लेले अत्यंत रेखीव औद्योगिक शहर असून १ नोव्हेंबर १९५० रोजी त्यावेळचे राष्ट्राध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी दे. भ. चित्तरंजनदास यांच्या स्मृत्यर्थ त्याचे चित्तरंजन असे नाव ठेवले. रेल्वे इंजिनांच्या कारखान्यामुळेच त्याला महत्त्व आले आहे. याच्या उत्तरेस संथाळ परगणा व अजय नदी आणि दक्षिणेस दामोदर व बराकर या नद्या आहेत.
एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीपर्यंत याच्या सभोवती घनदाट जंगल होते. परंतु हळूहळू ते कमी होऊन बराचसा भाग लागवडीखाली आला. या शहराचा पूर्व भाग उताराचा असून तेथे मोहाचे आणि शाल जातीचे वृक्ष आढळतात.
आसमंतात लोखंड व कोळसा यांचा विपुल साठा असून त्याचा कारखान्यासाठी उपयोग होतो. चित्तरंजनला पाणीपुरवठा मुख्यत्वे अजय नदीपासून व उन्हाळ्यात येथे असलेल्या तळ्यांतून होतो. येथे उच्च विद्यालये,रुग्णालये, विश्रामगृहे, सामाजिक व सांस्कृतिक विकास केंद्रे आणि निरनिराळ्या उपयुक्त संस्था आहेत.
संकपाळ, ज. बा.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020