অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

आर्थिक दुर्बल घटकांसाठी शिष्यवृत्ती योजना

आर्थिक दुर्बल घटकांसाठी शिष्यवृत्ती योजना

माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकांमधील मुली व मुलांसाठी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेचे संकेतस्थळही कार्यान्वित झाले आहे.

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक योजना (NMMSS) व माध्यमिक शाळेतील मुलींना राष्ट्रीय योजनेतून रु. तीन हजार प्रोत्साहनपर भत्ता (NSIGSE) योजना सन 2017-18 साठी www.scholarships.gov.in (National scholarship.portal) हे केंद्र शासनाचे संकेतस्थळ कार्यान्वित झाले असल्याने पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने दिनांक 30 सप्टेंबर 2017 पर्यंत भरावयाचे आहेत.

माध्यमिक शाळेतील मुलींना राष्ट्रीय योजनेतून रु.तीन हजार प्रोत्साहनपर भत्ता पात्रतेचे निकष (NSIGSE):- शासकीय, शासन अनुदानीत, स्थानिक स्वराज्य संस्थेतील नववीमध्ये शिकत असलेल्या अनुसूचित जाती-जमातीमधील वय वर्ष 16 पूर्ण न झालेल्या अविवाहीत (दिनांक 31 मार्च रोजीचे वय) मुलींसाठीच ही योजना लागू आहे. ज्या मुली कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातून इ.8 वी उत्तीर्ण झालेल्या आहेत, अशा सर्व मुलींसाठीच ही योजना लागू आहे. खाजगी विना अनुदानीत शाळांमधील विद्यार्थीनीसाठी तसेच केंद्र शासनाकडून चालविल्या जाणाऱ्या शाळांसाठी ही योजना लागू नाही.

या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थीनीसाठी इयत्ता 10 वीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर व वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर केंद्र शासनामार्फत विद्यार्थीनींच्या बँक खात्यावर प्रोत्साहन भत्याची रक्कम जमा करण्यात येते.

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक योजना (NMMSS)

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक ही केंद्र शासन पुरस्कृत योजना असून महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानीत शाळेतील इयत्ता 8 वीमध्ये शिकत असलेले नियमित विद्यार्थी, विद्यार्थीनी या शिष्यवृत्तीसाठी पात्र असतात. कुटूंबाची वार्षिक एकत्रित उत्पन्न आई वडिलांचे एक लक्ष पन्नास हजार रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांना इ.9वी ते 12 वीपर्यंत अशी एकूण चार वर्षे दरमहा पाचशे रुपये याप्रमाणे वर्षाला एकूण सहा हजार रुपये शिष्यवृत्ती केंद्र शासनामार्फत पात्र विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते.

या योजनेसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांनी खाली नमूद केल्याप्रमाणे नवीन (इ.9वी )व नुतनीकरणाच्या (इ.10 वी व 11 वी, 12वी ) विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर ऑनलाईन माहिती भरणे आवश्यक आहे.

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा दि.20 नोव्हेंबर 2016 इयत्ता 9वीतील विद्यार्थी., इयत्ता 10 वीतील विद्यार्थी परीक्षा दि.7 जानेवारी 2016., इयत्ता 11 वीतील विद्यार्थी परीक्षा दि.10 जानेवारी 2015., इयत्ता 12 वीतील विद्यार्थी परीक्षा दि.17 नोव्हेंबर 2013.,

या दोन्ही योजनांच्या पात्र विद्यार्थ्यांनी याबाबतची माहिती www.scholarships.gov.in या वेबसाईटवर लॉगीन आयडी तयार करुन दि.30 सप्टेंबर 2017 पर्यंत ऑनलाईन भरावयाची आहे. पात्र विद्यार्थी किंवा त्यांचे पालक यांनी माहिती ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी शाळेचे मुख्याध्यापक किंवा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद यांच्याशी संपर्क साधावा.

संकलन- जिल्हा माहिती कार्यालय

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 8/1/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate