অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

केळीचे टिशू कल्चर

केळीचे टिशू कल्चर

ऊतिसंवर्धन किंवा टिशू कल्चर

झाडाच्या ठराविक भागातून किंवा एकल कोशिका वा कोशिकांच्या समूहातून एका चाचणी नळीमध्ये, नियंत्रित आणि अत्यंत स्वच्छ पद्धतीने नव्या रोपाची ऊत्पत्ती करण्याच्या पद्धतीला " ऊतिसंवर्धन किंवा टिशू कल्चर " म्हणतात.

banana.jpg

कृषि हवामान

केळे हे मूलतः एक उष्णकटिबंधीय पिक असून, १३ºC – ३८ºC तापमानात चांगले येते त्यासाठी सापेक्ष आर्द्रता ७५-८५% लागते. भारतात हे पिक वेगवेगळ्या जातीचे जसे ग्रॅन्डनाईन वगैरे त्या हवामानाप्रमाणे उष्णकटिबंधीय, आर्द्रता असलेले प्रदेश वा हलक्या कोरड्या प्रदेशात घेतले जाते. १२ºC पेक्षा कमी तापमान केळ्याच्या पिकाला जलद गतीने नुकसान करते. केळ्याची सामान्य वाढ १८ºC इतक्या तापमानात सुरु होते, २७ºC ला इष्टतम वर पोहोचते, मग झाड खाली वाकते व वाढ ३८ºC ला थांबते. उच्च तापमानात केळे सुर्यप्रकाशाने काळपटते. ८० कि.मी प्रति तास वादळाचा जोर असल्यास पिकाचा नाश होतो.

माती

केळ्यासाठी मातीही चांगली कसदार हवी, पुरेशी कस असलेली आणि भुसभुशित असलेली माती असावी. खोल, सुपिक व ६-७.५ सामु असलेली जमीन केळीसाठी अतिउत्तम आहे. क्षारयुक्त, न नांगरलेली आणि सुपिकता नसलेली जमीन केळीच्या पिकासाठी अजिबात चांगली नाही. खारट (क्षारयुक्त), कॅल्शियमयुक्त जमीन केळीच्या पिकासाठी उपयुक्त नाही. कस नसलेली जमीन, किंवा उतारावरची जमीन, किंवा रेतियुक्त जमीन आणि काळी कापसाळ जमीन या पिकासाठी घेऊ नका.

जमीन जास्त आम्लयुक्त व जास्त क्षारयुक्त नसावी, सुपिक, कर्ब पदार्थांनी युक्त व भरपूर प्राणवायु असलेली, पुरेसा स्फुरद स्तर असलेली आणि भरपूर प्रमाणात पोटॅशियम असलेली जमीन केळीच्या पिकासाठी अतिऊत्तम आहे.

जाती

भारतात केळीचे पिक विविध स्थिती आणि उत्पादन प्रणालीत घेतले जाते. म्हणून केळ्याच्या जाती ह्या त्याच्या गरजेनुसार आणि अशा परिस्थितित विभिन्न प्रकारानुसार ठरविल्या जातात. परंतु जवळजवळ 20 जाती अर्थात बुटकी तुकड़ेवाली, तंबाकू, रोबस्टा, मोनथान, पुवन, नेंद्रन, लाल केळे, नयाली, सफेद वेलची, बनारसी, अर्धपुरी, रस्थाळी, कर्पूरवल्ली, कर्दळी(मुसासिड) आणि मोठी नैनी (बसराई) आदि जाती उपलब्ध आहेत. मोठी नैनी(बसराई) ही जात त्याच्या सहनशक्ति आणि जैव तणाव घेऊ शकत असल्याने आणि त्याच्या घडाच्या ऊत्तम गुणवत्तेमुळे प्रसिद्धी पावते आहे आणि आता आवडते पिक बनू लागली आहे. घडाला एकसारखी, सुरचित आणि मोठाली अशी केळी येतात. फळाचा रंग पिवळट असून त्याची टिकण्याची क्षमता आणि गुणवत्ता इतर केळींपेक्षा चांगली आहे.

जमीनीची पूर्व मशागत

केळीच्या लागवडीपुर्वी, त्या जमीनीवर हिरव्या भाज्या जसे दाईंच्या, गौदाणे इ. पिक घ्यावे. मग, जमीन २-४ वेळा नांगरुन एका पातळीत आणावी. लोखंडाचा नांगर, कुळवाच्या पाळ्या वापरुन जमीन भुसभुशीत करावी. जमीनीची मशागत करतेवेळी कंपोस्ट खत किंवा कुजलेले शेणखत घालून मिसळावे.
लागवडीसाठी ४५ सेंमी x ४५ सेंमी x ४५ सेंमी आकाराचे खड्डे खोदून किंवा स-या पाडून घ्याव्या लागतात. मग खड्ड्यात माती आणि शेणखताचे मिश्रण टाकले जाते (कुजलेले शेणखत), २५० ग्रॅम एरंडीची पेंड आणि २० ग्रॅम काँन्बोफोरन घालावे लागते. तयार झालेले खड्डे सूर्य प्रकाशासाठी तसेच ठेवले जातात जेणेकरुन त्यातील हानीकराक विषाणू किंवा किडे मरुन ती माती सुपिक होईल आणि त्यात हवेचे देखील प्रसारण वाढेल. जिथे क्षारयुक्त माती असते आणि सामु ८ पेक्षा जास्त असतो तेथे खड्यांमध्ये शेणखतासोबत नत्रयुक्त जोरखत वापरले जाते.

