झाडाच्या ठराविक भागातून किंवा एकल कोशिका वा कोशिकांच्या समूहातून एका चाचणी नळीमध्ये, नियंत्रित आणि अत्यंत स्वच्छ पद्धतीने नव्या रोपाची ऊत्पत्ती करण्याच्या पद्धतीला " ऊतिसंवर्धन किंवा टिशू कल्चर " म्हणतात.
केळे हे मूलतः एक उष्णकटिबंधीय पिक असून, १३ºC – ३८ºC तापमानात चांगले येते त्यासाठी सापेक्ष आर्द्रता ७५-८५% लागते. भारतात हे पिक वेगवेगळ्या जातीचे जसे ग्रॅन्डनाईन वगैरे त्या हवामानाप्रमाणे उष्णकटिबंधीय, आर्द्रता असलेले प्रदेश वा हलक्या कोरड्या प्रदेशात घेतले जाते. १२ºC पेक्षा कमी तापमान केळ्याच्या पिकाला जलद गतीने नुकसान करते. केळ्याची सामान्य वाढ १८ºC इतक्या तापमानात सुरु होते, २७ºC ला इष्टतम वर पोहोचते, मग झाड खाली वाकते व वाढ ३८ºC ला थांबते. उच्च तापमानात केळे सुर्यप्रकाशाने काळपटते. ८० कि.मी प्रति तास वादळाचा जोर असल्यास पिकाचा नाश होतो.
केळ्यासाठी मातीही चांगली कसदार हवी, पुरेशी कस असलेली आणि भुसभुशित असलेली माती असावी. खोल, सुपिक व ६-७.५ सामु असलेली जमीन केळीसाठी अतिउत्तम आहे. क्षारयुक्त, न नांगरलेली आणि सुपिकता नसलेली जमीन केळीच्या पिकासाठी अजिबात चांगली नाही. खारट (क्षारयुक्त), कॅल्शियमयुक्त जमीन केळीच्या पिकासाठी उपयुक्त नाही. कस नसलेली जमीन, किंवा उतारावरची जमीन, किंवा रेतियुक्त जमीन आणि काळी कापसाळ जमीन या पिकासाठी घेऊ नका.
जमीन जास्त आम्लयुक्त व जास्त क्षारयुक्त नसावी, सुपिक, कर्ब पदार्थांनी युक्त व भरपूर प्राणवायु असलेली, पुरेसा स्फुरद स्तर असलेली आणि भरपूर प्रमाणात पोटॅशियम असलेली जमीन केळीच्या पिकासाठी अतिऊत्तम आहे.
भारतात केळीचे पिक विविध स्थिती आणि उत्पादन प्रणालीत घेतले जाते. म्हणून केळ्याच्या जाती ह्या त्याच्या गरजेनुसार आणि अशा परिस्थितित विभिन्न प्रकारानुसार ठरविल्या जातात. परंतु जवळजवळ 20 जाती अर्थात बुटकी तुकड़ेवाली, तंबाकू, रोबस्टा, मोनथान, पुवन, नेंद्रन, लाल केळे, नयाली, सफेद वेलची, बनारसी, अर्धपुरी, रस्थाळी, कर्पूरवल्ली, कर्दळी(मुसासिड) आणि मोठी नैनी (बसराई) आदि जाती उपलब्ध आहेत. मोठी नैनी(बसराई) ही जात त्याच्या सहनशक्ति आणि जैव तणाव घेऊ शकत असल्याने आणि त्याच्या घडाच्या ऊत्तम गुणवत्तेमुळे प्रसिद्धी पावते आहे आणि आता आवडते पिक बनू लागली आहे. घडाला एकसारखी, सुरचित आणि मोठाली अशी केळी येतात. फळाचा रंग पिवळट असून त्याची टिकण्याची क्षमता आणि गुणवत्ता इतर केळींपेक्षा चांगली आहे.
केळीच्या लागवडीपुर्वी, त्या जमीनीवर हिरव्या भाज्या जसे दाईंच्या, गौदाणे इ. पिक घ्यावे. मग, जमीन २-४ वेळा नांगरुन एका पातळीत आणावी. लोखंडाचा नांगर, कुळवाच्या पाळ्या वापरुन जमीन भुसभुशीत करावी. जमीनीची मशागत करतेवेळी कंपोस्ट खत किंवा कुजलेले शेणखत घालून मिसळावे.
