विज्ञान केंद्र, जालना येथील तज्ज्ञांनी दिलेली माहिती - कापूस लागवड मध्यम ते भारी ज मिनीतच करावी. हलक्या जमिनीत लागवड करण्याचे टाळावे, कारण अशा जमिनीत पाण्याचा ताण पडल्यास उत्पादनात फार मोठी घट येते. पिकाची फेरपालट करावी. एकाच जमिनीत कापसावर कापूस घेण्याचे टाळावे. जमिनीची सुपीकता टिकवून ठेवणे आणि उत्पादनात शाश्वतता राखणे यासाठी फेरपालट अतिशय आवश्यक आहे.
कापूस वाणाची निवड करताना केवळ जाहिरातींवर विश्वास न ठेवता कापूस वाणाचे गुणधर्म जसे - वाणाचा कालावधी, बोंडांचे वजन, धाग्याची लांबी, पुनर्बहराची क्षमता, कीड व रोगांना प्रतिकार करण्याची क्षमता, अवर्षण परिस्थितीत पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता इत्यादी बाबींचा विचार करूनच वाणाची निवड करावी. एकाच शेतात खूप जास्त वाणांची लागवड न करता एक किंवा दोनच अनुभवातील व खात्रीचे वाण लावावेत.
कोरडवाहू परिस्थितीत एकरी झाडांच्या संख्येला महत्त्व असल्यामुळे, शिफारशीप्रमाणे एकरी सात ते दहा हजार झाडांची संख्या राहील या दृष्टीने लागवडीचे अंतर ठेवावे. मध्यम ते भारी ज मिनीत 3 ु 2 फूट, 4 ु 1.5 फूट, 6 ु 1 फूट किंवा 4 ु 1 फूट यापैकी आपल्या सोयीचे अंतर ठेवावे. दोन ओळींत जास्त अंतर असल्यास त्यात सोयाबीन किंवा उडीद / मुगाचे आंतरपीक घ्यावे. कापूस पिकाला लागवडीपूर्वी उपलब्धतेप्रमाणे पुरेसे शेणखत किंवा कंपोस्ट खत द्यावे. शिफारशीप्रमाणे कोरडवाहू बीटी कपाशीसाठी एकरी 25 किलो नत्र, 25 किलो स्फुरद आणि 25 किलो पालाशची मात्रा कोणत्याही खताच्या माध्यमातून लागवडीपूर्वी आडवी - उभी पेरून द्यावी. एक महिन्यानंतर 25 किलो नत्र द्यावा. माती परीक्षणाच्या आधारावर आवश्यकतेनुसार दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या मात्रा द्याव्यात. एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या दृष्टीने कापूस पिकास दर सात ओळींनंतर एक ओळ चवळीची व एक ओळ भगरीची कापसाची ओळ कमी न करता पेरावी, तसेच कापूस शेताच्या चारही बाजूंना झेंडू आणि मक्याची लागवड करावी. चवळीमुळे रस शोषण करणाऱ्या किडींचे नियंत्रण होऊन मित्र किडींची संख्या वाढते, तर झेंडू, मका व भगरीमुळे बोंडअळ्यांचे नियंत्रण होण्यास मदत होते. रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमीत कमी व्हावा, तसेच पर्यावरणाचे संतुलन राखले जावे, या दृष्टीने निंबोळी अर्काचा किंवा इतर जैविक कीटकनाशकांचा वापर महत्त्वाचा आहे, त्यासाठी प्रति एकरी किमान दहा किलो निंबोळी बिया जमा करून ठेवाव्यात.
एकात्मिक तण नियंत्रण पद्धतीमध्ये कापूस लावणीनंतर परंतु उगवणीपूर्वी (जमिनीत ओलावा असताना) पेंडींमिथॅलीन हे तणनाशक अडीच लिटर प्रति 800-1000 लिटर पाण्यात मिसळून एक हेक्टर क्षेत्रावर फवारावे. फवारणीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. फवारणीनंतर सहा आठवड्यांनी एक निंदणी व कोळपणी करावी.
: 02482 - 235586
एस. व्ही. सोनुने, कार्यक्रम समन्वयक,
कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी, जालना
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...
पावसाळा सुरू होताच चांगल्या जातीची कलमे सरकारमान्य...
सध्याच्या काळात मीठा बहराच्या अंजीर फळांच्या वाढीक...
अळूच्या लागवडीसाठी भरपूर सेंद्रिय पदार्थ असणारी, म...