काही अंतर्गेही प्रदूषके घर, कारखाना, दुकान, शाळा, कार्यालय इत्यादी वास्तूंमधील प्रदूषणास अंतर्गेही प्रदूषण म्हणतात. धूर, धूळ, मातीचे सूक्ष्मकण, सूक्ष्मजीव, बुरशी, पाळीव प्राण्यांचे केस, पिसवा, केरकचरा, सांडपाणी इ. प्रमुख प्रदूषके वास्तूत असतात.
पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली भूस्तरातील सच्छिद्र जागेत असलेल्या पाण्यास अध:पृष्ठीय जल किंवा भूजल म्हणतात. भूपृष्ठावरील पाण्यास ‘पृष्ठीय जल’ म्हणतात.
पर्यावरणातील एक प्रभावी प्रक्रिया. अनाच्छादन म्हणजे आवरण किंवा आच्छादन निघणे किंवा काढणे. भूपृष्ठ हे पृथ्वीचे आवरण आहे. हे आवरण अनेक थरांचे आहे. अपक्षय, वहन, क्षरण आणि निक्षेपण या परस्पर पूरक क्रिया घडल्यास भूपृष्ठावरील डोंगर, पर्वत, पठारे व मैदाने यांच्या स्वरूपात बदल होतो.
आकार, ढब, रंग आणि वर्तन यांबाबतींत इतर प्राण्यांशी, वनस्पतींशी किंवा निर्जीव वस्तूंशी असणार्या प्राण्यांच्या साम्याला किंवा नक्कल करण्याला अनुकारिता (अनुकृती) म्हणतात. निसर्गात प्राण्यांच्या संरक्षणाकरिता विविध पर्याय असून अनुकारितेमुळे प्राणी सहजासहजी दिसत नाहीत किंवा दिसतात, तेव्हा ते आपला दिखाऊ उपद्रवीपणा दाखवितात.
वनस्पती वा प्राणी यांच्यामध्ये पर्यावरणाशी जुळवून घेण्यासाठी होणार्या बदलाच्या प्रक्रियेला अनुकूलन म्हणतात. अनुकूलन ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. या प्रक्रियेद्वारे सजीव त्यांच्या नैसर्गिक परिस्थितीत यशस्वी रीत्या जगण्यासाठी सक्षम होत असतात.
परिसंस्थेतील एका सजीवाकडून दुसर्या सजीवाकडे अन्नऊर्जेचे संक्रमण निम्नस्तरापासून ते उच्चस्तरापर्यंत होते, याला अन्नसाखळी म्हणतात. सजीवाला अन्नाची गरज असते. अन्नसाखळीत अन्न मिळविणे आणि दुसर्याचे अन्न होणे ही प्रक्रिया सतत चालू असते.
परिसंस्थेतील महत्त्वाची प्रक्रिया. मृत सेंद्रियघटकांतील सेंद्रिय रेणूंचे साध्या व कमी ऊर्जेच्या असेंद्रियसंयुगांमध्ये सावकाश रूपांतर होण्याची प्रक्रिया म्हणजे 'अपघटन'.
जलसंस्करण (शुद्धीकरण) प्रक्रियेत पाण्याचे गाळण करण्यापूर्वी त्या पाण्यातील घनद्रव्ये बाहेर काढण्याची क्रिया. अवसादनात द्रव व सूक्ष्म घन पदार्थ यांच्या मिश्रणातील घन पदार्थ वेगळे केले जातात. अपशिष्ट जल व घन पदार्थांमुळे पाणी दूषित झालेले असते. असे पाणी तलाव, टाकी, डबके इत्यादींत सोडले जाते.
भौमिक आणि जलीय प्रणालींच्या संक्रमण भागातील साधारणपणे जलपृष्ठाजवळ किंवा जलपृष्ठाइतकी जलपातळी असलेल्या भूमीवरील परिसंस्था म्हणजे ‘आर्द्रभूमी परिसंस्था’ होय.
उन्हाळ्याला तोंड देण्याचे पर्यावरण-मैत्रीपूर्ण उपाय
पर्यावरणीय बदलाच्या प्रक्रियेतील एक महत्त्वपूर्ण सागरी प्रवाह. स्पॅनिश भाषेत एल् निनो याचा अर्थ मूल. ख्रिसमसच्या सुमारास दक्षिण अमेरिकेतील पेरू आणि एक्वादोर किनार्यालगत पॅसिफिक महासागरी उष्ण प्रवाह वाहत असल्याने स्थानिक मत्स्य व्यावसायिकांनी त्यास बाल येशू असे नाव दिले.
ओझोन अवक्षय म्हणजे पृथ्वीच्या वातावरणात असणार्या ओझोन वायूच्या थरातील त्याचे प्रमाण कमी होणे. ओझोन हे ऑक्सिजन या मूलद्रव्याचे उच्च ऊर्जा असलेले एक बहुरूप आहे. सामान्य ऑक्सिजनामध्ये दोन अणू (O2 ) असतात, तर ओझोनाच्या प्रत्येक रेणूत ऑक्सिजनाचे तीन अणू (O3 ) असतात.
