बियांपासून १२-१६% फिकट, पिवळे भुरे, स्थिर सुगंधी तेल निघते. पानांमध्ये कॅरोटीन व अस्कॉर्बिक अम्ल असते . लाकूड भुरे, मध्यम कठीण छपराकारीता उपयोग करतात. कोवळ्या फांद्यांच्या टोपल्या बनवितात. साल कातडी कमाविण्यास आणि पाने लाकडाला व हस्तिदंताला झिलई आणण्यास वापरतात . तान्ह्या मुलास पानांचा रस रेचक म्हणून देतात. ती पित्तशामक, कफोत्सारक ( कफ पाडून टाकणारी ) असून ताप व संधिवातावर गुणकारी असतात. हिंदू लोक याला ' स्वर्गीय वृक्ष ' मानतात; फुले देवांच्या पुजेस पवित्र ठरली आहेत. विवाह प्रसंगीच्या मंगलाष्टकांत पारिजातकाचा उल्लेख आहे. तसेच महाभारतातही त्याचा उल्लेख आहे. देव-दानवांनी केलेल्या समुद्रमंथनातून मिळालेल्या चौदा रत्नानपैकी हे एक आहे.
पारिजातकाची झाडे त्यांच्या वासतिस्थानी घनदाट वाढून शुष्क टेकड्यांच्या बाजू आणि खडकाळ जमीन झाकून टाकतात. किंचित सावलीही मानवते. बकर्या, पाला खात नसल्याने झाडीचे रान बनते .
झाडाची लागवड बियांपासून रोपे करून अथवा छाट किंवा दाबाच्या कलामांनी करतात.
पारीजाताकावर पडणारा ' भुरी ' हा एकच महत्वाचा रोग आहे. तो ओइडियम वंशाच्या कवकामुळे ( बुराशिसाराख्या हरितद्रव्यरहित वनस्पतीमुळे ) होतो. रोगाचा प्रसार हवेतून होतो. या रोगामुळे पानांच्या वरच्या बाजूवर राखेसारखी पांढरी कवकाची वाढ आढळते. त्यामुळे पाने गळतात. ३०० मेशची गंधकाची भुकटी पिस्कारल्याने या रोगास आळा बसतो. ( चित्रपत्र ५७).
लेखक: जमदाडे, ज. वि., चौधरी, रा. मो.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020