महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ
महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ : रिझर्व्ह बँकेने १९५१–५२ मध्ये नेमलेल्या ग्रामीण पत निरीक्षण समितीच्या शिफारशीमध्ये शेतमालाचे विपणन, प्रक्रिया व इतर ग्रामीण आर्थिक क्रिया ह्यांच्या प्रगतिशील संघटनेच्या संदर्भात शेतमालाची साठवण आणि त्यासाठी वखारी व गुदामे यांचा विकास अखिल भारतीय पातळीवर व राज्य पातळीवर व्हावा, अशी महत्वाची शिफारस होती.