लष्करी राज्यक्रांतीनंतर ते २७ ऑक्टोबर १९५८ ला पाकिस्तानचे अध्यक्ष झाले. त्यावेळचे संविधान रद्द करून त्यांनी पाकिस्तानात लष्करी अंमल जारी केला. पाकिस्तानात माजलेल्या भ्रष्टाचारास आळा घालण्याचा प्रयत्नम व जमीनधारणेचे नवीन धोरण यांमुळे ते पाकिस्तानात काही काळ फार लोकप्रिय झाले. १९६० साली घेण्यात आलेल्या निवडणुकीत ते प्रचंड बहुमताने अध्यक्ष निवडले गेले.
पाकिस्तानसाठी नवे संविधान १९६२ मध्ये कार्यवाहीत आणून त्यांनी लष्करी अंमल उठविला. बलवान मध्यवर्ती सरकार व मूलभूत लोकशाही ही त्या संविधानाची वैशिष्ट्ये होती. १९६५ मध्ये फातिमा जिना ह्यांचा पराभव करून ते पुन्हा पाकिस्तानचे अध्यक्ष झाले. सीटो, सेंटो अशा साम्यवादविरोधी लष्करी संघटनांमध्ये असूनही अयुबखानांनी चीन व रशिया ह्यांच्याशी मैत्रीचे संबंध जोडण्यात यश मिळविले. परंतु १९६५ च्या सप्टेंबर महिन्यात भारताविरुद्ध केलेल्या अयशस्वी आक्रमणानंतर त्यांच्या लोकप्रियतेस ओहोटी लागली. शेवटी पाकिस्तानातील, विशेषतः पूर्व पाकिस्तानातील, तीव्र असंतोषामुळे २५ मार्च १९६९ रोजी राज्याची सूत्रे जनरल याह्याखान ह्यांच्या हाती देऊन त्यांना निवृत्त होणे भाग पडले.
स्त्रोत - मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020
घाना हे वसाहतवादाच्या जोखडातून मुक्त झालेले पहिले ...
आयर्लंडमधील होमरूल पक्षाचा पहिला अध्यक्ष व एक राष्...
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एकथोर नेते, स्वतंत्र भ...
ही संज्ञा अनेक अर्थांनी वापरली जाते. कोणत्याही सभे...