ढगाळ वातावरणात आंबा, काजू पिकाची घ्या काळजी
कोकणातील प्रामुख्याने रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा व काजूची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली आहे. सर्वसाधारणपणे आंबा पिकाला ऑक्टोबर महिन्यात पालवी येऊन नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात मोहोर येण्यास सुरवात होते.