तीन वर्ष वय असताना वडील सोडून गेले, पाठोपाठ काही दिवसातच आई सोडून गेली. जग कळायच्या आत माय-बापाच्या मायेला पोरकी झाल. थकलेल्याआजी-आजोबांनी आधार दिला. तीन-चार वर्ष त्यांनी संभाळ केल्यावर त्यांनाहीसंभाळणं अवघड झालं. दुहेरी संकटात सापडलेल्या प्रतिक्षा सावलीचा आधारमिळाला अन् जगायला वाट मिळाली. दहा-आकरा वर्ष झाली, मी इथं राहतेय. हेमाझं घर आहे. मी अनाथ आहे असं मला कधी वाटतच नाही, अन् वाटणारही नाही.आकरावीत शिकणारी प्रतिक्षा (नाव बदलेलं आहे.) जीवनातील संघर्ष सांगतहोती.नगरच्या केडगावांत सावली नावाचं अनाथालय.
आईवडीलांचा आधार हरवलेल्या आणिनात्यातल्या माणसांनी सोडलेल्या लेकरांना आधार देणारी, जगवणारी आणि नव्याउमेदीने जगायला सांगणारी एक संस्था. संस्था नव्हे एक हक्काचं घरच. येथेगेल्या दहा-आकरा वर्षापासून राहणारी प्रतिक्षां बोलती झाली. मात्र तीनेफक्त नाव सांगितलं. आडनाव, गाव आणि इतर सांगायला नकार दिला.
खरंतर येथे येणाऱ्या कोणत्याच माणसाला ते आपली ओळख सांगत नाहीत. तसी तंबीच आहे. संस्थेचे अध्यक्ष नितीन बनसोडे यांनी प्रतिक्षाचा जीवनपट उलगडला. तेम्हणाले, शहरातील एका नावाजलेल्या भागात राहणारे एक कुटूंब. त्यांना तीनवर्षांची मुलगी. सुरळीत संसार सुरु असताना दृष्ट लागली. पहिल्यांदा वडीलसोडून गेले, काही दिवसात आईही सोडून गेली अन् तीन वर्षांची मुलगी अनाथझाली. वयोवृद्ध झालेले आजी-आजोबांनी त्या बाळासाचा संभाळ केला; पण तेहीथकल्यावर त्या मुलीचा संभाळ करणे अवघड झाले.
एका मित्राने मला ही माहिती दिल्यावर मी तिचा संभाळ करण्याची जबाबादारी घेतली. आम्ही नियमानुसार सगळी प्रक्रिया पुर्ण केल्यावर "त्या' मुलीला सावलीत दाखल केले. शाळेत घातले, आता ती थेट आकरावीत शिकतेय. तिच्या सारख्या अनेक मुली इथं घरातल्यासारख्या वावरत आहेत. बनसोडे सांगत होते की, "सरकारी नियमानुसार अनाथालयात सहा ते आठरा वर्षापर्यत राहता येतं. त्यानंतर त्यांनी जायचं कुठे हाआम्हाला कायम पडलेला प्रश्न असतो. म्हणून मी त्या मुलांचे नातेवाईकशोधून त्यांचे पुर्नवसन करण्याचा प्रयत्न करत असतो.
आतापर्यत मी दोनशेपेक्षा जास्ती मुलांना नातेवाईक शोधून त्यांचे पुर्नवनस केलेय. काहीमुलांना रोजगाराला लावलेय. संख्येपेक्षा किती मुलांना मी आधार देऊ शकतोहे मी महत्वाचे मानतो. 'आईवडील नसलेला प्रत्येक जण जगात अनाथच असल्यासारखा असतो. मात्र जगकळाच्या आत अनाथ झाल्यावर ज्यांना आधाराची गरज असते, ती सावलीतून मिळतेयहे प्रतिक्षांच्या बोलण्यातून दिसत होते, म्हणूनच
""घर ज्यांचे दुर गेले, इथे उरली सावलीयाच इंथे छताखाली, नाती इथे विसावली''
कवी संतोष पवार यांच्या या कवितेच्या ओळी खरंच जोडलेल्या नात्याची आणिसावलीतल्या सावलीची प्रचिती देते.
लेखक - सूर्यकांत नेटके
अंतिम सुधारित : 10/7/2020
आपत्तीच्या काळात स्वंयसेवी संस्था आणि मित्र मंडळाच...
सन १९९५ साली प्रथमच कृषीचा जागतिक व्यापार करारामध्...
विवाह, रक्तसंबंध किंवा दत्तकविधान आणि एकत्र निवास ...
कृषी संशोधन व प्रशिक्षण या क्षेत्रांमध्ये महाराष्ट...