नतीमध्ये विद्युत ऊर्जेला अत्यंत...
नवीन व पुर्नवापरायोग्य ऊर्जा मंत्रालय मोठ्या शहरां...