लागवडीसाठी ४५ सेंमी x ४५ सेंमी x ४५ सेंमी आकाराचे खड्डे खोदून किंवा स-या पाडून घ्याव्या लागतात. मग खड्ड्यात माती आणि शेणखताचे मिश्रण टाकले जाते (कुजलेले शेणखत), २५० ग्रॅम एरंडीची पेंड आणि २० ग्रॅम काँन्बोफोरन घालावे लागते. तयार झालेले खड्डे सूर्य प्रकाशासाठी तसेच ठेवले जातात जेणेकरुन त्यातील हानीकराक विषाणू किंवा किडे मरुन ती माती सुपिक होईल आणि त्यात हवेचे देखील प्रसारण वाढेल. जिथे क्षारयुक्त माती असते आणि सामु ८ पेक्षा जास्त असतो तेथे खड्यांमध्ये शेणखतासोबत नत्रयुक्त जोरखत वापरले जाते.
अंदाजे ५००-१००० ग्रॅम वजनाचे खोल नांगर जमीनीच्या नांगरणीसाठी वापरले जातात. नांगरावर रोगांचे विषाणू किंवा जंतू असू शकतात. नांगराचा जुनेपणा आणि त्याची नांगरण्याची ताकद ही वेगवेगळी असल्यास जमीन चांगली नांगरली जात नाही आणि मशागत अवघड होवून बसते.
म्हणून, अशा प्रकारच्या मशागतीत ऊतिसंवर्धन किंवा टिशू कल्चर केलेली झाडे लावणे ऊत्तम असते. कारण ही झाडे सशक्त, निरोगी क्षमता असणारी आणि मजबूत असतात. चांगल्या पद्धतीने तयार केलेले ठोंब (सकर) जी तलवारीच्या पात्याप्रमाणे टोकदार असलेली आणि दणकट बुंध्यांची अशी रोपे अभिवृद्धीकरीता वापरली जाणे आवश्यक आहे
ऊतिसंवर्धन तंत्राचा वापर केलेले केळीचे पिक वर्षातून कधीही घेता येते फक्त तापमान फार कमी वा फार जास्त नसावे. ठिबक सिंचन प्रणालीचा उपयोग करणे फार महत्वाचे आहे. भारतात, महाराष्ट्रात दोन महत्वाचे हंगाम येतात; मृग बाग (खरीप) पिक घेण्याचा हंगाम जून-जुलै. कांदे बाग (रब्बी) हंगाम ऑक्टोबर - नोव्हेंबर.
पूर्वी केळीची लागवड १.५ मी. x १.५ मी. मध्ये केली जायची, पण झाडांची वाढ आण त्याचे उत्पन्न कमी यायचे कारण सूर्यकिरणे झाडांना मिळण्यास कठीण जायचे. जैन इरिगेशन सिस्टीमच्या प्रयोगशाळेत मोठी नैनी(बसराई) या जातीवर वेगवेगळ्या प्रकारे संशोधन केले गेले. आणि दोन रोपातील अंतर हे १.८२ मी. x १.८२ मी. योग्य आहे असे प्रमाणित करण्यात आले, ह्यामुळे १ एकर मध्ये १४५२ झाडे मावतात (३६३० झाडे १ हेक्टरमध्ये) यामध्ये रेषा उत्तर-दक्षिण दिशेने असेल आणि दोन ओळीतील अंतर १.८२ मी. असेल. उत्तर भारत, किनार पट्टी आणि जिथे आर्द्रता फार आहे आणि काही वेळा तापमान ५-७ ºC पेक्षा कमी होते अशा प्रदेशांत, दोन झाडातील अंतर २.१ मी. x १.५ मी. पेक्षा कमी नसावे.
मोठी नैनी(बसराई) पिकासाठी पिक-भूमिती
झाडाच्या मुळापासली पॉलिबॅग काढून झाड वेगळे केले जाते आणि झाड खड्यात २ सें.मी. रोप वरपर्यंत ठेवून खड्डा बंद केला जातो. झाडाच्या भोवतीची माती हळूवारपणे दाबली जाते. झाड खोलपर्यंत पेरणे टाळावे.
