सन १९४७ ते १९७0 या तेंवीस वर्षाच्या कालावधीत तसेच त्या पुर्वीही महाराष्ट्र आणि संपुर्ण भारत देशात भाताच्या उंच जातींची लागवड होत असे (इंडीका). या जातींचे वैशिष्ट्य़ म्हणजे उंची ५ ते ६ फुट, खोड कमकुवत यामुळे या जातीं लोळल्यामुळे उत्पादनात बरीच घट येत असे. या जातींचे त्या कालावधीमधील प्रतीष्हेक्टरी उत्पादन ६ ते ४ फ्रेिंटल मिळत असे. यामुळे भारतामध्ये तांदळाचा व इतर अन्नधान्याचा मोठा तुटवडा भासत होता. यामुळे रंगुन तांदुळ, अमेरिकेतील मेिलो, ज्वारी, कमी प्रतिचा गहू आयात करुन भारतातील जनतेला पुरवठा केला जात होता.
मात्र सन १९६५ मध्ये तायवान मधुन तायचुंग स्थानिक-१, १९६६ साली आय.आर.-८ अशा दोन बुटक्या, भरपुर फुटवा देणा-या आणि आपल्या उंच जातींपेक्षा तिप्पट उत्पादन देणा-या जाती भारतामध्ये आयात केल्या. सन १९६७ मध्ये डॉ. एस. व्ही. एस. शास्त्री. आय. सी. ए. आरचे भारतातील प्रमुख भात संशोधन केंद्र, हैदाबाद येथिल शास्त्रज्ञाने जया हीं भारतातील सर्व प्रकारच्या जमिनीत भरघोस उत्पादन देणारी नवीन भाताची जात शोधुन काढली. जया आणि आय आर-८ या दोन भात जातींनी हेक्टरी ४0 ते ४५ फ्रेिंट्रल उत्पादन दिल्यामुळे भारतातील भात उत्पादनात भरीव वाढ होऊन तांदळाची आयात बंद झाली.
सन १९७0 ते १९९g या कालावधीत भारतातील विविध कृषि विद्यापीठे आणि भारतीय कृषि अनुसंधान परिषद यांच्या विविध भात संशोधन केंद्रानी निर्माण केलेल्या बुटक्या आणि विविध दाण्याच्या प्रकारातील अनेक जाती निर्माण करुन १९९० साली भारत तांदुळ उत्पादनात स्वयंपुर्ण झाला आणि बासमती तांदळाची निर्यात करु लागला. महाराष्ट्र राज्यातील चारही कृषि विद्यापीठांनी सन १९७५ ते २०१४ पर्यंत एकुण ५u जातींची निर्मिती करुन त्या प्रसारीत करण्यात आल्या. या पैको ५ संकरित वाण डॉ. बा. सा. कोंकण कृषि विद्यापिठानें प्रसारीत केले. यासर्व भात जाती आणि पाच संकरित वाणामुळे महाराष्ट्राच्या भात उत्पादनात ४९ टक्क्यांची भरीव वाढ झालेली आहे. नविन जातीं निर्मितीबरोबरच चारही कृषि विद्यापीठांमधील संशोधकांनी भात पिंकाच्या अधिक उत्पादन देणा-या मशागत पध्दती वेिकसित केल्या.
कीटकशास्त्र आणि रोगशास्त्र यामध्ये संशोधन होऊन विविध रोग आणि कोंडीवर नियंत्रणाचे उपाय शोधुन काढलेले आहेत तसेच जर्मनींमध्ये सेंद्रिय आणि रासायनिक खतांची मात्रा, त्या देण्याच्या वेळा या बाबतही उपयुक्त संशेोधन झाल्यामुळे महाराष्ट्राच्या भात उत्पादनात वाढ होण्यास मदत झाली. कृषि विद्यापीठांचे संशोधन सामान्य शेतक-यांपर्यंत पोहचवण्याचे कार्य महाराष्ट्राच्या कृषेि खात्याने सातत्याने आणि कार्यक्षमतेने केल्यामुळेच भात उत्पादनाची वाढ होण्यास मोलाची मदत झालेली आहे.
प्रादेशिक कृषिं संशोधन केंद्र. कर्जत, जि. रायगड हे महाराष्ट्राचे १४ भात संशोधन केंद्राचे प्रमुख केंद्र असून याठिकाणी भारत सरकारने जून १९९१ मध्ये संकरित भात वाण निर्मितीसाठी कर्जत केंद्राची निवड करुन तेथे हा प्रकल्प सुरु झाला तर भारतात एकूण १२ संशोधन केंद्रावर हा प्रकल्प चालू झाला. सन १९९१ ते १९९६ पर्यंत कर्जत केंद्राने सह्याद्री हा महाराष्ट्र राज्याचा पहिला वाण प्रस्तुत लेखाचे लेखक यांच्या नेतृत्वाखाली निर्माण झाला. महाराष्ट्र शासनाने सन १९९८ मध्ये तो प्रसारीत केला. या वाणाचे महत्वपुर्ण वैशिष्ट्य म्हणजे अखिल भारतीय पातळीवर जे अनेक चाचणी प्रयोग झाले त्यामध्ये या वाणांचा १ ते ३ क्रमांकात समावेश झाला.
कर्जत केंद्राने या वाणाच्या बिजोत्पादनाचे तंत्रज्ञान विकसीत केले आणि कोल्हापूर जिल्ह्यातील अनूकूल वातावरणात एकरी २० ते २५ क्रिटल संकरित बियाण्यांचे विक्रमी उत्पादन काढून अनेक खाजगी कंपन्याना हे उत्पादन दाखविले. सन २००० मध्ये डॉ. बा. सा. कोकण कृषि विद्यापिठाच्या कर्जत केंद्राने भारतीय कृषि विभागाच्या इतिहासात एक अवर्णणिय व महत्वपूर्ण कामगिरी केली. ती म्हणजे डॉ. बा. सा. कोकण कृषि विद्यापीठ, दापोली आणि सिन्जेटा इंडीया लि. पुणे यांचा भारतातील पहिला ऐतिहासिक सामंजस्य करार घडवून आणला आणि यामुळे सह्याद्री या संकरित वाणाचे प्रत्येक वर्षी शेकडो टन बियाणे करीमनगर येथे उत्पादन करुन ते महाराष्ट्रासह उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगढ, मध्यप्रदेश व ओरीसा राज्यातील शेतक-यांना सतत १० वर्षे उपलब्ध करून दिले. सह्याद्री या वाणामुळे अखिल भारतीय पातळीवर भात उत्पादनात भरीव वाढ होण्यास मदत झाली. सन १९९८ नंतर विविध संकर घेऊन सह्याद्री २,३, आणि ४ असे चार संकरित वाण प्रस्तुत लेखकाच्या नेतृत्वाखाली निर्माण झाले.
सन २०१२-१३ च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात भातपिकाखाली १५.४ लाख हेक्टर क्षेत्र असून एकूण उत्पादन ३५ लाख टन आणि राज्याची प्रतीहेक्टरी उत्पादकता १९७४ झाली यामध्ये कोकण विभाग प्रथम क्रमांकावर असून उत्पादकता २६८१ किलो/हेक्टर आहे. क्र. २ वर कोल्हापूर विभाग २१९१ किलो /हेक्टर आणि क्र. ३ वर पूर्व विदर्भ १७६१ किलो/हेक्टर अशी आहे.
वर्ष | १९६१-६२- | १९६६-६७ | १९७१-७२ | १९८१-८२ | १९९०-९५ | २०००-०१ | २००७-०८ | २०१२-१३ |
---|---|---|---|---|---|---|---|---|
उत्पादकता (किलो/हे) | ७९० | १०९४ | २०२८ | १५३२ | १४६४ | १२७७ | १९०३ | १९७४ |
एकूण ४६ वर्षात महाराष्ट्रातील भात उत्पादकता ५० टक्क्यांनी वाढली आहे . परंतु ती इतर राज्यांच्यामानाने समाधानकारक दिसत नाही. याची कारणमिमांसा
अ) निर्यातक्षम तांदळाच्या जाती लावणे. यामध्ये मध्यम बारीक तांदुळ, उदा. बीपीटी -५२o४, घनसाळ, कोलम प्रकारातील बुटक्या जातींचा समावेश आहे.
ब) अतिलांब तांदुळ बासमती प्रकार उदा. पुरा बासमती, सुगंदा ३ व ५, पूसा - ११२१ इत्यादी प्रकारच्या जातींना पलर राईस मिल असणे आवश्यक आहे. भात लागवडीसाठी नविन पध्दतींचा वापर करावा. उदा. चारसूत्री पध्दत, कृषि विद्यापीठांनी शिफारस केलेल्या भात लागवड पध्दती इत्यादी.
स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन
अंतिम सुधारित : 10/7/2020
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रामुख्याने ...
उस महाराष्ट्रातील एक महत्वाचे नगदी पिक आहे. कटिबंध...
दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये अन्नटंचाईमुळे गर्भ...