लागवडीची सामग्री

अंदाजे ५००-१००० ग्रॅम वजनाचे खोल नांगर जमीनीच्या नांगरणीसाठी वापरले जातात. नांगरावर रोगांचे विषाणू किंवा जंतू असू शकतात. नांगराचा जुनेपणा आणि त्याची नांगरण्याची ताकद ही वेगवेगळी असल्यास जमीन चांगली नांगरली जात नाही आणि मशागत अवघड होवून बसते.
म्हणून, अशा प्रकारच्या मशागतीत ऊतिसंवर्धन किंवा टिशू कल्चर केलेली झाडे लावणे ऊत्तम असते. कारण ही झाडे सशक्त, निरोगी क्षमता असणारी आणि मजबूत असतात. चांगल्या पद्धतीने तयार केलेले ठोंब (सकर) जी तलवारीच्या पात्याप्रमाणे टोकदार असलेली आणि दणकट बुंध्यांची अशी रोपे अभिवृद्धीकरीता वापरली जाणे आवश्यक आहे

banana2.jpg

 

ऊतिसंवर्धन किंवा टिशू कल्चरच्या लागवड सामग्रीचे फायदे

  • ही रोपे पालक रोपांसारखी आणि व्यवस्थित असतात.
  • कीड आणि रोगांपासून मुक्त  रोपे.
  • एकसारख्या वाढीमुळे उत्पादन वाढते.
  • पिक लवकर येते – भारतासारख्या कमी जमीन असणा-या देशात लहान जमीनीचा जास्तीतजास्त वापर करता येऊ शकतो.banana3.jpg
  • वर्षभरात कधीही पिक घेता येते कारण रोपे वर्षभर मिळत राहतात.
  • कमी वेळात दोनदा पिके घेता येतात त्यामुळे लागवडीची किंमत स्वस्त होते.
  • कंपित संचयानाची गरज नसते.
  • ९५% - ९८% झाड भार सोसते.
  • नवीन प्रकार तयार करुन पाहता येतात आणि कमी काळात वाढवता येतात.

लागवडीचा हंगाम

ऊतिसंवर्धन तंत्राचा वापर केलेले केळीचे पिक वर्षातून कधीही घेता येते फक्त तापमान फार कमी वा फार जास्त नसावे. ठिबक सिंचन प्रणालीचा उपयोग करणे फार महत्वाचे आहे. भारतात, महाराष्ट्रात दोन महत्वाचे हंगाम येतात; मृग बाग (खरीप) पिक घेण्याचा हंगाम जून-जुलै. कांदे बाग (रब्बी) हंगाम ऑक्टोबर - नोव्हेंबर.

पिकाची भूमिती

पूर्वी केळीची लागवड १.५ मी. x १.५ मी. मध्ये केली जायची, पण झाडांची वाढ आण त्याचे उत्पन्न कमी यायचे कारण सूर्यकिरणे झाडांना मिळण्यास कठीण जायचे. जैन इरिगेशन सिस्टीमच्या प्रयोगशाळेत मोठी नैनी(बसराई) या जातीवर वेगवेगळ्या प्रकारे संशोधन केले गेले. आणि दोन रोपातील अंतर हे १.८२ मी. x १.८२ मी. योग्य आहे असे प्रमाणित करण्यात आले, ह्यामुळे १ एकर मध्ये १४५२ झाडे मावतात (३६३० झाडे १ हेक्टरमध्ये) यामध्ये रेषा उत्तर-दक्षिण दिशेने असेल आणि दोन ओळीतील अंतर १.८२ मी. असेल. उत्तर भारत, किनार पट्टी आणि जिथे आर्द्रता फार आहे आणि काही वेळा तापमान ५-७ ºC पेक्षा कमी होते अशा प्रदेशांत, दोन झाडातील अंतर २.१ मी. x १.५ मी. पेक्षा कमी नसावे.

banana4.jpg

मोठी नैनी(बसराई) पिकासाठी पिक-भूमिती

लागवडीची पद्धत

झाडाच्या मुळापासली पॉलिबॅग काढून झाड वेगळे केले जाते आणि झाड खड्यात २ सें.मी. रोप वरपर्यंत ठेवून खड्डा बंद केला जातो. झाडाच्या भोवतीची माती हळूवारपणे दाबली जाते. झाड खोलपर्यंत पेरणे टाळावे.

banana5.jpg

पाणी देणे

केळीला चांगले पिक येण्याकरिता भरपूर प्रमाणात पाणी लागते. पण खोडाजवळ पाणी साठून राहणार नाही याची काळजी घ्यावी लागते. म्हणून केळीच्या पिकासाठी भारतातील तापमानाप्रमाणे ठिबक सिंचन पद्धती वापरणे फार गरजेचे आहे. वर्षाला केळीच्या पिकाला २००० मि.मी. पाणी लागते असे लक्षात आले आहे. असे दिसून आले आहे की ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केल्यास पाण्याचा वापर योग्य प्रमाणात आणि चांगल्या प्रकारे करता येतो. ठिबकसिंचन पद्धतीचा वापर केल्यास ५६% पाण्याची बचत होते आणि उत्पादन २३-३२% इतके वाढते. केळीची पेरणी झाल्यावर लगोलग पाणी द्यावे. पाणी पुरवठा व्यवस्थित असावा. खोडाजवळ पाणी साठून राहणार नाही याची काळजी घ्यावी कारण त्यामुळे मुळाजवळच्या मातीतील हवा उडून जाईल आणि त्याने विकास आणि वाढीवर परिणाम होईल. आणि म्हणून योग्य पाणी पुरवठा फार महत्वाचा आहे


महिना (मृग बाग)

मात्रा (लिटर प्रतिदिन)

महिना (कांदे बाग)

मात्रा (लिटर प्रतिदिन)

जून

०६

ऑक्टोबर

०४-०५

जूलै

०५

नोव्हेंबर

०४

ऑगस्ट

०६

डिसेंबर

०४

सप्टेंबर

०८

जानेवारी

०६

ऑक्टोबर

१०-१२

फेब्रूवारी

०८-१०

नोव्हेंबर

१०

मार्च

१० - १२

डिसेंबर

१०

एप्रील

१६- १८

जानेवारी

१०

मे

१८-२०

फेब्रुवारी

१२

जून

१२

मार्च

१६-१८

जुलै

१२

एप्रील

२०-२२

ऑगस्ट

१४

मे

२५-३०

सप्टेंबर

१४- १६

खतेव वरखते

केळीला अन्नद्रव्यांची मागणी जास्त असते, जी झाडाला मातीच्या काही भागातूनच मिळते. भारतातील केळीच्या पिकांच्या गरजा लक्षात घेऊन तयार केलेली अन्नद्रव्यांची मागणी पुढील प्रमाणे आहे. 20 किलो शेणखत, 200 ग्रॅम नायट्रोजन; 60-70 ग्रॅम  स्फुरद; 300 ग्रॅ. पोटॅशियम प्रति झाड. केळीला पोषकांची मागणी जास्त असते. एका झाडास ७-८ किलो नायट्रोजन, ०.७- १.५ किलो स्फुरद. आणि १७-२० किलो. पोटॅशियम प्रति मेट्रीक टन. केळी अन्नद्रव्यांना चांगला प्रतिसाद देते. पूर्वी शेतकरी जास्त प्रमाणात युरिया आणि कमी प्रमाणात फॉफाँस्फरस आणि पोटॅश वापरायचे.
अन्नद्रव्यांचा खतांमधून निचरा होऊ नये, जसे नायट्रोजनची खतांमधून गळती, वाफ होऊन उडणे, बाष्पीकरण आणि स्फुरद आणि पोटॅशियमचा मातीतून निचरा होऊ नये म्हणून पाणी ठिबक सिंचन पद्धतीने यासर्वांचे मिश्रण करुन देणे फायद्याचे ठरते. ठिबक सिंचन पद्धतीने पाणी दिल्यास पिकात २५-३०% वाढ दिसून आली आहे. जास्तकरुन या पद्धतीत, मनुष्यबळ वाचते आणि वेळ आणि पैसे दोन्हींची बचत होते आणि खते आणि अन्नद्रव्य समानतेने पसरतात.

