केप कोमोरीन. तमिळानाडू राज्यातील जिल्ह्याचे ठिकाण आणि सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र. लोकसंख्या ११,२११ (१९७१). भारताचे अगदी दक्षिणटोक; अरबी समुद्र, हिंदी महासागर आणि बंगालचा उपसागर यांचे संगमस्थान आणि भारतातील ५१ शक्तिपीठांपैकी एक म्हणून हिंदूंच्या दृष्टीने पवित्र असलेले हेठिकाण, त्रिवेंद्रमच्या आग्नेयीस सु. ८० किमी. आणि नागरकोइलच्या दक्षिणेस १३ किमी. आहे.
तमिळनाडू राज्याचे हे एक प्रमुख मच्छीमारी केंद्र असून तेथेमत्स्य संशोधनकेंद्रही आहे. कन्याकुमारीजवळील तीन समुद्रांचे वेगवेगळे रंग; मोनोझाइट व इल्मेनाइट या खनिजांमुळे किनाऱ्याजवळ बनलेली रंगीबेरंगी वाळूआणि समुद्रामधून सूर्योदय व समुद्रातच सूर्यास्त तसेच पौर्णिमेला एकाच वेळी समुद्रात सूर्यास्त व समुद्रातून चंद्रोदय यावैशिष्ट्यांमुळे प्रवाशांची येथे नेहमी गर्दीअसते.
किनाऱ्याजवळील समुद्रातील एका खडकावर विवेकानंद नेहमी बसत म्हणून त्यालाविवेकानंद खडक नाव मिळाले; तेथेच १९७० साली विवेकानंदांचे भव्यस्मारक उभारले गेल्याने कन्याकुमारीच्या वैभवात भर पडलीआहे. किनाऱ्याजवळील महात्मा गांधींचे स्मारक आणि चर्च प्रेक्षणीय आहेत. पौराणिक कथेनुसारबाणासुराचा वध करणारी येथीलपराशक्ती ही कुमारी कन्या कालीचाच अवतार आहे.
बाणासुर या कुमारी कन्येच्या हातून मरणार असतो. तिने तपश्चर्येने शंकरालालग्नासाठी प्रसन्न केले म्हणून देवांनी कन्याकुमारीपासून ३२ किमी. वरील शुचिंद्रम् येथे शंकराचा मुहूर्त टाळला. बाणासुर तिलामागणी घालण्यास गेला व त्यातून निर्माण झालेल्या युद्धात मारला गेला. हातात वरमाला घेतलेली आणि शंकराची वाट पहातअसलेली पराशक्तीची सुंदर मूर्ती कन्याकुमारीच्या मंदिरात असूननवरात्रात तेथे उत्सव होतात. कन्याकुमारीचे मंदिरकोरीवकामयुक्त, दाक्षिणात्य पद्धतीचे आहे.
शाह, र. रू.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 2/17/2020