केळीला चांगले पिक येण्याकरिता भरपूर प्रमाणात पाणी लागते. पण खोडाजवळ पाणी साठून राहणार नाही याची काळजी घ्यावी लागते. म्हणून केळीच्या पिकासाठी भारतातील तापमानाप्रमाणे ठिबक सिंचन पद्धती वापरणे फार गरजेचे आहे. वर्षाला केळीच्या पिकाला २००० मि.मी. पाणी लागते असे लक्षात आले आहे. असे दिसून आले आहे की ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केल्यास पाण्याचा वापर योग्य प्रमाणात आणि चांगल्या प्रकारे करता येतो. ठिबकसिंचन पद्धतीचा वापर केल्यास ५६% पाण्याची बचत होते आणि उत्पादन २३-३२% इतके वाढते. केळीची पेरणी झाल्यावर लगोलग पाणी द्यावे. पाणी पुरवठा व्यवस्थित असावा. खोडाजवळ पाणी साठून राहणार नाही याची काळजी घ्यावी कारण त्यामुळे मुळाजवळच्या मातीतील हवा उडून जाईल आणि त्याने विकास आणि वाढीवर परिणाम होईल. आणि म्हणून योग्य पाणी पुरवठा फार महत्वाचा आहे
|
केळीला अन्नद्रव्यांची मागणी जास्त असते, जी झाडाला मातीच्या काही भागातूनच मिळते. भारतातील केळीच्या पिकांच्या गरजा लक्षात घेऊन तयार केलेली अन्नद्रव्यांची मागणी पुढील प्रमाणे आहे. 20 किलो शेणखत, 200 ग्रॅम नायट्रोजन; 60-70 ग्रॅम स्फुरद; 300 ग्रॅ. पोटॅशियम प्रति झाड. केळीला पोषकांची मागणी जास्त असते. एका झाडास ७-८ किलो नायट्रोजन, ०.७- १.५ किलो स्फुरद. आणि १७-२० किलो. पोटॅशियम प्रति मेट्रीक टन. केळी अन्नद्रव्यांना चांगला प्रतिसाद देते. पूर्वी शेतकरी जास्त प्रमाणात युरिया आणि कमी प्रमाणात फॉफाँस्फरस आणि पोटॅश वापरायचे.
अन्नद्रव्यांचा खतांमधून निचरा होऊ नये, जसे नायट्रोजनची खतांमधून गळती, वाफ होऊन उडणे, बाष्पीकरण आणि स्फुरद आणि पोटॅशियमचा मातीतून निचरा होऊ नये म्हणून पाणी ठिबक सिंचन पद्धतीने यासर्वांचे मिश्रण करुन देणे फायद्याचे ठरते. ठिबक सिंचन पद्धतीने पाणी दिल्यास पिकात २५-३०% वाढ दिसून आली आहे. जास्तकरुन या पद्धतीत, मनुष्यबळ वाचते आणि वेळ आणि पैसे दोन्हींची बचत होते आणि खते आणि अन्नद्रव्य समानतेने पसरतात.
खाली दिलेल्या माहिती प्रमाणे मोठी नैनी (बसराई) केळीच्या जातीवर ठिबकसिंचन पद्धतीने पाणी व खतांची फवारणी कोणत्या पद्धतीने करावी हे निदर्शनास येते :
मोठी नैनी (बसराई) केळीच्या जातीवर पाणी आणि खतांच्या फवारणीचा आराखडा
|
आंतरपिकाचे संचालन
केळीची मुळे फार नाजूक आणि संवेदनशील असतात आणि फार मशागतीने नुकसान होऊ शकते, आंतरपिके घेणे हितावह नाही. पण, कमी वेळेची पिके (४५-६० दिवस) जसे मूग, चवळी, दैनचा अशी हिरवी शेंगभाजीची पिके घेता यातील. शेंगभाज्या असल्याने यावर किड लागण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे ह्या पिकांना किटकांपासून वाचवले पाहिजे, जेणेकरुन केळीला नुकसान होणार नाही.
ग्लायफॉस्फेटची फवारणी(पूर्णपणे) पेरणीपूर्वी करणे गरजेचे आहे, याचे प्रमाण २ लिटर प्रति हेक्टर असे असावे जेणेकरुन गवताची वाढ थांबेल. आणि हाताने गवताची खुरपणी देखील २ ते ३ वेळा करावी लागते.
सूक्ष्मपोषकतत्वांचा स्प्रे
झिंक सल्फेट (0.५%), फेरोम सल्फेट (0.2%), कॉपर सल्फेट (0.2%) आणि बोरिक एसिड (0.१%) यांच्या मिश्रणाची फवारणी केल्याने केळ्याची शारीरिक वाढ होऊन त्यात गुण उपजतील आणि दर्जा अधीक वाढेल.सूक्ष्मपोषकतत्वांच े१००लिटरपाण्यात मिश्रणकरुनहेखालीलप्रमाणे तयारकेलेजाते.
|
केळीची उत्पादकता आणि गुणवत्ता वाढीसाठी काही खास उपक्रम राबविले जातात.
उपठोंब काढणे
केळीच्या बुंध्यालगत अनेक उपठोंब येऊ लागतात. ते वेळच्यावेळी काढून टाकावे लागतात ज्याने पालक रोपाला संरक्षण मिळते.