फवारणीच्या वेळा

खाली दिलेल्या माहिती प्रमाणे मोठी नैनी (बसराई) केळीच्या जातीवर ठिबकसिंचन पद्धतीने पाणी व खतांची फवारणी कोणत्या पद्धतीने करावी हे निदर्शनास येते :

मोठी नैनी (बसराई) केळीच्या जातीवर पाणी आणि खतांच्या फवारणीचा आराखडा

एकूण पोषक तत्वांची आवश्यकता

एन – २०० ग्रॅ प्रति झाड

पी- ६०-७० ग्रॅ प्रति झाड

के - 300 ग्रॅ प्रति झाड

एकूण पोषक तत्वांची आणि खतांची प्रति एकर आवश्यकता
(अंतर १.८ x १.५ मि; १४५२ झाडे)

युरीया (एन)

एसएसपी (पी)

एमओपी (के)

४३१.०

३७५.०

५०० ग्रॅ प्रति झाड

६२५.०

५४५.०

७२६ किलो प्रति एकर

 


प्रयोगाचा अवधी

मूळ

मात्रा (ग्रॅ / झाड)

पेरणीच्या वेळी

एसएसपी

१००

एमओपी

५०

पेरणीपासून १० व्या दिवशी

युरीया

२५

पेरणीच्या ३० व्या दिवशी

युरीया

२५

एसएसपी

१००

एमओपी

५०

सूक्ष्म पोषके

२५

मॅ.सल्फे

२५

सल्फर

१०

पेरणी नंतर ६० व्या दिवशी

युरीया

५०

एसएसपी

१००

एमओपी

५०

पेरणी नंतर ९० व्या दिवशी

युरीया

६५

एसएसपी

१००

एमओपी

५०

सूक्ष्म पोषके

२५

सल्फर

३०

मॅ.सल्फे

२५

पेरणी नंतर १२० व्या दिवशी

युरीया

६५

एमओपी

१००

पेरणी नंतर १५० व्या दिवशी

युरीया

६५

एमओपी

१००

पेरणी नंतर १८० व्या दिवशी

युरीया

३०

एमओपी

६०

पेरणी नंतर २१० व्या दिवशी

युरीया

३०

एमओपी

६०

पेरणी नंतर २४० व्या दिवशी

युरीया

३०

एमओपी

६०

पेरणी नंतर २७० व्या दिवशी

युरीया

३०

एमओपी

६०

पेरणी नंतर ३०० व्या दिवशी

युरीया

३०

एमओपी

६०

वर दिलेला आराखडा हा फक्त एक सल्ला आहे आणि त्यात ऋतू आणि हवामानाप्रमाणे वा जमीनीच्या कसदार (मातीचा आभ्यास करुन) असण्याने बदल होऊ शकतात.
एसएसपी = सिंगल सुपर फॉस्फेट, एमओपी = पोटॅशचे मूरिएट.

पाण्यातून कालवून देण्याची फवारणीची खते

पाण्यातूनकालवूनदेण्याच्या फवारणीच्याखतांचाआराखडा खालीलप्रमाणेआहे.

अवधी

ग्रेड

मात्रा.
१000 प्रति झाड(किलो) ४ दिवसांच्या टप्प्याने

एकूण मात्रा.
(किलो)

पेरणी नंतर ६५ दिवसांपर्यंत

युरीया

४.१३

८२.६०

१२:६१:00

३.००

६०.००

00:00:५०

५.००

१००.००

६५ दिवसां पासून १३५ दिवसांपर्यंत

युरीया

६.००

१२०.००

१२:६१:00

२.००

४०.००

00:00:५०

५.००

१००.००

१३५ दिवसां पासून १६५ दिवसांपर्यंत

युरीया

6.50

65.00

00:00:५०

६.००

६०.००

१६५ दिवसां पासून ३१५ दिवसांपर्यंत

युरीया

३.००

१५०.००

00:00:५०

६.००

३००.००

वर दिलेला आराखडा हा फक्त एक सल्ला आहे आणि त्यात ऋतू व हवामानाप्रमाणे वा जमीनीच्या कसदार (मातीचा आभ्यास करुन) असण्याने बदल होऊ शकतात.

आंतरपिकाचे संचालन

केळीची मुळे फार नाजूक आणि संवेदनशील असतात आणि फार मशागतीने नुकसान होऊ शकते, आंतरपिके घेणे हितावह नाही. पण, कमी वेळेची पिके (४५-६० दिवस) जसे मूग, चवळी, दैनचा अशी हिरवी शेंगभाजीची पिके घेता यातील. शेंगभाज्या असल्याने यावर किड लागण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे ह्या पिकांना किटकांपासून वाचवले पाहिजे, जेणेकरुन केळीला नुकसान होणार नाही.

खुरपणी

ग्लायफॉस्फेटची फवारणी(पूर्णपणे) पेरणीपूर्वी करणे गरजेचे आहे, याचे प्रमाण २ लिटर प्रति हेक्टर असे असावे जेणेकरुन गवताची वाढ थांबेल. आणि हाताने गवताची खुरपणी देखील २ ते ३ वेळा करावी लागते.

सूक्ष्मपोषकतत्वांचा स्प्रे

झिंक सल्फेट (0.५%), फेरोम सल्फेट (0.2%), कॉपर सल्फेट (0.2%) आणि बोरिक एसिड (0.१%) यांच्या मिश्रणाची फवारणी केल्याने केळ्याची शारीरिक वाढ होऊन त्यात गुण उपजतील आणि दर्जा अधीक वाढेल.सूक्ष्मपोषकतत्वांच े१००लिटरपाण्यात मिश्रणकरुनहेखालीलप्रमाणे तयारकेलेजाते.

