वातावरण बदलासाठी राष्ट्रीय कृती आराखडा औपचारिकरित्या ३० जुन, २००८ रोजी जाहीर केला गेला. या आराखड्यामध्ये विकास कार्यक्रमांना साथ देतानाच वातवरणीय बदलांना प्रभावीपणे तोंड देऊ शकणा-या उपायांचा समावेश आहे. या कार्यक्रमांतर्गत एकूण आठ “राष्ट्रीय मिशन” चा समावेश करण्यात आला आहे. हा कार्यक्रम वातवरणीय बदलांवर जागृती निर्माण करण्यावर, सुधारणा, ऊर्जासक्षमता आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन यावर लक्ष केंद्रीत करतो.
एनएपीसीसी मध्ये राष्ट्रीय सौरऊर्जा मिशनवर खूप भर दिला गेला आहे. या मिशनचे उद्दिष्ट्य आहे देशातील एकूण ऊर्जेच्या वापरामध्ये सौरऊर्जेचा वाटा वाढवणे आणि त्याचबरोबर इतर अपारंपारिक ऊर्जास्त्रोतांचा वापरदेखिल वाढवणे. यामध्ये संशोधन आणि विकास कार्यक्रमांचाही समावेश आहे ज्यात आंतरराष्ट्रीय सहकार्यातुन स्वस्त, पर्यावरणस्नेही आणि सोयीस्कर अशी सौरऊर्जा उपकरणे व यंत्रणा बनविण्यावर भर दिला जाईल.
शहरी प्रदेश, कारखाने आणि व्यापारी आस्थापने यांमध्ये वापरल्या जाणा-या कमी तापमानावर (<१५०° सें) काम करणा-या ८०% उपकरणांमध्ये आणि मध्यम तापमानावर (१५०° सें ते २५०° सें) काम करणा-या ६०% उपकरणांमध्ये सौरऊर्जेचा वापर करण्याचे एनएपीसीसी चे ध्येय आहे. हे अस्तित्वात आणण्यासाठी असणारी कालमर्यादा ११ वी आणि १२ वी पंचवार्षिक योजना म्हणजेच २०१७ पर्यंत आहे. तसेच ग्रामीण भागात वापरली जाणारी उपकरणे सार्वजनिक-खाजगी भागीदारीतुन तयार केली जातील.
एनएपीसीसी ने २०१७ पर्यंत एकत्रीत सोयीसुविधांच्या माध्यमातुन वार्षिक १००० मेगावॅट सौरऊर्जा आणि १००० मेगावॅट केंद्रीत सौरऊर्जा बनवण्याचे ध्येय आखले आहे.
ऊर्जा सक्षमीकरणासाठी भारत सरकारने या आधीच अनेक पाऊले उचलली आहेत. यांच्यासोबतीनेच एनएपीसीसी खालील गोष्टी करणार आहे:
या मिशनचा हेतू आहे त्रिसुत्री वापरुन आवास अधिकाधिक पर्यावरणस्नेही करणे. या त्रिसुत्रीमध्ये खालील बाबी समाविष्ठ आहेत:
पाण्याचे संवर्धन करणे, अपव्यय कमीतकमी करणे आणि एकत्रित सुयोग्य जलव्यवस्थापनातुन पाण्याचे समान वाटप करणे हे या या मिशनचे उद्दीष्ठ्य आहे. हे मिशन पाण्याची वापरक्षमता २०% ने वाढविण्यासाठी आराखडा तयार करेल. शिवाय पावसाच्या प्रमाणातील अनियमितता आणि नद्यांच्या प्रवाहाचे उत्तम व्यवस्थापन करण्यासाठीही आराखडे तयार करेल. उदा. भुस्तरावरील आणि भुगर्भातील पाण्याची पातळी वाढवणे, पावसाच्या पाण्याची साठवण, जलसिंचनाच्या अधिक कार्यक्षम पद्धती विकसित करणे, इ.
यामध्ये स्थानिक समुदायांना, विशेषतः पंचायतींना सक्षम करुन त्यांना स्थानिक पर्यावरण साधनसंपत्तीचे संरक्षण करण्याची जबाबदारी देण्यात येणार आहे. या मिशनमध्ये २००६ च्या राष्ट्रीय पर्यावरण धोराणातील खालील उपाय देखिल नमुद करण्यात आलेले आहेत :
या मशिनमध्ये पर्यावरणसंस्थेची कार्यक्षमता वाढवण्यावर भर दिला जाईल. जसे कार्बन शोषणाचे प्रमाण वाढविणे. याची आखणी पंतप्रधानांच्या ग्रीन इंडिया मोहिमेवर करण्यात आली आहे ज्यामध्ये ६० लाख हेक्टर क्षेत्रफळावर वनीकरण करण्यात येणार आहे आणि भारतातील वनीकरणाखालील क्षेत्र २३% वरुन ३३% करण्याचे उद्दिष्ठ्य आहे. राज्य वनखात्यांच्याअंतर्गत स्थापन केलेल्या संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांच्या माध्यमातुन -हास झालेल्या वनजमिनींवर ही योजना राबविली जाणार आहे. या समित्या समुदायांच्या थेट कृतीस प्रोत्साहन देतील.
याचे उद्दिष्ठ्य आहे पिकांच्या नवनवीन प्रजाती आणि शेतीच्या नवनवीन पद्धती शोधुन भारतीय शेतीला हवामान बदलासाठी अधिकाधिक लवचिक करणे. याची अंमलबजावणी पारंपारिक ज्ञान आणि प्रत्यक्ष यंत्रणा, माहिती तंत्रज्ञान आणि जैवतंत्रज्ञान तसेच नवीन कर्ज व विमा प्रक्रिया यांच्या एकत्रीकरणाद्वारे केली जाईल.
हे मिशन निरनिराळ्या तंत्रांच्या माध्यमातुन संशोधन आणि तंत्रज्ञान विकास आणि सहकार्यासाठी जागतिक स्तरावर काम करेल. याशिवाय त्यांची स्वतःची संशोधन कार्यक्रमपत्रिकादेखिल असेल ज्याला वातवरणीय बदलाशी संबंधित विषयांच्या अभ्यासाला वाहिलेल्या संस्था आणि विद्यापीठांचा आणि वातावरणीय संशोधन निधीचा पाठिंबा असेल. हे मिशन खाजगी क्षेत्रातील अशा प्रकारच्या विकास कार्यक्रमांनादेखिल प्रोत्साहन देईल.
या आठ मिशन संबंधित खात्यांमार्फत अस्तित्वात आणल्या जातील आणि त्या त्या खात्यांसोबतच वित्त खाते आणि नियोजन आयोग तसेच त्या त्या क्षेत्रातील तज्ञ यांच्यामार्फत हाताळल्या जातील.
स्त्रोत: http://pmindia.nic.in
अंतिम सुधारित : 7/6/2020
महाराष्ट्र राज्याचे नवीन व नवीकरण उर्जा स्त्रोत (...
पवन ऊर्जा, सौर ऊर्जा, लघुजल विद्युत सहवीज निर्मिती...