नागरी विभाग |
ग्रामीण विभाग |
छपरांवरुन/ कौलांवरुन वाहून जाणारे पाणी साठवणे:
|
|
ग्रामीण भागांत मुख्यत्वे पावसाचे पाणी जास्तीत जास्त क्षेत्रफळावरील जमिनीत मुरेल याकडे लक्ष दिले जाते कारण ग्रामीण भागात पाणी जिरविण्यासाठी मोठ्या प्रमाणात जमीन उपलब्ध असते. छपरांवरुन, उतारावरुन, नद्यांमधून आणि कालव्यांमधून वाया जाणारे पाणी वाचविण्यासाठी खालील पद्धती वापारता येतील.
- हे बांध स्थानिक दगड, चिकणमाती, आजूबाजूला असलेली झुडुपे वापरुन ओहोळ किंवा डोंगरउतारावरुन येणारे पाण्याचे झोत जमिनीत मुरविण्यासाठी वापरले जातात.
जमिनीतील ओलावा दीर्घ काळ टिकवून ठेवण्यासाठी ही पद्धत फारच उपयोगी आहे.
हे बांध मुख्यत्वे लहान ओढ्यांभोवती बांधले जातात. त्यामुळे ओढ्यातील पाणी ओढ्यातच राहते आणि प्रवाहाबाहेर येत नाही.
हा बांध जागेवरचेच दगडधोंडे वापरून तयार करता येतो. सर्वप्रथम स्टीलच्या तारांची जाळी तयार करून त्यात हे दगड भरले जातात.
या बांधाची उंची साधारणतः ०.५ मी असते आणि ज्या प्रवाहाची रूंदी १० मी पेक्षा कमी असेल अशाच प्रवाहांना असे बांध वापरले जातात.
या बांधात थोडे पाणी साठून रहाते आणि उरलेले पाणी बांधाबाहेर जाते. प्रवाहात वाहून आलेला गाळ कालांतराने बांधातील फटींमध्ये शिरून बांधातील फटी व छिद्रे बंद करून टाकतो त्यामुळे बांधातून पाणी गळणे बंद होते. शिवाय बांधाच्या आतल्या बाजूने वाढलेली झाडे पाऊस संपल्यावरदेखील पाणी वाहते ठेवण्यास मदत करतात.
ज्या प्रवाहाला फारसा उतार नाही अशा ठिकाणी हे बांध घालता येतात. मात्र त्यासाठी निवडलेल्या जागेची माती जास्तीत जास्त सच्छिद्र व जाड थर असलेली असावी त्यामुळे कमी वेळात जास्त पाणी मुरविता येईल. असे बांध शक्यतो प्रवाहाच्या कडेने बांधले जातात आणि त्यांची उंचीदेखील २ मी पेक्षा कमी असते. जास्तीचे पाणी बांधावरून वाहू दिले जाते. त्या पाण्याने नुकसान होऊ नये म्हणून आधीच पुरेशी जमीन सोडुन द्यावी. एकाच प्रवाहावर अनेक ठिकाणी असे बांध घातले जाऊ शकतात आणि पाणी साठवले जाऊ शकते. अगदीच छोटा प्रवाह असेल तर चिकणमाती भरलेल्या गोण्यांनीदेखील काम होऊ शकते. काही ठिकाणी नाल्याचे पाणी बाहेर पडण्यास थोडीशी जागा ठेवावी व तेथे दोन्ही बाजूला ऍस्बेस्टॉसच्या शीटस लावाव्यात. बांधकामास मजबूती येण्यासाठी प्रवाहाच्या बाजूने सिमेंट व चिकणमाती भरलेल्या गोण्या ठेवाव्यात.
जेथे मातीची सच्छिद्रता कमी आहे तेथे ही पद्धत फारच उपयोगी आहे. हे पन्हाळे मजुरांद्वारे हाताने खोदले जाऊ शकतात. त्याचा व्यास साधारण २ मी पेक्षा मोठा असतो. हे पन्हाळे अच्छिद्र खडकात खोदून सच्छिद्र खडकापर्यंत पोहोचेल असे खोदावे. पाण्यापर्यंत पोहोचले नाही तरी चालते. हे पन्हाळे वाळू किंवा रेतीच्या साहाय्याने बांधावीत. ज्या गावात मोठ्या प्रमाणावर खडक आहेत अशा ठिकाणी हे पन्हाळे खुपच उपयोगी पडतात. असे आढळून आले आहे की ब-याचशा गावांत तलावामध्ये पुरेसे पाणी असते पण तेथील जमीन अच्छिद्र असल्याने ते पाणी शेजारच्या विहिरी, नाल्यांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे तलावातील पाणीदेखील वापर न झाल्याने वाफ बनून उडून जाते आणि पावसाळा संपला की कालांतराने हे तलाव आटतात. तलावांमध्ये अशी संवर्धन पन्हाळी बांधून हा प्रश्न सोडवता
येतो. या पन्हाळ्यांमध्ये जास्तीचे पाणी साठवता येते. ही पन्हाळी ०.५ ते ३ मी व्यासाची व १० ते १५ मी खोल असतात. त्यांची रूंदी व खोली पाण्याच्या उपलब्धतेवर ठरविली जाते. पन्हाळाचे तोंड मात्र तलावाच्या जमिनीपासून जरा उंचावर ठेवले जाते आणि वाळूच्या साहाय्याने बांधले जाते. वरच्या १ ते २ मी खोलीपर्यंतचे बांधकाम दगडविटांनी केले जाते जेणेकरून बांधकामास मजबुती मिळेल. अशा पद्धतीने तलावातील जास्तीचे पाणी या पन्हाळ्यात साठून रहाते आणि ते पावसाळा संपल्यावरदेखील वापारता येते.
