महाराष्ट्रात अनेक श्रेष्ठ दर्जाची पर्यटन स्थळे आहेत. या पर्यटन स्थळांना मोठ्या प्रमाणावर देश-विदेशातील पर्यटक भेट देत असतात. यापैकी काही महत्त्वाच्या पर्यटनस्थळांची माहिती या लेखात करून देण्यात आली आहे. महाराष्ट्राचा पर्यटन दौरा आखण्यासाठी ही माहिती उपयुक्त ठरेल.
ज्या जलदुर्गावरून या जिल्ह्याला सिंधुदुर्ग हे नाव देण्यात आले तो सिंधुदुर्ग हे जिल्ह्यातील सर्वात मोठे पर्यटन स्थळ ठरले आहे. हजारो लोक या जलदुर्गाच्या दर्शनासाठी येतात व प्रचंड आकाराच्या खडकांच्या साहाय्याने समुद्रात उभारण्यात आलेल्या या जलदुर्ग निर्मितीबद्दलच्या शिवाजी महाराजांच्या कल्पकतेने भारावून जातात. इतिहासातील नोंदीप्रमाणे 1664 साली शिवाजी महाराजांनी मालवण समुद्रातील कुरटे नावाने प्रसिद्ध असलेले बेट निवडून त्या बेटावर 44 एकर क्षेत्रावर या भव्य किल्ल्याची उभारणी केली. दगड आणि प्रचंड खडकांनी वेढलेल्या या बेटावर हा किल्ला बांधण्यासाठी 500 पाथरवट, 200 लोहार, 3 हजार मजूर आणि शेकडो कुशल कारागीर सतत तीन वर्षे काम करत असल्याची नोंद या किल्ल्यातील शिलालेखावर आढळते.
कसे पोहोचाल?
सिंधुदुर्ग किल्ला कोकण रेल्वेवरील सिंधुदुर्गनगरी रेल्वेस्टेशनपासून 30 कि.मी व कुडाळपासून 35 कि.मी अंतरावर आहे. किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी एसटी बसेस व रिक्षाची सुविधा उपलब्ध आहे.
स्त्रोत - महान्युज
अंतिम सुधारित : 8/22/2020
केरळ हे राज्य पर्यटनाच्या बरोबरीने मसाला पिकांच्या...
हिमाच्छादित शिखरे सोडली तर महाराष्ट्रात अमर्याद पर...
भंडारदरा वनपरिक्षेत्रात पेंडशेत, पांजरे, उडदावणे, ...
आजच्या धकाधकीच्या जीवनात ताणतणावापासून मुक्ती मिळण...