1) सौरचूल ऍल्युमिनिअम धातूपासून बनविलेले काचेचे झाकण असलेली आणि अंतर्भाग काळा असलेली ही एक चौकोनी पेटी आहे.
2) सूर्यापासून येणाऱ्या किरणांची तरंग लांबी कमी असते, त्यामुळे ही किरणे काचेमधून सहज जाऊ शकतात. या किरणांमधील उष्णता काळ्या रंगाने रंगविलेल्या धातुपात्राद्वारा शोषली जाते. धातुपात्राद्वारा उत्सर्जित किरणांची तरंगलांबी जास्त असल्याने ती काचेच्या बाहेर जाण्यास सक्षम नसतात.
3) पेटीच्या अंतर्भागातील तापमान वाढायला सुरवात होते. लाकडाच्या चौकटीत थोडे अंतर ठेवून दोन काचा असलेले झाकण व रबराची पट्टी यामुळे पेटीतील उष्णता जास्त काळापर्यंत टिकवता येते.
4) उन्हात सौरचुलीमध्ये ठेवलेली काळ्या रंगाने रंगविण्यात आलेली भांडी तापतात. त्यातील अन्न ठराविक कालावधीनंतर शिजते. आतील तापमान सूर्यकिरणांच्या प्रखरतेवर व उष्णतारोधकाच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असते.
5) सूर्यकिरणे संकलित करण्याचे क्षेत्र वाढविण्यासाठी काचेचा परावर्तक बिजागिरीच्या साह्याने चौकटीस लावण्यात येतो. या परावर्तकाचा कोन सूर्यकिरणांचे परिवर्तन पेटीमध्ये होईल, अशा प्रकारे ठेवल्यास 15 ते 25 अंश सेल्सिअसपर्यंत जादा तापमान मिळते.
6) सौरचूल विविध आकारांत उपलब्ध आहे.
7) ऋतू, हवामान, वेळ, अन्नाचा प्रकार, पदार्थाची जाडी यावर अन्न शिजण्याचा कालावधी अवलंबून असतो. मांसाहारी पदार्थांना तीन ते चार तासांपर्यंत, तर भाज्यांना अर्धा तास ते अडीच तास, डाळींना दीड ते दोन तास, भातास अर्धा तास ते दोन तास, असा साधारण शिजण्यास कालावधी लागतो.
संपर्क - 02358- 282414
कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, दापोली
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020