अन्न सुरक्षिततेबाबतच्या सुधारणा
नुकत्याच घडलेल्या मॅगी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ‘भारतात अन्न सुरक्षिततेच्या बाबतीत सुधारणा करणे’ या विषयावर दोन लाख नागरिकांच्या ऑनलाइन गटामध्ये ‘लोकल सर्कल’च्या माध्यमातून तपशीलवारपणे चर्चा केली गेली. एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकसहभाग असलेल्या या चर्चेतून काही निष्कर्ष काढण्यात आले, तसेच काही सामुदायिक समस्याही निश्चित करण्यात आल्या.