पृथ्वीवरील वातावरण हा पर्यावरणाचा सर्वात गतीमान घटक आहे.
निरनिराळ्या कारखान्यांतून आणि औद्योगिक वसाहतींतून उत्पादन होत असताना निरुपयोगी झालेला माल किंवा वस्तू म्हणजे ‘औद्योगिक अपशिष्ट’ होय. औद्योगिक क्रांतीनंतरच्या काळात औद्योगिकीकरणाबरोबरच विज्ञान आणि तंत्रज्ञानातही वेगाने प्रगती होत गेली. निर्मिती आणि प्रक्रिया उद्योगांत स्वयंचलित यंत्रे, जीवाश्म इंधने, कच्चा माल इत्यादींचा वापर वाढत जाऊन औद्योगिक उत्पादनांत प्रचंड वाढ झाली.
उद्योगांत कच्च्या मालावर प्रक्रिया करून त्यापासून पक्का माल तयार केला जातो. अशा निर्मिती व प्रक्रिया उद्योगातून मालांची निर्मिती होत असताना काही अपायकारक अपशिष्टे व प्रदूषके बाहेर पडतात.
कार्बनाचे वातावरणातून सजीवांकडे व सजीवांच्या मृत्यूनंतर पुन्हा वातावरणाकडे होणारे अभिसरण व त्याची पुनरुपयुक्तता म्हणजे कार्बन चक्र होय. कार्बनाच्या अणूंचे मुख्यतः प्रकाशसंश्लेषण व श्वसनक्रियेद्वारे अभिसरण व त्याची पुनरुपयुक्तता होते. वातावरणात कार्बन डाय-ऑक्साइड (Co2) वायू केवळ ०.०३% असतो. उष्ण कटिबंधात कार्बन चक्र प्रभावी असते.
कृष्णा नदीला दक्षिण भारताची गंगा म्हटले जाते.
खार्या पाण्यापासून गोडे पाणी मिळविण्याचे नवे तंत्रज्ञान - प्रतिरसाकर्षण.
वाढते शहरीकरण व दाट लोकवस्तीमुळे कचर्याची समस्या गंभीर होत चालली आहे. कचरा ही निरोपयोगी, त्याज्य, अपायकारक व गंभीर बाब आहे
पर्यटन म्हणजे मनोरंजन, पर्यटन म्हणजे साहस, पर्यटन म्हणजे व्यवसाय किंवा कामानिमित्त केलेला प्रवास होय. धकाधकीच्या जीवनात कामाच्या व्यापातून एक ते दोन दिवस मोकळीक मिळाली की, निवांतस्थळी निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याची इच्छा माणसाच्या मनात असते.
वाढत्या औद्यौगीकरणामुळे मोठ्या शहरातील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे.
वाढत्या औद्यौगीकरणामुळे मोठ्या शहरातील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. या लोकसंख्येचा ताण शहरातील निवासव्यवस्था, रस्ते, पाणीपुरवठा, वीज यासारख्या पायाभूत सुविधांना सहन करणे अशक्य झाले आहे.
घन कचऱ्याची निर्मिती घराघरातून होत असल्याने गोळा होणाऱ्या घनकचऱ्याचे प्रमाण वा त्याचा दर्जा यावर नियंत्रण ठेवता येत नाही.
सांगली जिल्ह्याची भौगोलिक रचना आणि पश्चिमेकडील भागाला लाभलेली निसर्गसंपदा यामुळे जिल्ह्याची आगळी वेगळी ओळख निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील पश्चिम भागात असलेले चांदोली अभयारण्य आणि येथील घनदाट वृक्षवल्ली पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे.
पृथ्वीवरील सार्या सजीव सृष्टीचा आधार हे येथील पर्यावरण आहे. पृथ्वी सोडून इतर कोणत्याही ग्रहावर व विश्वात इतरत्र असे पर्यावरण नाही.
शासनाने जागतिक बँकेच्या सहकार्याने चोवीस तास पाणी पुरवठा योजना हाती घ्यायचे ठरविले आहे.
निसर्ग संवर्धन उपक्रम माहिती.
फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या हफ्त्यानंतर ते जून महिन्याच्या शेवटपर्यंत वणवा लागण्याची शक्यता असते. पाऊस पडेपर्यंत वणवा लागू शकतो.
5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. या दिवशी पर्यावरणाचा समतोल राखण्यासंदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृतीही केली जाते.
पृष्ठभागावरचे पाणी गरम असल्याने खोलीवरच्या गार पाण्यापेक्षा त्याचे विशिष्ट गुरुत्व कमी असते.