कृष्णा व भीमा खोऱ्यासाठी उभारण्यात आली अत्याधुनिक जलहवामान, पूरांचे अंदाज देणारी यंत्रणा
शेती संपन्नतेसाठी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे पाणी होय. राज्यातील शेतीला अधिकाधिक सिंचीत करण्याचे राज्य शासनाचे धोरण राहिले आहे. शेती लाभ क्षेत्रातील असो, किंवा लाभ क्षेत्राबाहेरची; झालेल्या पर्जन्यमानाची नेमकी आकडेवारीच शेती व्यवस्थापनाला उत्तम दिशा देऊ शकते.