आपल्याकडील खेड्यांमध्ये पिकाची कापणी झाल्यानंतर शेतीशी संबंधित अनेक प्रकारच्या वस्तू शिल्लक राहतात. विशेष उपयोगी नसलेल्या गोष्टी आपण उघड्यावर जाळून टाकतो. परंतु कोळसा (चारकोल) ब्रिकेटिंग तंत्रज्ञानाचा वापर करून ह्याच जैववस्तूंपासून (बायोमास) पर्यावरणासंवादी व फायदेशीर पर्यायी इंधन तयार करता येते. ह्यामधून एखाद्या कुटुंबास उत्पन्नाचे साधनही मिळू शकते.
एम.सी.आर.सी. च्या पद्धतीने चारकोल ब्रिकेटिंग करणे
१. स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार्या जैववस्तू (झाडांची पाने, उसाचे पाचड, भाताची तुसे, नारळाच्या शेंड्या, भुईमुगाची टरफले इ.)
२ कार्बनायझिंग चेंबर (भट्टी)
३ बंधक म्हणजेच सर्व घटक धरून ठेवणारा पदार्थ (स्टार्च अथवा रताळ्याचे पीठ)
4 ब्रिकेटिंगचे छोटे यंत्र (१० किग्रॅ प्रति तास)
स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या जैववस्तू गोळा करून त्यांची वर्गवारी करणे, मोठ्या आकाराच्या वस्तूंचे जरूरीप्रमाणे छोटे तुकडे करणे व हे सर्व सूर्यप्रकाशात वाळवणे
बंधक द्रव्य उर्फ बाइंडरचा उपयोग ब्रिकेट्सना मजबूत बनवण्यासाठी करतात. एकूण १०० किलोग्रॅम वजनाच्या कार्बनीकरण केलेल्या कोळशाच्या भुकटीसाठी ६० ते १०० लि पाण्यामध्ये ५ ते ६ किलो स्टार्च अथवा कसावाचे (तवकील) पीठ मिसळून बाइंडर तयार केला जातो. हे प्रमाण अर्थात् कच्च्या मालाच्या वजनावर अवलंबून असते.
मिसळण्याच्या क्रियेनंतर कार्बनीकरण केलेल्या कोळशाच्या कणाकणावर बाइंडरचा थर बसणे गरजेचे आहे. त्यामुळे कोळशाचा चिकटून राहण्याचा गुणधर्म वाढून एकसमान विटा तयार करणे शक्य होते.
विटा ट्रेमध्ये ठेऊन सूर्यप्रकाशात वाळवल्या जातात. वाळल्यानंतर प्लास्टिकच्या पिशव्यामध्ये ठेऊन सीलबंद केल्या जातात.
१ धूरविरहित - कोळशाच्या ह्या विटा पेटवल्यावर तसेच जळताना अजिबात धूर करीत नाहीत.
२ राखेचे कमी प्रमाण - कमीतकमी राख शिल्लक राहाते (कोळशाच्या मूळ ५% वजना पेक्षाही कमी).
३. स्थिर कार्बन व ऊष्मांक-मूल्याचे अधिक प्रमाण - सामान्यतः स्थिर कार्बनचे प्रमाण ८२% च्या आसपास असते. कोळशाच्या अशा विटांचे ऊष्मांक-मूल्य ७५०० किलोकॅलरी/किग्रॅ असते.
४. वास रहित - कोळशाच्या अशा विटांमध्ये बाष्पीभवन होण्याजोग्या पदार्थांचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने त्या वास रहित असतात.
५. अधिक वेळपर्यंत जळतात - लाकडी कोळशाच्या तुलनेमध्ये ह्या विटा दुप्पट वेळ जळतात.
६. ठिणग्या उडत नाहीत - लाकडी कोळशाच्या तुलनेमध्ये ह्या कोळशामधून ठिणग्या उडत नाहीत.
७. तुकडे होण्याचे कमी प्रमाण व अधिक मजबुती - ह्यामुळे हा कोळसा अधिक काळ जळतो.
अधिक माहितीसाठी येथे संपर्क करा -
संचालक
श्री एएम्एम् मुरुगप्पा चेट्टियार संशोधन संस्था
तारामणि
चेन्नई ६०० ११३
तामिळनाडू, भारत
फोन – ०४४-२२४३०९३७
फॅक्स - ०४४-२२४३४२६८
web : www.amm-mcrc.org
स्त्रोत : पोर्टल कंटेंट टीम
अंतिम सुधारित : 7/23/2020
कर्नाटकच्या तुमकूर जिल्ह्यातले श्री. अरूण कुमार ह्...
भाजीपाला इ. थंड स्थितीत साठवण्यासाठी शून्य ऊर्जा व...