झिंक सल्फेट

५०० ग्रॅ

 

प्रत्येकी १० लिटर मिश्रणासाठी ५-१० मि.लि. टिपाँल स्प्रे करण्याआधी घातल्यास ते स्टीकरचे काम करते.

फेरोम सल्फेट

२०० ग्रॅ

कॉपर सल्फेट

२०० ग्रॅ

बोरिक एसिड

१०० ग्रॅ

खास उपक्रम

केळीची उत्पादकता आणि गुणवत्ता वाढीसाठी काही खास उपक्रम राबविले जातात.

उपठोंब काढणे

केळीच्या बुंध्यालगत अनेक उपठोंब येऊ लागतात. ते वेळच्यावेळी काढून टाकावे लागतात ज्याने पालक रोपाला संरक्षण मिळते.
ठोंब काढण्याचे काम झाडाला फूल येईपर्यंत करावे लागते. केळीत घ्यावयच्या मिश्र पिकांची निवड करताना मुख्य पिकातील अंतर, अन्नद्रव्यांचा पुरवठा इत्यादी बाबींचा विचार करुन केळीला मोहोर आल्यावर ती घ्यावीत. आंतरपिके ही मोहोराच्या विरद्ध दिशेने हवीत. मुख्य पिकाच्या फार दूर असावीत.

केळफूल काढणे

घड आकार घेताना त्याच्या टोकास असलेले वांझ केळफूल त्या घडातील केळ्यांच्या शेजारी फणीपासून थोड्या अंतरावर कापून टाकावे. म्हणजे, घडातील केळी चांगली पोसून त्याचे वजन वाढते. काही ठिकाणी ही केळफुले काढली जात नाहीत व कापणीच्याच वेळी ती घडाबरोबर निघतात. पण, अशाने केळ्याच्या गुणवत्तेवर फरक पडतो. म्हणून फूल लागल्यावर लगेच ती काढून टाकण्याचा सल्ला दिला जातो.

पानांची कापणी

पाने एकमेकावर आपटण्याने फळाला नुकसान पोहोचवतात, म्हणून, अशी पाने संशोधनाच्या वेळी त्वरीत कापून टाकवीत. जुनी पाने किडलेली, सडलेली देखील असू शकतात, ती काढावीत. पण, हिरवीगार पाने काढू नये. ती घडाचे संरक्षण करतात.

जमीनीची मशागत

केळीच्या बागेतील जमीन वेळच्यावेळी स्वच्छ आणि भूसभुशीत ठेवावी. जमीनीची मशागत ३-४ महिन्यात पेरणीनंतर सूरु करावी. ऊदाहरणार्थ, १०-१२” पर्यंत कोळपण्या घ्याव्यात. पुढे हाताने चाळणी करावी. असा सल्ला दिला जातो की झाडापासून २-३” जरा ऊंचसा कट्टा पाण्याच्या ठिबकसाठी करावा, ज्यामुळे झाडाचे वा-यापासून देखील काही प्रमाणात संरक्षण होईल.

नरकळ्या खुरडणे

नरकळ्या काढून टाकण्याने फळाच्यावाढीस मदत होते आणि फांदीचे वजन वाढते. ह्या नर कळ्या १-२ हात लांबीवर एका बोटाचे अंतर ठेवून कापून काढल्या जातात.

शेंडा स्प्रे

सूक्ष्म पोषकतत्वांचा स्प्रे (०.२%) सर्व मोहोर फुलल्यावर करतात ज्याने कळ्या किंवा शेंडे गळून पडण्याचा रोग होत नाही. गळती रोगाने फळाचा रंग फिकट होतो आणि ते ओंगळ दिसते.

घड झाकणे

सुर्यप्रकाशापासून इजा होऊ नये म्हणून केळीच्या घडाभोवती त्याच झाडाची वाळलेली पाने गुंडाळतात, ती खर्च देखील वाचवतात आणि घडाचे संरक्षण करतात आणि झाकल्याने केळाची गुणवत्ता वाढते. पण, पावसाळ्यात हे शक्यतो टाळावे.
असे आवरण केल्याने घडाचे धुळीपासून, फवारणीच्या औषधांच्या परिणामांपासून, किटके आणि पक्षांपासून संरक्षण होते. यासाठी निळ्या प्लॅस्टीकचे आवरण देखील केले जाते. असे केल्याने घडाचे तापमान वाढून ते लवकर पिकण्यास मदत होते.