ठोंब काढण्याचे काम झाडाला फूल येईपर्यंत करावे लागते. केळीत घ्यावयच्या मिश्र पिकांची निवड करताना मुख्य पिकातील अंतर, अन्नद्रव्यांचा पुरवठा इत्यादी बाबींचा विचार करुन केळीला मोहोर आल्यावर ती घ्यावीत. आंतरपिके ही मोहोराच्या विरद्ध दिशेने हवीत. मुख्य पिकाच्या फार दूर असावीत.
घड आकार घेताना त्याच्या टोकास असलेले वांझ केळफूल त्या घडातील केळ्यांच्या शेजारी फणीपासून थोड्या अंतरावर कापून टाकावे. म्हणजे, घडातील केळी चांगली पोसून त्याचे वजन वाढते. काही ठिकाणी ही केळफुले काढली जात नाहीत व कापणीच्याच वेळी ती घडाबरोबर निघतात. पण, अशाने केळ्याच्या गुणवत्तेवर फरक पडतो. म्हणून फूल लागल्यावर लगेच ती काढून टाकण्याचा सल्ला दिला जातो.
पाने एकमेकावर आपटण्याने फळाला नुकसान पोहोचवतात, म्हणून, अशी पाने संशोधनाच्या वेळी त्वरीत कापून टाकवीत. जुनी पाने किडलेली, सडलेली देखील असू शकतात, ती काढावीत. पण, हिरवीगार पाने काढू नये. ती घडाचे संरक्षण करतात.
केळीच्या बागेतील जमीन वेळच्यावेळी स्वच्छ आणि भूसभुशीत ठेवावी. जमीनीची मशागत ३-४ महिन्यात पेरणीनंतर सूरु करावी. ऊदाहरणार्थ, १०-१२” पर्यंत कोळपण्या घ्याव्यात. पुढे हाताने चाळणी करावी. असा सल्ला दिला जातो की झाडापासून २-३” जरा ऊंचसा कट्टा पाण्याच्या ठिबकसाठी करावा, ज्यामुळे झाडाचे वा-यापासून देखील काही प्रमाणात संरक्षण होईल.
नरकळ्या काढून टाकण्याने फळाच्यावाढीस मदत होते आणि फांदीचे वजन वाढते. ह्या नर कळ्या १-२ हात लांबीवर एका बोटाचे अंतर ठेवून कापून काढल्या जातात.
शेंडा स्प्रे
सूक्ष्म पोषकतत्वांचा स्प्रे (०.२%) सर्व मोहोर फुलल्यावर करतात ज्याने कळ्या किंवा शेंडे गळून पडण्याचा रोग होत नाही. गळती रोगाने फळाचा रंग फिकट होतो आणि ते ओंगळ दिसते.
सुर्यप्रकाशापासून इजा होऊ नये म्हणून केळीच्या घडाभोवती त्याच झाडाची वाळलेली पाने गुंडाळतात, ती खर्च देखील वाचवतात आणि घडाचे संरक्षण करतात आणि झाकल्याने केळाची गुणवत्ता वाढते. पण, पावसाळ्यात हे शक्यतो टाळावे.
असे आवरण केल्याने घडाचे धुळीपासून, फवारणीच्या औषधांच्या परिणामांपासून, किटके आणि पक्षांपासून संरक्षण होते. यासाठी निळ्या प्लॅस्टीकचे आवरण देखील केले जाते. असे केल्याने घडाचे तापमान वाढून ते लवकर पिकण्यास मदत होते.
घडामध्ये काही फण्या न वाढलेल्या किंवा कमी वाढ झालेल्या असतात, जे पुढे ऊत्तम फळ देणार नाही, त्यामुळे अशा फण्या हात मोहोरानंतर फळ धरल्यावर वेळीच खुडाव्या लागतात. ह्यामुळे उरलेल्या घडाला चांगले पोषण मिळते. काहीवेळा अशा फण्यांबरोबर वर-खाली असलेल्या फण्या देखील काढून टाकावे लागतात.
काही वेळा घड तयार झाल्यावर झाडाचे वजन वाढते आणि ते खाली पडू लागते, त्यामुळे फळाचा दर्जा आणि गुणवत्ता यावर परिणाम होतो. म्हणून अशा झाडांना काठीचा आधार देऊन ऊभे केले जाते. किंवा दोन बाबूंच्या आधारे तिसरा बांबू लावून त्रिकोण तयार केला जातो आणि घडाला आधार दिला जातो यामुळे घड एकसारखा वाढतो.
जिवाणू, विषाणू आणि किटक रोग आणि किटकांचा प्रादूर्भाव आणि टोळ यांचा केळ्यावर प्रादूर्भाव होतो आणि केळ्याचे उत्पादन आणि गुणवत्ता खालावते. खाली काही महत्वाचे रोग त्याचे परिणाम व त्यावर उपाय दिलेले आहेत :
|
झाडावर केळी पूर्णपणे वाढून तयार झाल्यावर घड कापून जलद गतीने ग्राहकांपर्यंत पोहचविण्याची गरज असते. यामुळे केळीची गुणवत्ता टिकून राहते. फळ फार लवकर पिकते म्हणून त्याची कापणीनंतर त्वरीत विल्हेवाट लावावी लागते.
परिपक्वता सूचकांक
व्यापारी केळ्यांची खरेदी केळी बागेत घडांची संख्या, आकारमान, त्याचे वजन, रंग, घेर, त्याचा कोन इत्यादी पाहूनच ठरवितात. बाजारात केळीची किंमत त्याच्या कच्चेपणा आणि पिकलेल्या गुणवत्तेवरुन ठरवितात.
घडाची कापणी जेव्हा दुसरा हात वरुन ३ ते ४ गोलाकार होतो आणि पहिल्या हातानंतर वर ३० मि. होतो तेव्हा सुरु करतात. पहिला हात उघडल्यावर १००-११० दिवसात घड काढण्याचे काम होऊ शकते. काढलेले घड हे व्यवस्थित पानांचा थर देऊन तयार केलेल्या ट्रे किंवा बास्केट मध्ये साठवावे आणि गोदामात आणावेत. घड कापल्यानंतर उजेडापासून दूर ठेवावेत, कारण उजेडात केळी लवकर पिकतात आणि मऊ पडतात. किरकोळ विक्रेते भट्टीचा तयार माल घेऊन डझनावर विक्री करतात.
निर्यातीसाठी, केळीचे हात ४-१६ बोटांवर त्याच्या रुंदी आणि लांबीनुसार कापून, व्यवस्थित प्लास्टीकचे आवरण असलेल्या डब्यात वेगवेगळ्या वजनात निर्यातीच्या मागणीप्रमाणे बंद केले जातात.
घड काढल्यानंतरची कामे
गोदामात साठवलेल्या फळांमधून सडलेली आणि पिकलेली केळी बाजूला काढली जातात जी नंतर जवळच्या बाजारात विकायला पाठवली जातात. पण, जिथे निर्यातीचा प्रश्न आहे आणि त्याची गुणवत्ता महत्वाची आहे, तेथे घडावरुन फण्या मोकळ्या केल्या जातात, फळांना वाहत्या पाण्याखाली धरुन स्वच्छ केले जाते किंवा सोडीयम हायपोक्लोराईटच्या पाण्याने त्यावरचे मेण काढले जाते आणि त्यावर थायोबेंडँसोलची प्रक्रीया केली जाते; मग हवेच्या बंद पेटीत त्या फण्या व्यवस्थित रचले जातात प्रति १४.५ किलो किंवा जशी गरज असेल त्याप्रमाणे. आजूबाजूला पॉलिथीनच्या पिशवीची किनार करुन बंद केले जाते. १३-१५º सें. वातानूकुलीत तापमानात हे साठवले जातात आणि ८०-९०% आर एच राखला जातो. असा साठवलेला माल १३ º सें. च्या वातानूकुलीत साखळीतून बाजारात पाठवला जातो.
पेरणीनंतर ११-१२ महिन्यात झाड कापणीसाठी तयार होते. पहिले पुनरपिक ८-१० महिन्यात कापणीसाठी तयार होते तर दुस-या पुनरपिकाला पहिल्या पिकापेक्षा ८-९ महिने लागतात.
म्हणून २८-३० महिन्यात, ३ पिके घेणे शक्य असते. जसे. एक मुख्य पिक आणि २ पुनरपिके घेता येतात. ठिबक सिंचन पद्धतीच्या मशागतीत उतिसंवर्धन घेतल्यास केळ्याचे १०० टक्के प्रति उत्पादन करता येते, पिकाची व्यवस्थित काळजी घेतल्यास पुनरपिक देखील तेवढेच घेता येते.
स्त्रोत : पोर्टल कन्टेट टिम
अंतिम सुधारित : 10/7/2020
मध्यम, ओलावा टिकवून ठेवणारी; परंतु पाण्याचा निचरा ...
अंजीर फळांचा टिकाऊपणा जास्त वाढविण्याकडे विशेष लक्...
या विभागात अंजीर या फळ पिकाविषयी माहिती दिली आहे.
जमिनीत वाढणाऱ्या खोडाच्या टोकास सु. १मी. लांब, बिन...