অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रानभाजी संवर्धन

प्रस्तावना

मानवाच्या सर्वांगीण शाश्‍वत विकासात जैव विविधतेचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. सजीव सृष्टीतील प्रत्येक घटक एकमेकांशी व मानवाशी संबंधित असल्याने, जैव विविधतेतील प्रत्येक घटकाचे संरक्षण व त्याचे संवर्धन होणे आवश्‍यक आहे.

आपल्या सभोवताली असणारी जैव विविधता आपणास उपयुक्त आहे. अन्न, वस्त्र व निवारा तसेच आरोग्यदायी पर्यावरण या मूलभूत गरजांसाठी मानव संपूर्णपणे वनस्पतींवर अवलंबून आहे. त्यामुळे निसर्गातील वनस्पतिविविधता मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे.

जंगली वाणांचे संवर्धन हवे...

अन्नासाठी माणूस विविध पिकांवर अवलंबून असल्याने, या पिकांची तो शेतात लागवड करतो. भारतात आज विविध पिकांच्या सुमारे 166 प्रमुख प्रजाती आहेत आणि सुमारे 320 प्रजाती या पिकांच्या जंगली वाणांच्या आहेत. नवीन संकरित वाण तयार करण्यासाठी जंगली वाणांचा वापर केला जातो.

  1. मानवी आहारात प्रामुख्याने वनस्पतींचा समावेश असतो. धान्य, कडधान्य यांच्यानंतर मानवी आहारातील प्रमुख घटक म्हणजे भाजी. आपल्या आहारात भाजी म्हणून खोड, पाने, फळे, बिया, कंद, मुळे, फुले यांचा वापर केला जातो. भारतात भाजीच्या सुमारे 55 प्रजाती आहेत.
  2. बटाटा, मिरची, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर यांसारख्या भाज्यांच्या अनेक प्रजाती विदेशी आहेत. विविध देशांतून या प्रजाती अनेक वर्षांपूर्वी भारतात आल्या आहेत. भाजीसाठी वापरल्या जाणाऱ्या बहुतांश वनस्पतींची शेतात लागवड केली जाते.
  3. अलीकडील काळात बाजारपेठेत भाज्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे भाजीउत्पादनात वाढ करण्यासाठी आज अमर्यादित प्रमाणात रासायनिक खतांचा, रासायनिक द्रव्यांचा वापर शेतकरी करीत आहेत. यामुळे भाजी उत्पादनात, भाज्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे, पण त्यांची नैसर्गिक चव, प्रतिकारशक्ती कमी होत चालली आहे.
  4. भाजीपाला पिकांवर जिवाणू, विषाणू, बुरशी तसेच कीटकांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होऊ लागला आहे. कीड, रोगाच्या नियंत्रणासाठी भाजीपाला पिकावर मोठ्या प्रमाणात रासायनिक कीडनाशकांची फवारणी सुरू झाली. अनियंत्रित पद्धतीने कीडनाशकांची फवारणी झालेला भाजीपाला माणसाच्या आहारात आल्याने सांधेदुखी, कर्करोग, अल्सर, घसा- पोटांचे विकार, इ. आजार वाढू लागले. यासाठी सर्वांनी पारंपरिक भाजी पिकांना एक पर्याय म्हणून रानभाज्यांचा विचार अवश्‍य केला पाहिजे.

करा रानभाज्यांचे संवर्धन ...

  1. आपल्या सभोवताली समृद्ध वनस्पती संपदा आहे. शेतात, ओसाड जमिनीवर, बागेत, परसात, जंगलात अनेक वनस्पती आहेत, काही तण आहेत. यांतील काहींचा आपणास रानभाज्या म्हणून वापर करता येतो. पण यासाठी आपल्या सभोवताली असणाऱ्या वनस्पतींची ओळख व त्यांचा उपयोग याबाबतची प्राथमिक स्वरूपाची माहिती असणे आवश्‍यक आहे.
  2. विविध रानभाज्यांची माहिती खेड्यात, वनांत राहणाऱ्यांना, ग्रामीण भागातील महिलांना, ग्रामस्थांना असते. ते पारंपरिक पद्धतीने अशा वनस्पतींचा आपल्या आहारात भाजी म्हणून सर्रास वापर करतात.

 

 

स्त्रोत: अग्रोवन - जानेवारी १४, २०१४ -


अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate