मौजे बच्छेरा, ता. पारशिवनी, जि. नागपूर हे गाव नागपूरपासून अवघे ५० कि.मी. अंतरावर असून हा भाग अतिदुर्गम समजला जातो. चक्रवर्ती हे कुटुंब मूळचे जबलपूर, मध्यप्रदेशचे असून व्यवसायानिमित ते मौजे बच्छेरा येथे स्थायिक झालेले आहे. उदरनिर्वाहासाठी त्यांनी कष्टातूनच नऊ एकर शेती घेतली.
शेतीच्या नफ्यातूनच मुलांचे शिक्षण सी. चंद्रकलाबाई यांना चार मुले असून एक मुलगा डॉक्टर व एक मुलगा वकील आहे. शेतीच्या उदरनिर्वाहातूनच मुलांना शिक्षण दिले. इतर दोन मुलांपैकी एक शेतीबरोबरच स्वतःचे ट्रॅक्टर भाड्याने देण्याचा व्यवसाय करतो. तर दुसरा मुलगा आईला शेतीकामात मदत करतो.
आज सी. चंद्रकलाबाई यांच्याकडे २० देशी गाई आहेत. यापासून मिळणा-या शेणाखताचा, गोमूत्राचा शेतीसाठी वापर केला जातो. गाईचे दूध कुटुंबासाठीच वापरले जाते व उरलेले दही, ताक, तूप बनवण्याकरीता वापरले जाते. दुधाची विक्री केली जात नाही.
सौ. चंद्रकलाबाई या व्यवसायाने कुंभार असून शेतीतील कामातून वेळ काढून रात्रीच्या वेळी सुध्दा पर्यावरण संवर्धनासाठी मातीपासून गणपती, शारदादेवी, महालक्ष्मी व दिवाळीसाठी पणत्या बनविण्याचा व्यवसाय करतात. त्यांच्या व्यवसायात त्यांचे पती श्री. रेवाराम चक्रवर्ती यांची मदत लाभते. या मूर्तीची विक्री नागपूरपर्यंत घरच्याघरुन होते. यातून मिळणारा पैसा ते घरच्या उदरनिर्वाहासाठी वापरतात.
कृषी सहायक श्री. आर.जी.नाईक व मंडळ कृषी अधिकारी, श्री. आर.एम.वसू हे वारंवार शेतावर भेटी देऊन मार्गदर्शन करतात.
आम्ही संत्रा बगीच्यासाठी बोडॉमिश्रण (मोरचूद १ किलो + चुना १ किलो + पाणी १० ली.) फक्त एकच वेळेस लावत होतो. पण कृषि सहायक यांनी सांगितल्यानुसार पावसाळा सुरू होण्यापूर्वी व पावसाळा संपल्यानंतर असे दोन वेळा बोडॉमिश्रण झाडांना नियमित लावत आहोत. त्यामुळे ब-याच प्रमाणात डिक्याचा प्रादुर्भाव कमी झाला आहे.
मागच्या वर्षी तुरीचे उत्पादन ब-यापैकी झाले व भावसुद्धा चांगला मिळाला. या अगोदर आम्ही तुरीला शेणखताव्यतिरिक्त कोणत्याही खताचा अवलंब करत नव्हतो, पण यावर्षी कृषि विभागाच्या सल्ल्यानुसार माती
परीक्षण करून खते, बीज प्रक्रिया करून पेरणी, पेरणीनंतर विरळणी, ३०-ते ४५ दिवसानंतर शेंडा खुडणे, रायझोबीएम, पीएसबी यांची ड्रचिंग, पांढ-या मुळाच्या वाढीसाठी ह्युमिक अॅसिड व पाण्यात विरघळणा-या (१९:१९:१९) खताचा वापर तसेच निंबोळी अर्काची पहिली फवारणी करत आहोत. तुरीची लागवड सध्या सलग ३ x ३ फूट अंतरावर केली आहे. पण तुरीच्या फुलावरील, शेंगावरील अवस्थेत फवारणीसाठी अडथळा निर्माण होत असल्यामुळे कृषि अधिकारी व कर्मचा-यांच्या सल्ल्यानुसार आम्ही पुढील वर्षी ५ × १ फूट अंतरावर तुरीची लागवड करणार आहोत. आंतरपीक म्हणून दोन तुरीच्या ओळीमध्ये ३ ओळी सोयाबीनच्या लागवड करणार आहोत. यामुळे फवारणीसाठी अडचण भासणार नाही. तुरीच्या मिळेल. असा आमचा मानस आहे.
आमचे शेत गावालगत असून शेतात हनुमान मंदिराचा मंडप
असल्यामुळे कृषि विभागार्फत सर्व शेतक-यांच्या सहमतीने शेतीशाळा व प्रशिक्षण कार्यक्रम शेतावर घेतले जातात. शेतीशाळेत निमअर्क, दशपर्णी अर्क बनविण्याबाबत प्रशिक्षण दिले जाते. त्याचा अवलंब शेतीव्यवसायात करतो. घरी देशी गाई असल्यामुळे दशपर्णी अर्कासाठी गोमूत्र व शेण सहज उपलब्ध होते. इतर शेतक-यांना गोमूत्र मोफत दिले जाते.
स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन
अंतिम सुधारित : 7/12/2023
सातारा जिल्ह्याच्या वाई येथील रेश्मा गाढवे आणि विश...
शिक्षण हे व्यक्तिविकास साधण्याचे एक प्रमुख साधन मा...
बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई गावात जन्मल्यापासून आयुष...
राज्यातील मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, शीख, पारसी, जै...