वाढ खुंटलेल्या फणींची खुडणी

घडामध्ये काही फण्या न वाढलेल्या किंवा कमी वाढ झालेल्या असतात, जे पुढे ऊत्तम फळ देणार नाही, त्यामुळे अशा फण्या हात मोहोरानंतर फळ धरल्यावर वेळीच खुडाव्या लागतात. ह्यामुळे उरलेल्या घडाला चांगले पोषण मिळते. काहीवेळा अशा फण्यांबरोबर वर-खाली असलेल्या फण्या देखील काढून टाकावे लागतात.

आधार देणे

काही वेळा घड तयार झाल्यावर झाडाचे वजन वाढते आणि ते खाली पडू लागते, त्यामुळे फळाचा दर्जा आणि गुणवत्ता यावर परिणाम होतो. म्हणून अशा झाडांना काठीचा आधार देऊन ऊभे केले जाते. किंवा दोन बाबूंच्या आधारे तिसरा बांबू लावून त्रिकोण तयार केला जातो आणि घडाला आधार दिला जातो यामुळे घड एकसारखा वाढतो.

रोग आणि किडी पासून निगा

जिवाणू, विषाणू आणि किटक रोग आणि किटकांचा प्रादूर्भाव आणि टोळ यांचा केळ्यावर प्रादूर्भाव होतो आणि केळ्याचे उत्पादन आणि गुणवत्ता खालावते. खाली काही महत्वाचे रोग त्याचे परिणाम व त्यावर उपाय दिलेले आहेत :


.क्र.

नांव

परिणाम

उपाय

किटक

१)

प्रकंद भुंगा
(काँस्मोपोलाईटसोरडायडस )

अ) मोठाले किड्याचे एक जाळे बनते आणि झाड कमकुवत होते.

अ) निरोगी कंद आणि मुनवे वापरावेत

ब) बाग स्वच्छ ठेवावी

क) मोठाले घुन  पकडावे आणि

ड) कार्बोफूराँन प्रति २ग्रॅ प्रति झाड असे मातीत मिसळावे

२)

खोड भुंगा (ओडायपोरसलाँजीकोलीस )

अ) कर्द आणि खोडावर छिद्र पडतात आणि त्यातून चिकट स्त्राव गळतो.

अ) स्वतः जातीने लक्ष देऊन हे किडे शोधून मारावे

ब) पानांना आणि फांदीच्या केंद्र आणि खोडाला पोखरते

ब) दुसरे, जमिनीपासून ४ फूट वर फांदीच्या इंजेक्शनच्या सहाय्याने ३० º कोनात चुन्याच्या पाण्याचे इंजक्शन द्यावे (सूक्ष्मपोषकतत्व १५०मि.ली . ३००मि.लि . पाण्यात)

क) घड पडणे

c) आडवे विभाजन वापरा (३० सेमी लांब) किंवा किडे पकडण्याची जाळी वापरा @ १०० प्रति हे. ट्रेचा उघडा भाग वर ठेवा जेणेकरुन किडे त्यात पडतील आणि मरतील.

३)

पानावरील कीड (केटॅनाफोट्रीप आणि सिग्निपेनीस आणि हेलियोट्रिप कोडालीफीलस)

अ) ते झाडाच्या वेगवेगळ्या भागावर नियंत्रण करतात आणि तो भाग काळा पडतो, फळाचा रंग फिकट होतो

अ) सूक्ष्मपोषकतत्व ाचेस्प्रे किंवा इंजक्शन @ ०.०५% घडावर केळफूल लागण्याच्या अगोदरच देणे.

४)

फळावरील तुडतुडे (बेसिलेप्टासबकोस्टाटम)

अ) मोठे किडे पाने खातात आणि कोवळ्या फळांचा रस पितात

अ) 0.0५% सूक्ष्मपोषकतत्व ाचेस्वच्छतास्प्रे किंवा 0.१% कार्बारील हे झाडाच्या बुंध्याजवळ मोहोर आल्यावर त्वरित फवारावे आणि झाडाला फळ लागल्यावरही फवारावे.

ब) झाडाची ताकद कमी होते आणि घडाची गुणवत्ता कमी होते

५)

अफिड किंवा शेंडा झुपका(पेंटालोनियानायग्रोनेरवोसा )

अ) हे केळीच्या झाडावरच्या विषाणूंवर पोसले जातात (बीबीटीवी) आणि त्यांना आपण फांदीच्या देठाशी पानांच्या मागच्या बाजूला पाहू शकतो

अ) सूक्ष्मपोषकतत्व ाचेस्प्रे 0.१% किंवा 0.03 % फाँस्फोनिडाँन हे पानांवर फवारावे

६)

भुंगे

अ) झाडे खुजी होतात

अ) कार्बोफोरन @40 ग्रॅ प्रति झाड पोरणीच्या वेळी आणि परत ४ महिन्यानंतर फवारणी करावी.

ब) पाने तोकडी होतात

क) मुळं कापली जातात

ब) निंबोणीची पेंड हे नैसर्गिक खत म्हणून वापरावे.

ड) मुख्य दांडा सडतो आणि काळा पडतो आणि मुळं दुभंगतात.

