तो जेव्हा हंपीला पोहोचला (एप्रिल १४४३) तेव्हा दुसरा देवराय (कार. १४१९-४४) विजयानगरच्या गादीवर होता. तेथील वास्तव्यातत्याने राजाशी स्नेहसंबंध दृढ केले. विजयानगरमधील राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक परिस्थितीचे त्याने अवलोकन केले.त्याच्या मते विजयानगर हे त्यावेळी एक अत्यंत समृद्ध व प्रबळ साम्राज्य होते. विजयानगरच्या बाजारात पाचू, मोती, हिरे यांच्याराशी असत आणि अनेक परकीय व्यापारी खरेदी-विक्रीसाठी जमत. खुद्द राजाचे सिंहासन रत्नजडित सुवर्णाचे होते. दसरा हा प्रमुखसण मोठ्या उत्साहाने राजा व त्याची प्रजा साजरा करी. राजाचा जनानखाना मोठा असून देवरायाला नृत्याचा शौक होता.
समरकंदला परतल्यानंतर त्याला राजदूत म्हणून इराणमधील गिलानला पाठविण्यात आले (१४४६). याशिवाय त्याची नंतरईजिप्तलाही नियुक्ती झाली होती.परंतु शाहरुखच्या आकस्मिक निधनामुळे ती रद्द झाली. मीर्झा अब्द अल्-लतिफ, मीर्झा अब्दअल्लाह आणि मीर्झा अबुल कासिम बाबुर या शाहरूखच्या वारसांच्या कारकीर्दीत त्याने सद्र, नायब, खाश्श वगैरे उच्च पदांवर कामकेले. सुलतान-अबू सय्यद (जानेवारी १४६३-८२) याने त्याची शेख (राज्यपाल) म्हणून नेमणूक केली. या पदावर तो अखेरपर्यंत होता.मत्ल-उस-सादैन या ग्रंथात (पूर्ण नाव मत्ल्ल-उस-सादैन मज्मा-उल्-बहरैन) त्याने सुलतान अबू सय्यिद बहादूरखानपासून मीर्झासुलतान अबू सय्यिद गुर्रगानच्या खुनापर्यंतच्या तत्कालीन घटनांचा (१३१७-१४७१) सुसंगत इतिहास निवेदन केला आहे. त्यानेसुरुवातीच्या कालखंडासाठी हाफिझ-इ-आबरूच्या झुबलत अल् तवारीख या ग्रंथाचा उपयोग केला आहे. यांशिवाय विविध देशांतीलप्रवास आणि तेथील राजकीय परिस्थिती यांचाही परामर्श त्याने घेतला आहे. अधूनमधून त्याने आपण केलेल्या कविता अंतर्भूत केल्या आहेत. मध्ययुगीन इतिहासाचा एकविश्वसनीय साधनग्रंथ म्हणून त्याच्या ग्रंथाचे महत्त्व आहे.
संदर्भ: 1. Elliot, H. M.; Dowson, John, Ed. The History of India, Vol. IV, Calcutta. 1958.
2. Kejariwal, O. P. Ed. Akashvani October 16-31, 1984 New Delhi.
चौधरी, जयश्री
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 5/5/2020
फिरिश्ता : (१५५० ? - १६२३ ?). भारतातील मध्ययुगीन म...