अस्तित्वात असलेल्या किंवा वापरात नसलेल्या विहिरीदेखील साफसफाई करून, गाळ काढून याकामासाठी वापरता येतात. या पद्धतीत जमा केलेले पाणी एका पाईपच्या साहाय्याने विहिरीच्या तळाशी सोडतात. मात्र हे पाणी गाळमुक्त असले पाहिजे. यासाठी स्वच्छ वाहत्या पाण्याचा वापर करावा. तसेच पाणी गाळून विहिरीत जाईल अशी व्यवस्था करावी. पाणी निर्जंतुक करण्यासाठी क्लोरिनचा वापर करावा.
शहरी भागात पावासाचे पाणी मुख्यत्वे इमारतींच्या छतावरुन जमा करता येते. रस्ते आणि पदपथाखालची असलेली जमीन प्रामुख्याने वायाच जाते कारणे तेथे पाणी मुरवता येऊ शकत नाही. मात्र पावसाचे पाणी एखाद्या सच्छिद्र खडकात/ मातीत साठवून हवे तेव्हा वापरता येऊ शकते. मात्र पर्जन्यजलसंवर्धनाची यंत्रणा ही कमी जागेत मावणारी असावी. त्यापैकी छतावर बसवण्याच्या काही पद्धती खालीलप्रमाणे:
ज्याठिकाणी गाळाची माती आहे किंवा सच्छिद्र खडक जमिनीलगत आहेत त्या ठिकाणी पावसाचे पाणी मुरवले जाऊ शकते. ज्या इमारतींना १०० चौ. मी. ची गच्ची लाभली आहे त्यांना ही पद्धत सोयीची आहे. हे खड्डे साधारणतः १-२ मी रुंद आणि २-३ मी खोल खणले जातात. हे खड्डे दगडांनी (५-२० सेमी) आणि जाड्या वाळूने भरले जातात. त्यामुळे पाण्यातील गाळ पृष्ठ भागावरच रहातो आणि सहज बाजूला करता येतो. कमी आकारमानाच्या गच्चीसाठी खड्डा फुटलेल्या दगडविटांनीदेखील भरता येतो. गच्चीतून खड्ड्यात सोडलेल्या पाईपच्या तोंडाशी गच्चीतच जाळी लावावी म्हणजे पाने किंवा इतर घन कचरा पाईपमध्ये अडकणार नाही. पाणी मुरण्याचे प्रमाण कायम ठेवण्यासाठी वाळूच्या थरावर अडकलेला कचरा/ गाळ नियमित साफ करावा.
ज्या इमारतींचे छत २००-३०० चौ. मी. आहे आणि जमिनीमध्ये कमी खोलीवर सच्छिद्र थर उपलब्ध आहे तेथे ही पद्धत उपयोगी आहे. कालवा साधारण ०.५ – १ मी रुंद, १ – १.५ खोल, १० - २० मी लांब असावा. तो दगडविटा आणि जाड्या वाळूने भरावा. त्यामुळे पाण्यातील गाळ पृष्ठ भागावरच रहातो आणि सहज बाजूला करता येतो. गच्चीतून खड्ड्यात सोडलेल्या पाईपच्या तोंडाशी गच्चीतच जाळी लावावी म्हणजे पाने किंवा इतर घन कचरा पाईपमध्ये अडकणार नाही. पाणी मुरण्याचे प्रमाण कायम ठेवण्यासाठी वाळूच्या थरावर अडकलेला कचरा/ गाळ नियमित साफ करावा. पहिल्या पावसाचे पाणी खड्ड्यात न सोडता असेच वाहू द्यावे.
फिल्टर खड्ड्याचा आकार व आकारमान पाण्याच्या उपलब्धतेप्रमाणे ठेवता येते. त्यात गोटे तळाशी, मध्ये मोठे गोटे आणि सर्वात वर वाळू असा थर द्यावा. जाळी वापरून हे थर वेगवेगळे ठेवता येतील. खड्डा दोन भागांत विभागावा. पहिल्या भागात फिल्टरचे साहित्य भरावे आणि दुसरा भाग रिकामा ठेवावा जेणेकरून गाळलेले जास्तीचे पाणी त्यात साठवता येईल. हा खड्डा खालून पाईपने गाळलेल्या पाण्याच्या टाकीला जोडावा.
जेथे पृष्ठभागावरील माती अच्छिद्र आहे पण छतावरून मात्र मोठ्या प्रमाणावरून पाणी मिळू शकते तसेच जेथे थोडाच वेळ परंतु मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो तेथे ही पद्धत उपयोगी आहे. मात्र यासाठी सच्छिद्र मातीचा थार तीन मी च्या आत असणे आवश्यक आहे. १००-३०० व्यासाची गाळीव पाण्याची टाकी पाण्याच्या पातळीच्या किमान ३ ते ५ मी खाली खोदावी.
अंतिम सुधारित : 10/7/2020
पर्जन्यजलसंर्वधन आणि भूजल-पुनर्चक्रणाद्वारे पिण्य...
पावसाचे पाणी जमा करणे आणि त्याचा नंतर योग्य वेळी व...
पावसाच्या पाण्याची साठवण म्हणजे घरांच्या छपरांवर प...
ग्रामीण भागातील ऊर्जेच्या गरजे संबंधीच्या प्रक्रिय...