क) झेंडूची झाडे पकडण्यासाठी वापरावीत.

बुरशीरोग

७)

पनामा विल्ट (फ्यूरॅरियमआँक्सीस्पोरियम)

अ) जुनी पाने पिवळी पडायला लागतात

अ) निरोगी कंद वा मुनवे लावा. (कोवेंडीश समुह)

ब) लागण झालेल्या झाडावर पाने देठापासून गळून लटकत राहतात

ब) अशी पाने काढून टाका आणि उपाय म्हणून ०.१ % बाविस्टीन पेरणीच्या वेळी वापरा.

क) मुख्य दांडा दुभंगतो.

क) नैसर्गिक खतांबरोबर जैव तंत्र वापरा जसे ट्रायकोडर्मा आणि स्यूडोमोनास फ्लोरोसन्स

ड) मुळाच्या जवळ लालसर तांबूस रंगाची कीड स्पष्ट दिसते

ड) पाण्याचा निकास स्वच्छ असावा आणि बागेत चांगले नैसर्गिक खत वापरावे.

हेड राँट (इरविनिया कॅरोटोवोरा)

अ) देठ सडणे आणि पानांवर किड पडणे

अ) निरोगी कंद आणि मुनवे वापरावेत

ब) झाडाला ओढले तर मधल्या फांदी पासून ते तुटते आणि मूळ आणि झाडाचा खालचा भाग जमिनीत राहतो.

क) लागण झालेल्या झाडाच्या देठीला वर करुन पाहिल्यास पिवळसर ते लाल रंगाचा स्त्राव दिसून येतो.

ब) ०.१% इमिशनची झाडावर फवारणी करावी, नंतर परत ३ महिन्यांनी फवारणी करावी.

ड) लागण झाल्याचे लक्षात येताच, काळे किंवा पिवळसर पाणी देठापाशी स्त्रवताना दिसते, आणि आजूबाजूला काळे झाल्याचे दिसून येते.

क) खडकाळ भागात बाग लावण्याचे टाळा आणि खराब जमीन टाळावी.

९)

सिगाटोका लिफ स्पाँट (मायकोस्फारेला एसपीपी)

अ) पानांवर पडलेल्या बारीक-बारीक खड्ड्यावरुन हे ओळखता येते, हे खड्डे पिवळ्या ते हिरव्या रंगाचे असून त्यातून पानाच्या दोन्ही बाजूने रेषा दृष्टीस पडतात.

अ) लागण झालेली पाने काढून टाकावीत आणि त्यांचा नायनाट करावा.

ब) पानांवर पिवळसर काळसर रेषा दिसू लागतात.

क) पानाचा मध्य सुकतो आणि त्यावर रेषा दिसू लागतात आणि काळे डाग पडतात.

ब) पाण्याचा निचरा व्यवस्थित असावा आणि पाणी साठणार नाही याची काळजी घ्यावी

ड) कधीकधी लवकर पिकलेले दिसून येते

क) डिथेन एम-४५ चा स्प्रे (१२५० प्रति हेक्टर) किंवा बाविस्टाईन ५०० प्रति हेक्टर

संसर्गरोग

१)

केळ शेंडा झुपका टाँप वायरस(बीबीटीवी )

अ) ह्या किडीमध्ये वेड्यावाकड्या रेषा पानांवर दिसतात काहीवेळा पानाच्या खालच्या बाजूने देखील अशा रेषा दिसतात.

अ) रोग प्रतिकारक रोपांची लागवड करावी जसे. उतिसंवर्धन.

b) झाडांवर लक्ष ठेवून सडलेली पाने त्वरीत काढून टाका.

ब) पानांची वाढ खुंटते आणि पानं नको  तेवढी कडक आणि ताठ दिसतात.

क) किड पसरवणारे किडे जसे अफिड आणि सिली बग यांचा बंदोबस्त करा.

ड) अनुक्रमण करताना गुणन करुन ठरवावे

क) ) पानांची वाढ खुंटते, ती वरवर एकमेकांना चिटकून वाढतात

ई) लागण झालेल्या भागाला उत्तम असलेल्या भागांपासून दूर ठेवावे.

ड) नर कळ्यांची टोके हिरवी दिसतात.

इ) निरोगी कंद, मुनवे वापरावीत.

इ) अखिड किडा हा रोग पसरवतो.

ऊ) आंतरपिकाला कीड लागणार नाही याची काळजी घ्या आणि ती लागत असल्यास त्वरीत कारवाई करा.

२)

केळावरची बुरशी (बीएमवी)

अ) क्लोरोसिस बरोबर क्लोरट्कि स्ट्रीक्स पानावर दिसू लागतात जसे बीएसवी.

अ) रोगट झाडे काढावी आणि निरोगी लागवड जसे ऊतिसंवर्धन केलेली रोप वापरावीत

३)

केळाच्या खोडावरची बुरशी (बीबीएमवी)

अ) या रोगाचा प्रसार झाडाच्या सर्व भागांवर होतो जसे कंद आणि देठ पाने इत्यादीवर गुलाबीसर रेषा दिसतात.

अ) निरोगी लागवड जसे ऊतिसंवर्धन केलेली रोप वापरावीत

४)

केळाच्या मधल्या दांड्यावरची बुरशी (बीएसवी)

अ) अगोचर अशी कीड असल्याने घातक गळती आणि पिवळा, काळा आणि तांबूस रंग, फांदीला आधारीत दोन भाग होतात आणि आतील भाग छोट्या छोट्या भागात विभागला जातो.

अ) निरोगी लागवड जसे ऊतिसंवर्धन केलेली रोप वापरावीत

कापणी

झाडावर केळी पूर्णपणे वाढून तयार झाल्यावर घड कापून जलद गतीने ग्राहकांपर्यंत पोहचविण्याची गरज असते. यामुळे केळीची गुणवत्ता टिकून राहते. फळ फार लवकर पिकते म्हणून त्याची कापणीनंतर त्वरीत विल्हेवाट लावावी लागते.

परिपक्वता सूचकांक
व्यापारी केळ्यांची खरेदी केळी बागेत घडांची संख्या, आकारमान, त्याचे वजन, रंग, घेर, त्याचा कोन इत्यादी पाहूनच ठरवितात. बाजारात केळीची किंमत त्याच्या कच्चेपणा आणि पिकलेल्या गुणवत्तेवरुन ठरवितात.

घड काढणे

घडाची कापणी जेव्हा दुसरा हात वरुन ३ ते ४ गोलाकार होतो आणि पहिल्या हातानंतर वर ३० मि. होतो तेव्हा सुरु करतात. पहिला हात उघडल्यावर १००-११० दिवसात घड काढण्याचे काम होऊ शकते. काढलेले घड हे व्यवस्थित पानांचा थर देऊन तयार केलेल्या ट्रे किंवा बास्केट मध्ये साठवावे आणि गोदामात आणावेत. घड कापल्यानंतर उजेडापासून दूर ठेवावेत, कारण उजेडात केळी लवकर पिकतात आणि मऊ पडतात. किरकोळ विक्रेते भट्टीचा तयार माल घेऊन डझनावर विक्री करतात.
निर्यातीसाठी, केळीचे हात ४-१६ बोटांवर त्याच्या रुंदी आणि लांबीनुसार कापून, व्यवस्थित प्लास्टीकचे आवरण असलेल्या डब्यात वेगवेगळ्या वजनात निर्यातीच्या मागणीप्रमाणे बंद केले जातात.

घड काढल्यानंतरची कामे

गोदामात साठवलेल्या फळांमधून सडलेली आणि पिकलेली केळी बाजूला काढली जातात जी नंतर जवळच्या बाजारात विकायला पाठवली जातात. पण, जिथे निर्यातीचा प्रश्न आहे आणि त्याची गुणवत्ता महत्वाची आहे, तेथे घडावरुन फण्या मोकळ्या केल्या जातात, फळांना वाहत्या पाण्याखाली धरुन स्वच्छ केले जाते किंवा सोडीयम हायपोक्लोराईटच्या पाण्याने त्यावरचे मेण काढले जाते आणि त्यावर थायोबेंडँसोलची प्रक्रीया केली जाते; मग हवेच्या बंद पेटीत त्या फण्या व्यवस्थित रचले जातात प्रति १४.५ किलो किंवा जशी गरज असेल त्याप्रमाणे. आजूबाजूला पॉलिथीनच्या पिशवीची किनार करुन बंद केले जाते. १३-१५º सें. वातानूकुलीत तापमानात हे साठवले जातात आणि ८०-९०% आर एच राखला जातो. असा साठवलेला माल १३ º सें. च्या वातानूकुलीत साखळीतून बाजारात पाठवला जातो.

उपज

banana6.jpgपेरणीनंतर ११-१२ महिन्यात झाड कापणीसाठी तयार होते. पहिले पुनरपिक ८-१० महिन्यात कापणीसाठी तयार होते तर दुस-या पुनरपिकाला पहिल्या पिकापेक्षा ८-९ महिने लागतात.

म्हणून २८-३० महिन्यात, ३ पिके घेणे शक्य असते. जसे. एक मुख्य पिक आणि २ पुनरपिके घेता येतात. ठिबक सिंचन पद्धतीच्या मशागतीत उतिसंवर्धन घेतल्यास केळ्याचे १०० टक्के प्रति उत्पादन करता येते, पिकाची व्यवस्थित काळजी घेतल्यास पुनरपिक देखील तेवढेच घेता येते.

 

 

स्त्रोत : पोर्टल कन्टेट टिम

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate